शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

कोल्हापूर : अखेर तुळशीतील पाणी उपशाचा प्रश्न मार्गी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 16:48 IST

Maharashtra : शेतकऱ्यांनी पाणी परवान्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याच्या सूचना.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी पाणी परवान्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याच्या सूचना.

श्रीकांत ऱ्हायकर

धामोड (कोल्हापूर) : धरणासाठी ज्या माणसांनी स्वतःची शेती, संसार बहाल केला व विस्थापिताचा शिक्का घेऊन धरण काठावरच उर्वरित शेतीत संसार थाटला. अशी माणसे गेल्या सात वर्षापासून याच धरणातील पाणी परवाना मिळवण्यासाठी  शासन दरबारी  हेलपाटे मारून  मेटाकुटीस आली होती. पण पाणी उपसा परवाना मिळत नसल्या कारणाने उरली-सुरली शेतीही पाण्याअभावी कोरडवाहू बनली होती. दरम्यान, आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष पद येताच त्यांनी या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देऊन गेल्या सात वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न काल मार्गी लावला.

धामोड( ता. राधानगरी ) येथील तुळशी जलाशयांमध्ये देऊळवाडी, कुदळवाडी, बुरंबाळी, आपटाळ, केळोशी खुर्द इत्यादी गावातील लोकांची शेती गेल्याने हे लोक धरणग्रस्त बनले. पैकी बहुतांशी लोकांना जलाशयातून पाणी उपसा परवाना मिळण्यासाठीचा अर्ज करून देखील पाणी परवाना मिळत नव्हता. तांत्रिक कारण पुढे करून प्रशासनाने प्रस्ताव नाकारले होते. दरम्यान, लोकांनी मंत्रालयापर्यंत हेलपाटे मारूनदेखील त्यांना न्याय मिळला नाही. आमदार प्रकाश आबिटकर यांनी या प्रश्नाची दखल घेत गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडवण्याचा निश्चय केला.

हा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी काल तुळशी धरण स्थळावरच धरणग्रस्त बांधवांची व  विभागातील अधिकार्‍यांची बैठक बोलावून हा प्रश्न स्थानिक पातळीवर निकाली काढत ज्यांना पाणी परवाना हवा आहे अशा शेतकऱ्यांनी पाणी परवान्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याच्या सूचना केल्या. 

महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर या पदाचा योग्य सदुपयोग करत गेल्या सात वर्षापासून तुळशी धरणग्रस्तांचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावता आला याचा आनंद आहे.आ . प्रकाश आबिटकर(उपाध्यक्ष मराराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद)

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रkolhapurकोल्हापूरWaterपाणी