शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

साखर उतारा ०.३९ टक्क्यांनी घटल्याचा परिणाम : पुढील हंगामातील कोल्हापूरची एफआरपीमध्ये ५० रुपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:07 IST

आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १०, तर सांगलीतील एक कारखान्याचा हंगाम बंद झाला आहे. मार्चअखेर बहुतांश कारखान्यांची, तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एक-दोन कारखान्यांची धुराडी थंडावणार आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील अकरा ११ साखर कारखान्यांचे हंगाम बंद झाले असून, आतापर्यंत एक कोटी ६७ लाख टन गाळप झाले आहे. या महिन्याअखेर बहुतांश कारखाने, तर एक-दोन कारखाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद होण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ४६ लाख टनांनी हंगाम मागे असला तरी उर्वरित कालावधीत २०-२५लाख टन गाळप होऊ शकते.

गतवर्षीपेक्षा कोल्हापूर जिल्ह्याचा उतारा सध्या ०.२२ टक्क्यांनी कमी दिसत असल्याने पुढील हंगामातील ‘एफआरपी’मध्ये ५० रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी, महापूर आणि परतीच्या पावसाने झोडपल्याने साखर कारखान्यांच्या यंदाच्या हंगामासमोर उसाचे संकट होते. त्यामुळे मागील हंगामातील गाळपाच्या तुलनेत निम्म्यावर ऊस उत्पादन होईल, असा अंदाज होता. गाळप हंगामही उशिरा सुरू झाल्याने अद्याप कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १०, तर सांगलीतील एक कारखान्याचा हंगाम बंद झाला आहे. मार्चअखेर बहुतांश कारखान्यांची, तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एक-दोन कारखान्यांची धुराडी थंडावणार आहेत.

आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात एक कोटी १० लाख २१ हजार ३५१, तर सांगली जिल्ह्यात ५७ लाख १९ हजार ५७८ असे विभागात एक कोटी ६७ लाख ४० हजार ९२९ टनांचे गाळप झाले. सरासरी १२.१५ टक्के साखर उतारा राखत दोन कोटी ३ लाख ४२ हजार ७६५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत सांगली जिल्ह्यातील कारखान्यांचे २४ लाख ३३ हजार ८२६ टनांनी, तर कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांचे २२ लाख १६ हजार ४०२ टनांनी गाळप कमी झाले आहे. हंगाम संपायला अजून पंधरा-वीस दिवस आहेत. सध्या कारखान्यांचे गाळप पाहता दोन्ही जिल्ह्यांत अजून २० ते २५ लाख टन गाळप होण्याची शक्यता आहे. महापूर आणि अतिवृष्टीने उसाच्या उत्पादनाबरोबरच साखर उताऱ्याला मोठा फटका बसेल, असे वाटत होते. मात्र विभागाच्या सरासरी उताºयात ०.२२ टक्क्यांनी घट झाली आहे. 

सांगलीच्या ‘एफआरपी’वर परिणाम नाहीसांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप २४ लाख टनांनी कमी झाले असले तरी साखर उताºयात वाढच दिसत आहे. गेल्या हंगामात जिल्ह्याचा सरासरी उतारा १२.१३ टक्के होता, तो आता १२.१८ टक्के असून, शेवटच्या टप्प्यातील गाळपानंतर तो वाढण्याची शक्यता आहे. परिणामी सांगलीच्या एफआरपीवर कोणताही परिणाम होणार नाही. 

या कारखान्यांचा हंगाम संपलादौलत (अथर्व ट्रेडर्स), संताजी घोरपडे, भोगावती, आप्पासाहेब नलवडे, डी. वाय. पाटील, उदयसिंगराव गायकवाड (अथणी) , इंदिरा महिला (अथणी), रिलायबल फराळे, इको केन (म्हाळुंगे), कुंभी, मोहनराव शिंदे.

 

गतहंगामाच्या तुलनेत फार गाळप कमी होईल असे वाटत होते, तसे दिसत नाही. साखर उताराही जवळपास गतवर्षीएवढाच राहील, असा अंदाज आहे.- अरुण काकडे (प्रादेशिक साखर सहसंचालक) 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने