शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोल्हापूर :  जबरी, वाहन चोरी प्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 19:41 IST

जबरी व वाहन चोरी प्रकरणी तिघांना शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी (दि. २४) रात्री कसबा बावडा येथील नदीघाटाजवळ अटक केली.

ठळक मुद्देजबरी, वाहन चोरी प्रकरणी तिघांना अटकएक लाख ६५ हजारांचा माल जप्त : दोन दिवस पोलीस कोठडी

कोल्हापूर : जबरी व वाहन चोरी प्रकरणी तिघांना शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी (दि. २४) रात्री कसबा बावडा येथील नदीघाटाजवळ अटक केली.श्रावण भुजप्पा बुचडे (वय २०, रा. गोळीबार मैदान, कसबा बावडा, कोल्हापूर), राहुल भरत कसबे, (२२, रा. त्र्यंबोलीनगर, लाईन बाजार, कोल्हापूर) व हणमंत प्रकाश कांबळे (२४, रा. हनुमाननगर, सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून जबरीने चोरलेला एक व तीन असे चार मोबाईल, चोरीची दुचाकी व गुन्हा करण्याकरिता वापरलेली दुचाकी, असा एकूण एक लाख ६५ हजार रुपयांचा माल जप्त केला.पोलिसांनी सांगितले की, ताराबाई पार्क येथील अनिल शेलार हे गोव्याहून कोल्हापुरात पाच मे २०१८ ला मध्यवर्ती बसस्थानक येथे आले. रिक्षाथांब्यावरून ते रिक्षातून घरी गेले. त्यावेळी त्यांचा मोबाईल रिक्षात विसरला. त्यामुळे ते पुन्हा मध्यवर्ती बसस्थानक येथे आले.

अनिल शेलार यांनी आपल्या मोबाईलवर फोन केला असता फोनमधून त्यांना ‘शिवीगाळ करीत तुम्हाला मोबाईल पाहिजे असेल तर भगवा चौकात या’ असे सांगितले. त्यामुळे ते दुसरी रिक्षा करून सासने मैदान येथून जात असताना त्यांना पहिला रिक्षावाला दिसला. त्यांनी त्याला अडविले.

त्यावेळी रिक्षाचालक जुबेन शेख (रा. सोमवार पेठ) यांनी, तुमचा रिक्षात विसरलेला मोबाईल व माझा मोबाईल असे दोन मोबाईल आणि माझी थोडी रक्कम जबरदस्तीने घेऊन तिघे अज्ञात गेले असल्याचे शेलार यांना सांगितले. त्यानंतर अनिल शेलार यांनी फिर्याद दिली.या प्रकरणाचा तपास करीत असताना चोरलेल्या मोबाईलमधील एक मोबाईल अ‍ॅक्टिव्ह झाला. त्याप्रमाणे शुक्रवारी रात्री कसबा बावड्यातील नदीघाटाजवळ त्याना पकडले. त्यांच्यावर जबरी चोरी व एक वाहन चोरीचा असे दोन गुन्हे दाखल आहेत. संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. शनिवारी न्यायालयाने या तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय मोरे, सहायक निरीक्षक बालाजी भांगे व गुन्हे शोध पथकाने केली. तपास सहायक फौजदार दिलीप चौधरी करीत आहेत. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर