शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

कोल्हापूर : मालिका आणि चित्रपटांपेक्षा नाटकांमध्ये जिवंतपणा : गिरीष ओक, कलायात्री पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 13:18 IST

नाटक, मालिका आणि चित्रपट ही तीनही माध्यमे अभिनयासाठी आव्हानात्मक असली तरी नाटकामध्ये जिवंतपणा असतो. रिप्लेसमेंट म्हणून काम करताना अवहेलना पचवली पण नाटक सोडल नाही या अपमानातूनच मला लढण्याची ताकद मिळाली असे मनोगत ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीष ओक यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देगिरीश ओक यांनी सादर केले तो मी नव्हेच ' नाटकातील स्वगतकपाले यांच्या हस्ते नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार प्रदान

कोल्हापूर : नाटक, मालिका आणि चित्रपट ही तीनही माध्यमे अभिनयासाठी आव्हानात्मक असली तरी नाटकामध्ये जिवंतपणा असतो. नाटक आपल्याला प्रत्यक्ष व्यक्तीच्या सादरीकरणातून भावभावनांचे अनुभव देवून जाते. डॉक्टरकीचे शिक्षण घेतले असले तरी मी त्यात स्थिरावलो नव्हतो. नाटक आवडायचे म्हणून नशीब आजमवायला मुंबईत आलो. रिप्लेसमेंट म्हणून काम करताना अवहेलना पचवली पण नाटक सोडल नाही या अपमानातूनच मला लढण्याची ताकद मिळाली असे मनोगत ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीष ओक यांनी व्यक्त केले.कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात गुरूवारी डॉ. गिरीष ओक यांना अथौपेडिक सर्जन जिनेश्वर कपाले यांच्या हस्ते नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी झालेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी आपला अभिनय प्रवास उलगडला. कमला कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ. सुजय पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीत हा संवाद सुरेख खुलवला.डॉ. ओक म्हणाले, जयशंकर दानवे हे मोठे कलाकार होते. माज्या दीपस्तंभ या नाटकातील भूमिका दानवे यांच्या खलनायकी अभिनयाची आठवण करून देते. दिपस्तंभ ते वेलकम जिंदगी या रंगभूमीवरील प्रवासाबाबत ते म्हणाले, प्रभाकर पणशीकरांच्या ' तो मी नव्हेच ' नाटकात एक भूमिका रिप्लेसमेंट म्हणून मिळाली. पणशीकर या एकमेव व्यक्तीने माझ्या अभिनयाला जोखले आणि त्यांच्यानंतर ते नाटक माझ्याकडे आले .

सध्याच्या युगात फसवण्याची साधन आणि काही थोडे बदल करुन हे नाटक आजही प्रेक्षक पसंतीस उतरत आहे . यानंतर यू टर्न, ती फुलराणी, कुसुम मनोहर लेले, वेलकम जिंदगी अशी कित्येक नाटके मी केली. एखाद्या भूमिकेशी तुलना झाली की मला त्रास होतो . त्यामुळे ती फुलराणी या नाटकातून मला मानसीक समाधान मिळू शकले नाही. यानंतर काही चित्रपट, मालिका केल्या. लेखनही सुरु होते.मुलाखतीनंतर गिरीश ओक यांनी तो मी नव्हेच ' नाटकातील स्वगत सादर केले. जयश्री दानवे यांनी प्रास्ताविक केले. अनुपमा चव्हाण यांनी मानपत्र वाचन केले. ऐश्वर्या बेहरे यांनी सूत्रसंचलन केले. राजदर्शन दानवे यांनी आभार मानले. यावेळी सुधीर पेटकर, चंद्रकांत जोशी, यशवंत भालकर, दिलीप बापट, श्रीकांत डिग्रजकर उपस्थित होते .

 

 

टॅग्स :Girish oakगिरिश ओकkolhapurकोल्हापूर