शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कोल्हापूर : ‘अन्न-औषध’च्या कारवाईने गूळ व्यापारी अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:40 IST

अन्न-औषध प्रशासन विभागाने गुरुवारी बाजार समितीमधील गूळ व्यापाऱ्यांवर थेट कारवाई केल्याने व्यापाऱ्यांनी गूळ खरेदी न करण्याची भूमिका घेतली आहे. शनिवारी सौद्यात न उतरण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला; पण समिती प्रशासनाने मध्यस्थी करत सौदे सुरळीत केले. त्यानंतर अन्न-औषध विभागाशी चर्चा करून शेतकरी, अडते, व्यापाऱ्यांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्दे‘अन्न-औषध’च्या कारवाईने गूळ व्यापारी अस्वस्थपरवान्यासह गुळातील घटकांची केली तपासणी सर्वच घटकांची लवकरच बैठक

कोल्हापूर : अन्न-औषध प्रशासन विभागाने गुरुवारी बाजार समितीमधील गूळ व्यापाऱ्यांवर थेट कारवाई केल्याने व्यापाऱ्यांनी गूळ खरेदी न करण्याची भूमिका घेतली आहे. शनिवारी सौद्यात न उतरण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला; पण समिती प्रशासनाने मध्यस्थी करत सौदे सुरळीत केले. त्यानंतर अन्न-औषध विभागाशी चर्चा करून शेतकरी, अडते, व्यापाऱ्यांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला.गुळाचे उत्पादन करताना त्यातील घटकांचे प्रमाण नियमाने राखले जाते का? गूळ खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे परवाना आहे का? याबाबतची तपासणी करण्यासाठी अन्न-औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) केंबळकर यांची टीम गुरुवारी समितीत गेली. यावेळी त्यांनी गुळातील घटकांची तपासणी केली. यामध्ये गुळातील सल्फरचे प्रमाण १२० टक्क्यांपर्यंत आढळले.

नियमाने हे प्रमाण ७० टक्के अपेक्षित असते. त्याचबरोबर गुळातील घटकांचे प्रमाण रव्यावर चिकटवणे बंधनकारक आहे. त्यात व्यापाऱ्यांकडे अन्न-औषध विभागाचा परवाना नसल्याने त्यांनी तीन व्यापाऱ्यांना नोटिसा काढल्या.

गुळाचे उत्पादन शेतकरी करतात, मग शिक्षा आम्हाला का? अशी विचारणा करत सौदे न काढण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला. शनिवारी सौद्यापूर्वी व्यापाऱ्यांनी थोडे आढेवेढे घेतले; पण अन्न-औषध प्रशासनाशी चर्चा करण्याचे आश्वासन समितीने दिल्याने सौदे सुरळीत झाले.त्यानंतर शेतकरी, व्यापारी, अडत्यांची बैठक झाली. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना बोलाविण्याचा निर्णय झाला; पण सहायक आयुक्त केंबळकर यांनी नंतर बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

 

अन्न-औषध प्रशासनाने तीन व्यापाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत. याबाबत शेतकरी, व्यापारी, अडते व अन्न-औषध प्रशासन या घटकांशी चर्चा करण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन केले जाणार आहे.- मोहन सालपे,सचिव, बाजार समिती 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarket Yardमार्केट यार्ड