शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कोल्हापूर : अपात्र नगरसेवकांना कामकाजात भाग घेण्यास मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:49 IST

कोल्हापूर महानगरपालिकेतील १९ नगरसेवक पदावर राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांना येथून पुढे महापालिकेच्या कामकाजात भाग घेऊ देणार नाही. तसा निरोप संबंधित नगरसेवकांना दिला जाईल, अशी माहिती आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देअपात्र नगरसेवकांना कामकाजात भाग घेण्यास मज्जावआयुक्त चौधरी : औपचारिक निर्णयाची जबाबदारी सरकारची

कोल्हापूर : आरक्षीत प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे हे निवडणुक आयोगाच्या कायद्यानुसार बंधनकारक असून कोल्हापूर महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांनी या नियमाचा भंग केला असल्यामुळे ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्या दिवसापासून ते नगरसेवकपदावर राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांना येथून पुढे महापालिकेच्या कामकाजात भाग घेऊ देणार नाही. तसा निरोप संबंधित नगरसेवकांना दिला जाईल, अशी माहिती आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार संबंधित १९ नगरसेवकांना औपचारीक नोटीस देऊन नगरसेवक रद्दची कारवाई करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारच्या नगरविकास विभागाची असून तसे अधिकार २८ मार्च २०१६ च्या अधिसुचनेनुसार राज्य सरकारने आपल्याकडे घेतले आहेत. त्यामुळे पुढील कारवाई ही नगरविकास विभागामार्फतच होईल. आयुक्तस्तरावर याबाबत काहीही कारवाई होणार नाही, असे स्पष्टीकरण चौधरी यांनी यावेळी दिले.गेल्या काही दिवसात नगरसेवक अपात्रतेबाबत उलट सुलट बातम्या येत आहेत. या प्रकरणात महानगरपालिकाची कोणतीच भुमिका राहिलेली नाही. ज्या दिवशी न्यायालयाचा निकाल पुढे आला त्या दिवसापासून १९ नगरसेवकांचे पद पूर्वलक्षी प्रभावाने आपोआपच रद्द झाले आहे. आता त्यांना औपचारिकपणे कळविण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. म्हणूनच महापालिकेमार्फत आवश्यक ती सर्व माहिती नगरसेवकनिहाय सरकारला कळविली आहे. आम्हाला कारवाईचे अधिकार नसल्याने आम्ही सरकारकडून कोणतेही मार्गदर्शन मागविलेले नाही, असा खुलासही त्यांनी केला.यापुढे १९ अपात्र नगरसेवकांना ते नगरसेवकपदावर राहिलेलेच नसल्यामुळे महानगरपालिकेच्या कोणत्याही कामकाजात सहभाग घेता येणार नाही. तशी तोंडी समज नगरसचिव दिवाकर कारंडे हे नगरसेवकांसह महापौर व स्थायी समिती सभापतींना देतील. महापालिका म्हणून आमची जबाबदारी तेवढीच राहिल.आम्हाला कोणतीही घाईगडबड करायची नाही. संबंधित अपात्र नगरसेवकांना कामकाजात भाग घेण्यास मज्जाव केला नाही तर कोणत्या अधिकारात ते कामकाजात भाग घेत आहेत असे आम्हाला विचारले जाऊ शकते. संबंधित नगरसेवकांनाही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल माहित असल्यामुळे त्यांनी स्वत:हून कामकाजात भाग घेऊ नये. त्यांची ती जबाबदारी आहे, असे आयुक्त म्हणाले.

  1. महापालिकेतील १९ नगरसेवक अपात्र.
  2.  औपचारिक नोटीस देण्याचे अधिकार नगरविकास विभागास.
  3. आजच्या घडीला १९ नगरसेवकांचे पद रद्द, ते नगरसेवक राहिले नाहीत.
  4. महापालिकेचे कामकाज करण्यास मज्जाव.

 

मग कोणत्या अधिकारात सांगणार?आयुक्त अभिजित चौधरी यांनी १९ नगरसेवकांना अपात्रतेची औपचारीक नोटीस देण्याचा अधिकार हा राज्य सरकारच्या नगरविकास विभागाचा आहे असे सांगत आहेत. जर नगरविकास विभागाला तसा अधिकार असेल तर मग संबंधितांना कामकाजात भाग घेऊ नका असे तोंडी सांगण्याचा अधिकार मनपा अधिकाऱ्यांना कसा? असा प्रश्न या निमित्ताने तयार होणार आहे. या प्रश्नावरुन अधिकारी व नगरसेवक यांच्यात संघर्ष उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाCaste certificateजात प्रमाणपत्रkolhapurकोल्हापूर