शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कोल्हापूर : अपात्र नगरसेवकांना कामकाजात भाग घेण्यास मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:49 IST

कोल्हापूर महानगरपालिकेतील १९ नगरसेवक पदावर राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांना येथून पुढे महापालिकेच्या कामकाजात भाग घेऊ देणार नाही. तसा निरोप संबंधित नगरसेवकांना दिला जाईल, अशी माहिती आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देअपात्र नगरसेवकांना कामकाजात भाग घेण्यास मज्जावआयुक्त चौधरी : औपचारिक निर्णयाची जबाबदारी सरकारची

कोल्हापूर : आरक्षीत प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे हे निवडणुक आयोगाच्या कायद्यानुसार बंधनकारक असून कोल्हापूर महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांनी या नियमाचा भंग केला असल्यामुळे ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्या दिवसापासून ते नगरसेवकपदावर राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांना येथून पुढे महापालिकेच्या कामकाजात भाग घेऊ देणार नाही. तसा निरोप संबंधित नगरसेवकांना दिला जाईल, अशी माहिती आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार संबंधित १९ नगरसेवकांना औपचारीक नोटीस देऊन नगरसेवक रद्दची कारवाई करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारच्या नगरविकास विभागाची असून तसे अधिकार २८ मार्च २०१६ च्या अधिसुचनेनुसार राज्य सरकारने आपल्याकडे घेतले आहेत. त्यामुळे पुढील कारवाई ही नगरविकास विभागामार्फतच होईल. आयुक्तस्तरावर याबाबत काहीही कारवाई होणार नाही, असे स्पष्टीकरण चौधरी यांनी यावेळी दिले.गेल्या काही दिवसात नगरसेवक अपात्रतेबाबत उलट सुलट बातम्या येत आहेत. या प्रकरणात महानगरपालिकाची कोणतीच भुमिका राहिलेली नाही. ज्या दिवशी न्यायालयाचा निकाल पुढे आला त्या दिवसापासून १९ नगरसेवकांचे पद पूर्वलक्षी प्रभावाने आपोआपच रद्द झाले आहे. आता त्यांना औपचारिकपणे कळविण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. म्हणूनच महापालिकेमार्फत आवश्यक ती सर्व माहिती नगरसेवकनिहाय सरकारला कळविली आहे. आम्हाला कारवाईचे अधिकार नसल्याने आम्ही सरकारकडून कोणतेही मार्गदर्शन मागविलेले नाही, असा खुलासही त्यांनी केला.यापुढे १९ अपात्र नगरसेवकांना ते नगरसेवकपदावर राहिलेलेच नसल्यामुळे महानगरपालिकेच्या कोणत्याही कामकाजात सहभाग घेता येणार नाही. तशी तोंडी समज नगरसचिव दिवाकर कारंडे हे नगरसेवकांसह महापौर व स्थायी समिती सभापतींना देतील. महापालिका म्हणून आमची जबाबदारी तेवढीच राहिल.आम्हाला कोणतीही घाईगडबड करायची नाही. संबंधित अपात्र नगरसेवकांना कामकाजात भाग घेण्यास मज्जाव केला नाही तर कोणत्या अधिकारात ते कामकाजात भाग घेत आहेत असे आम्हाला विचारले जाऊ शकते. संबंधित नगरसेवकांनाही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल माहित असल्यामुळे त्यांनी स्वत:हून कामकाजात भाग घेऊ नये. त्यांची ती जबाबदारी आहे, असे आयुक्त म्हणाले.

  1. महापालिकेतील १९ नगरसेवक अपात्र.
  2.  औपचारिक नोटीस देण्याचे अधिकार नगरविकास विभागास.
  3. आजच्या घडीला १९ नगरसेवकांचे पद रद्द, ते नगरसेवक राहिले नाहीत.
  4. महापालिकेचे कामकाज करण्यास मज्जाव.

 

मग कोणत्या अधिकारात सांगणार?आयुक्त अभिजित चौधरी यांनी १९ नगरसेवकांना अपात्रतेची औपचारीक नोटीस देण्याचा अधिकार हा राज्य सरकारच्या नगरविकास विभागाचा आहे असे सांगत आहेत. जर नगरविकास विभागाला तसा अधिकार असेल तर मग संबंधितांना कामकाजात भाग घेऊ नका असे तोंडी सांगण्याचा अधिकार मनपा अधिकाऱ्यांना कसा? असा प्रश्न या निमित्ताने तयार होणार आहे. या प्रश्नावरुन अधिकारी व नगरसेवक यांच्यात संघर्ष उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाCaste certificateजात प्रमाणपत्रkolhapurकोल्हापूर