शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Vidhan Parishad Election : सतेज पाटील यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 14:59 IST

कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या चर्चेला आज अखेर पुर्ण विराम मिळाला. अखेर कोल्हापूरची ही विधानपरिषदेची जागा ...

कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या चर्चेला आज अखेर पुर्ण विराम मिळाला. अखेर कोल्हापूरची ही विधानपरिषदेची जागा बिनविरोध करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांचा विजयी मार्ग मोकळा झाला आहे.दुपारच्या सुमारास भाजप नेते फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी धनंजय महाडिक यांना फोन करुन अर्ज माघार घेण्याची सुचना दिली. या सुचनेवरुन भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांना आपले अर्ज माघारी घेतले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना धनंजय महाडिक यांनी पक्ष आदेश पाळत आपण अर्ज माघार घेतल्याचे सांगितले.या निवडणुकीसाठी १० डिसेंबरला मतदान होणार होते. मात्र ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याने पालकमंत्री सतेज पाटील यांचा विजयी मार्गे मोकळा झाला.भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे दोघेही दिल्लीला गेल्याने राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चेला पुन्हा ऊत आला आहे. असा निर्णय जरी झाला तर मग कोल्हापूरची जागाही बिनविरोध होणार का, अशी विचारणा करण्यात येत होती. याला पुर्ण विराम मिळाला.

निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. पाटील आणि महाडिक यांच्याकडून विजयासाठी मतदारांच्या गोळाबेरीजेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु होती. तर दुसरीकडे दोन्ही समर्थकांकडून सोशल वॉर सुरु होते. मात्र अखेर वरिष्ठ पातळीवरुन समझोता होताच कार्यकर्त्यांची हवाच निघून गेली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलAmal Mahadikअमल महाडिक