शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

कोल्हापूर : अखेर तुळशीतील पाणी उपशाचा प्रश्न मार्गी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 16:48 IST

Maharashtra : शेतकऱ्यांनी पाणी परवान्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याच्या सूचना.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी पाणी परवान्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याच्या सूचना.

श्रीकांत ऱ्हायकर

धामोड (कोल्हापूर) : धरणासाठी ज्या माणसांनी स्वतःची शेती, संसार बहाल केला व विस्थापिताचा शिक्का घेऊन धरण काठावरच उर्वरित शेतीत संसार थाटला. अशी माणसे गेल्या सात वर्षापासून याच धरणातील पाणी परवाना मिळवण्यासाठी  शासन दरबारी  हेलपाटे मारून  मेटाकुटीस आली होती. पण पाणी उपसा परवाना मिळत नसल्या कारणाने उरली-सुरली शेतीही पाण्याअभावी कोरडवाहू बनली होती. दरम्यान, आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष पद येताच त्यांनी या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देऊन गेल्या सात वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न काल मार्गी लावला.

धामोड( ता. राधानगरी ) येथील तुळशी जलाशयांमध्ये देऊळवाडी, कुदळवाडी, बुरंबाळी, आपटाळ, केळोशी खुर्द इत्यादी गावातील लोकांची शेती गेल्याने हे लोक धरणग्रस्त बनले. पैकी बहुतांशी लोकांना जलाशयातून पाणी उपसा परवाना मिळण्यासाठीचा अर्ज करून देखील पाणी परवाना मिळत नव्हता. तांत्रिक कारण पुढे करून प्रशासनाने प्रस्ताव नाकारले होते. दरम्यान, लोकांनी मंत्रालयापर्यंत हेलपाटे मारूनदेखील त्यांना न्याय मिळला नाही. आमदार प्रकाश आबिटकर यांनी या प्रश्नाची दखल घेत गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडवण्याचा निश्चय केला.

हा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी काल तुळशी धरण स्थळावरच धरणग्रस्त बांधवांची व  विभागातील अधिकार्‍यांची बैठक बोलावून हा प्रश्न स्थानिक पातळीवर निकाली काढत ज्यांना पाणी परवाना हवा आहे अशा शेतकऱ्यांनी पाणी परवान्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याच्या सूचना केल्या. 

महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर या पदाचा योग्य सदुपयोग करत गेल्या सात वर्षापासून तुळशी धरणग्रस्तांचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावता आला याचा आनंद आहे.आ . प्रकाश आबिटकर(उपाध्यक्ष मराराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद)

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रkolhapurकोल्हापूरWaterपाणी