शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

कोल्हापूर : बाराही तालुक्यांमध्ये ‘इस्रो’च्या प्रयोगशाळा : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 18:56 IST

भारत देश उत्पादक बनला पाहिजे, यासाठी संशोधन वृत्तीला चालना देण्याची गरज आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील बाराही तालुक्यांमध्ये ‘इस्रो’च्या प्रयोगशाळा उभारणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

ठळक मुद्दे बाराही तालुक्यांमध्ये ‘इस्रो’च्या प्रयोगशाळा : चंद्रकांत पाटीलजिल्हा परिषदेतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

कोल्हापूर : भारत देश उत्पादक बनला पाहिजे, यासाठी संशोधन वृत्तीला चालना देण्याची गरज आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील बाराही तालुक्यांमध्ये ‘इस्रो’च्या प्रयोगशाळा उभारणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने विविध परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव, केंद्रप्रमुखांना लॅपटॉप वितरण आणि ई-लर्निंग सॉफ्टवेअर वितरण अशा संयुक्त कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुरेश हाळवणकर होते.पालकमंत्री म्हणाले, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांनी सव्वा वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांचा भौतिक आणि गुणात्मक दर्जा वाढविला आहे. मधल्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या, नगरपरिषदांच्या शाळांकडे दुर्लक्ष झाले. परिणामी पालक पैसे देऊन खासगी शाळांमध्ये मुलांना घालू लागले; म्हणून या शाळांचा दर्जा सुधारण्याचा आम्ही निर्णय घेतला. यातूनच गेल्या वर्षी ५ कोटी २0 लाख आणि यंदा ७ कोटी रुपये शाळादुरुस्ती आणि बांधकामासाठी दिले आहेत.प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी रविकांत आडसूळ यांनी प्रास्ताविक केले. शिक्षण सभापती अंबरीश घाटगे म्हणाले, शिक्षण विभागाने गेल्या सव्वा वर्षात मोठी कामगिरी केली आहे.

‘इस्रो’च्या सहलींपासून ते शिष्यवृत्तीची परंपरा टिकविण्यापर्यंत आणि ई-लर्निंगपासून ते डॉ. जे. पी. नाईक अभियानापर्यंत अनेक नवे उपक्रम राबवत जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जे प्रश्न सोडविणे अशक्य वाटत होते, ते सर्व प्रश्न सोडविल्याबद्दल आणि शिक्षण विभागाला मोठा निधी दिल्याबद्दल घाटगे यांनी पालकमंत्री पाटील यांना धन्यवाद दिले.आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला देऊन केंद्र शासनाने मोठे पाऊल उचलले. त्यातील २५ टक्के निधी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी वापरण्याचा निर्णय, ६0५ अभ्यासक्रमांसाठीची शैक्षणिक फी सरकारने भरण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी घेतला. याच पद्धतीने जिल्हा परिषदेला निधी देण्यातही आम्ही मागे पडलो नाही.यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेतील १२६, प्रज्ञाशोध परीक्षेतील १0४ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला; तर १७१ केंद्रप्रमुखांना सुलभ कामकाजासाठी लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी आभार मानले; तर संदीप मगदूम आणि सविता कुंभार यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, अरुण इंगवले, राजवर्धन निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, शिक्षण समिती सदस्य अनिता चौगले, रसिका पाटील, कल्लाप्पा भोगण, विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

गुणवत्तेवर विदेशी जाणाऱ्या मुलींचा खर्च करणारगुणवत्तेवर विदेशामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या जिल्ह्यातील मुलींसाठी कमी पडणारा निधी देण्याची घोषणा यावेळी पालकमंत्री पाटील यांनी केली. नम्रता खोत (रा. चांदेकरवाडी, ता. राधानगरी) ही विद्यार्थिनी एम. एस्सी. फिजिक्स झाली आहे. तिने पत्र लिहून अमेरिकेत पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे; परंतु त्यासाठीचे सात लाख रुपये मी भरू शकत नसल्याचे पत्र मला पाठविले. तिचे वडील चालक आहेत. तिच्या शिक्षणासाठीच्या निधीचा धनादेश आपण रविवारी तिच्याकडे देणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले. अशा मुलींचे उच्च शिक्षण थांबणार नाही, याची काळजी सर्वांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर