शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

कोल्हापूर : जोतिबा यात्रेसाठी पंचगंगा घाटावर मांडव, गुरुवारपासून धावणार जादा बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 19:34 IST

दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबा यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी पंचगंगा नदीघाटावर जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेकरूंसाठी निवारा शेड, तात्पुरते बसस्थानक, अन्नछत्राचे मांडव यांची उभारणी केली जात आहे. दरम्यान, बुधवारी पंचगंगा नदीपुलानजीक मोठ्या संख्येने भाविक जोतिबा डोंगरावर जाण्यासाठी थांबल्याचे समजल्यानंतर परिवहन महामंडळाने तातडीने जादा एस.टी. बसेस पाठवून भाविकांची सोय केली.

ठळक मुद्देजोतिबा यात्रेसाठी पंचगंगा घाटावर मांडव, शेड उभारणीगुरुवारपासून धावणार जादा बसेस

कोल्हापूर : दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबा यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी पंचगंगा नदीघाटावर जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेकरूंसाठी निवारा शेड, तात्पुरते बसस्थानक, अन्नछत्राचे मांडव यांची उभारणी केली जात आहे. दरम्यान, बुधवारी पंचगंगा नदीपुलानजीक मोठ्या संख्येने भाविक जोतिबा डोंगरावर जाण्यासाठी थांबल्याचे समजल्यानंतर परिवहन महामंडळाने तातडीने जादा एस.टी. बसेस पाठवून भाविकांची सोय केली.जोतिबाची चैत्र यात्रा येत्या शनिवारी होत आहे. यात्रा आता अवघ्या दोन दिवसांवर आल्याने महाराष्ट्र-कर्नाटकसह आंध्रप्रदेशमधील भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे कोल्हापुरात आले आहेत.

 

जोतिबा यात्रेकरूंसाठी बुधवारी पंचगंगा नदीघाटावर तात्पुरते शेड उभारण्यात येत होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)या भाविकांच्या सोईसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवारपासून पंचगंगा नदीघाटावरून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एस.टी. बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी तात्पुरते बसस्थानक व निवारा शेड उभारण्यात येत आहे.

दुसरीकडे शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनेही येथे अन्नछत्राचे आयोजन केले जाते. त्यासाठीही  गुरुवारी मंडप उभारण्यात येत आहे. जादा एस.टी. बसेस सेवा सुरू होणार आहे. मात्र बुधवारी जोतिबा डोंगरावर जाण्यासाठी पंचगंगा नदीपुलानजीक मोठ्या संख्येने भाविक थांबले होते. ही माहिती समजताच परिवहन महामंडळाने तातडीने या मार्गावर जादा एस.टी. बसेस सोडल्या.

दर पाच मिनिटांनी गाडीयात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने दर पाच मिनिटांनी एस.टी. बसचे नियोजन केले आहे. यात्राकाळात या मार्गावरून १५० एस.टी. बसेस धावणार आहेत. यासह पुणे, सातारा, सोलापूर या विभागांकडून थेट जोतिबा डोंगर येथे जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांसाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा संपताच एखाद्या प्रमुख गावी जाण्यासाठी भाविकांनी जादा गाडीची मागणी केली, तर थेट संबंधित गावापर्यंत गाडी सोडण्याचे नियोजन महामंडळाने यंदा केले आहे.

महामंडळाचे १५० कर्मचारी सेवेतयात्राकाळात भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी एस. टी. महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी व प्रवासी मित्र असे १५० जण दिवसरात्र सेवेसाठी राहणार आहेत. या दरम्यान कोणत्याही गाडीत बिघाड झाल्यास तत्काळ दुरुस्तीसाठी दोन पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय क्रेनचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

 

यात्रेदरम्यान मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक, पंचगंगा घाट येथून दर पाच मिनिटांनी एस. टी. बसेस असणार आहेत. तसेच जोतिबा यात्रेसाठी राज्य परिवहन मंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोईसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे निवारे उभारण्यात आले आहेत. तरी भाविकांनी या सहज, सुलभ सेवेचा लाभ घ्यावा.- अतुल मोरेसहायक वाहतूक अधीक्षक

 

टॅग्स :Jyotiba Chaitra Yatra 2018ज्योतिबा चैत्र यात्रा २०१८kolhapurकोल्हापूर