शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
3
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
4
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
5
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
6
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
7
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
8
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
9
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
10
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
11
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
12
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
13
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
14
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
15
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!
16
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
17
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
18
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
19
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
20
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....

कोल्हापूर : बदलत्या काळानुसार गतिशील राहून उद्योजकता वाढवा : गिरीष चितळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:36 PM

उद्योजकांनी बदलत्या काळाप्रमाणे गतिशील राहून आपली उद्योजकता वाढविली पाहिजे, तरच उत्पादकांची क्षमता वाढवून दर्जेदार उत्पादन निर्माण करण्याचे समाधान मिळते, असे प्रतिपादन चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीष चितळे यांनी येथे केले.

ठळक मुद्देबदलत्या काळानुसार गतिशील राहून उद्योजकता वाढवा  : गिरीष चितळेसॅटर्डे क्लबतर्फे किरण पाटील उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : उद्योजकांनी बदलत्या काळाप्रमाणे गतिशील राहून आपली उद्योजकता वाढविली पाहिजे, तरच उत्पादकांची क्षमता वाढवून दर्जेदार उत्पादन निर्माण करण्याचे समाधान मिळते, असे प्रतिपादन चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीष चितळे यांनी येथे केले.येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे आयोजित ‘कोल्हापूर उद्योगरत्न’ पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सॅटर्डे क्लबचे अध्यक्ष अशोक दुगाडे, महापौर शोभा बोंद्रे, मधुरिमाराजे, सॅटर्डे क्लबचे विश्वस्त प्रदीप ताम्हाणे प्रमुख उपस्थित होते.

घाटगे पाटील इंडस्ट्रीजचे चेअरमन किरण पाटील यांना चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीष चितळे यांच्या हस्ते कोल्हापूर उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी गिरीष चितळे म्हणाले, कोल्हापूर ही उद्योगनगरी आहे. येथील उद्योजकता हे मोठे नेतृत्व आहे. हे वास्तव नाकारता येत नाही. मात्र, बदलत्या काळाप्रमाणे उद्योजकांनी बदल स्वीकारून आपला उद्योग वाढविण्यासाठी गतिमान राहणे आवश्यक आहे. किरण पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या मातीने मला भरूभरून दिले आहे. हा पुरस्कार मला पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.कार्यक्रमास महेश यादव, श्रीकृष्ण पाटील, योगेश कुलकर्णी, ओंकार देशपांडे, राजू पाटील, हरिश्चंद्र धोत्रे, सुधीर राऊत, नितीन वाडीकर, नवीन महाजन, एच. सी. मित्तल, सूरजितसिंग पवार, विजय पाटील, हर्षवर्धन भुरके, आदी मान्यवर उपस्थित होते. मनोज गुणे यांनी प्रास्ताविक केले. दिशा पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. जयेश पाटील यांनी आभार मानले.

नियमित विमानसेवेची प्रतीक्षाउद्योगाला पूरक असणाऱ्या विविध गोष्टी कोल्हापूरमध्ये आहेत. मात्र, येथे दळणवळणाचे प्रभावी साधन उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोल्हापुरात नियमित विमानसेवा कधी सुरू होते याची आम्ही उद्योजक प्रतीक्षा करीत आहोत, असे गिरीष चितळे यांनी सांगितले. ते म्हणाले, उद्योगात मराठी माणूस स्थिर होत आहे. स्वत:ची क्षमता सिद्ध करीत आहे.

 

 

टॅग्स :businessव्यवसायkolhapurकोल्हापूर