शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अखेर तुळशीतील पाणी उपशाचा प्रश्न मार्गी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 16:48 IST

Maharashtra : शेतकऱ्यांनी पाणी परवान्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याच्या सूचना.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी पाणी परवान्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याच्या सूचना.

श्रीकांत ऱ्हायकर

धामोड (कोल्हापूर) : धरणासाठी ज्या माणसांनी स्वतःची शेती, संसार बहाल केला व विस्थापिताचा शिक्का घेऊन धरण काठावरच उर्वरित शेतीत संसार थाटला. अशी माणसे गेल्या सात वर्षापासून याच धरणातील पाणी परवाना मिळवण्यासाठी  शासन दरबारी  हेलपाटे मारून  मेटाकुटीस आली होती. पण पाणी उपसा परवाना मिळत नसल्या कारणाने उरली-सुरली शेतीही पाण्याअभावी कोरडवाहू बनली होती. दरम्यान, आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष पद येताच त्यांनी या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देऊन गेल्या सात वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न काल मार्गी लावला.

धामोड( ता. राधानगरी ) येथील तुळशी जलाशयांमध्ये देऊळवाडी, कुदळवाडी, बुरंबाळी, आपटाळ, केळोशी खुर्द इत्यादी गावातील लोकांची शेती गेल्याने हे लोक धरणग्रस्त बनले. पैकी बहुतांशी लोकांना जलाशयातून पाणी उपसा परवाना मिळण्यासाठीचा अर्ज करून देखील पाणी परवाना मिळत नव्हता. तांत्रिक कारण पुढे करून प्रशासनाने प्रस्ताव नाकारले होते. दरम्यान, लोकांनी मंत्रालयापर्यंत हेलपाटे मारूनदेखील त्यांना न्याय मिळला नाही. आमदार प्रकाश आबिटकर यांनी या प्रश्नाची दखल घेत गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडवण्याचा निश्चय केला.

हा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी काल तुळशी धरण स्थळावरच धरणग्रस्त बांधवांची व  विभागातील अधिकार्‍यांची बैठक बोलावून हा प्रश्न स्थानिक पातळीवर निकाली काढत ज्यांना पाणी परवाना हवा आहे अशा शेतकऱ्यांनी पाणी परवान्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याच्या सूचना केल्या. 

महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर या पदाचा योग्य सदुपयोग करत गेल्या सात वर्षापासून तुळशी धरणग्रस्तांचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावता आला याचा आनंद आहे.आ . प्रकाश आबिटकर(उपाध्यक्ष मराराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद)

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रkolhapurकोल्हापूरWaterपाणी