शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कोल्हापूर : जोतिबा यात्रेसाठी पंचगंगा घाटावर मांडव, गुरुवारपासून धावणार जादा बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 19:34 IST

दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबा यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी पंचगंगा नदीघाटावर जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेकरूंसाठी निवारा शेड, तात्पुरते बसस्थानक, अन्नछत्राचे मांडव यांची उभारणी केली जात आहे. दरम्यान, बुधवारी पंचगंगा नदीपुलानजीक मोठ्या संख्येने भाविक जोतिबा डोंगरावर जाण्यासाठी थांबल्याचे समजल्यानंतर परिवहन महामंडळाने तातडीने जादा एस.टी. बसेस पाठवून भाविकांची सोय केली.

ठळक मुद्देजोतिबा यात्रेसाठी पंचगंगा घाटावर मांडव, शेड उभारणीगुरुवारपासून धावणार जादा बसेस

कोल्हापूर : दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबा यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी पंचगंगा नदीघाटावर जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेकरूंसाठी निवारा शेड, तात्पुरते बसस्थानक, अन्नछत्राचे मांडव यांची उभारणी केली जात आहे. दरम्यान, बुधवारी पंचगंगा नदीपुलानजीक मोठ्या संख्येने भाविक जोतिबा डोंगरावर जाण्यासाठी थांबल्याचे समजल्यानंतर परिवहन महामंडळाने तातडीने जादा एस.टी. बसेस पाठवून भाविकांची सोय केली.जोतिबाची चैत्र यात्रा येत्या शनिवारी होत आहे. यात्रा आता अवघ्या दोन दिवसांवर आल्याने महाराष्ट्र-कर्नाटकसह आंध्रप्रदेशमधील भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे कोल्हापुरात आले आहेत.

 

जोतिबा यात्रेकरूंसाठी बुधवारी पंचगंगा नदीघाटावर तात्पुरते शेड उभारण्यात येत होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)या भाविकांच्या सोईसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवारपासून पंचगंगा नदीघाटावरून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एस.टी. बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी तात्पुरते बसस्थानक व निवारा शेड उभारण्यात येत आहे.

दुसरीकडे शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनेही येथे अन्नछत्राचे आयोजन केले जाते. त्यासाठीही  गुरुवारी मंडप उभारण्यात येत आहे. जादा एस.टी. बसेस सेवा सुरू होणार आहे. मात्र बुधवारी जोतिबा डोंगरावर जाण्यासाठी पंचगंगा नदीपुलानजीक मोठ्या संख्येने भाविक थांबले होते. ही माहिती समजताच परिवहन महामंडळाने तातडीने या मार्गावर जादा एस.टी. बसेस सोडल्या.

दर पाच मिनिटांनी गाडीयात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने दर पाच मिनिटांनी एस.टी. बसचे नियोजन केले आहे. यात्राकाळात या मार्गावरून १५० एस.टी. बसेस धावणार आहेत. यासह पुणे, सातारा, सोलापूर या विभागांकडून थेट जोतिबा डोंगर येथे जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांसाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा संपताच एखाद्या प्रमुख गावी जाण्यासाठी भाविकांनी जादा गाडीची मागणी केली, तर थेट संबंधित गावापर्यंत गाडी सोडण्याचे नियोजन महामंडळाने यंदा केले आहे.

महामंडळाचे १५० कर्मचारी सेवेतयात्राकाळात भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी एस. टी. महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी व प्रवासी मित्र असे १५० जण दिवसरात्र सेवेसाठी राहणार आहेत. या दरम्यान कोणत्याही गाडीत बिघाड झाल्यास तत्काळ दुरुस्तीसाठी दोन पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय क्रेनचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

 

यात्रेदरम्यान मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक, पंचगंगा घाट येथून दर पाच मिनिटांनी एस. टी. बसेस असणार आहेत. तसेच जोतिबा यात्रेसाठी राज्य परिवहन मंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोईसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे निवारे उभारण्यात आले आहेत. तरी भाविकांनी या सहज, सुलभ सेवेचा लाभ घ्यावा.- अतुल मोरेसहायक वाहतूक अधीक्षक

 

टॅग्स :Jyotiba Chaitra Yatra 2018ज्योतिबा चैत्र यात्रा २०१८kolhapurकोल्हापूर