शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कोल्हापूर : गवत, चिंच, नारळाचा शिवाजी विद्यापीठाच्या उत्पन्नाला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 11:40 IST

गवत, विविध रोपे, चिंच आणि नारळ यांच्या विक्रीतून शिवाजी विद्यापीठाच्या उत्पन्नवाढीला हातभार लागत आहे. या विक्रीतून वर्षाकाठी विद्यापीठाला सुमारे पाच लाख रुपये मिळतात.

ठळक मुद्दे गवत, चिंच, नारळाचा शिवाजी विद्यापीठाच्या उत्पन्नाला हातभारवर्षाकाठी मिळतात पाच लाख रुपये; वृक्ष संवर्धनाचा खर्च

संतोष मिठारी

कोल्हापूर : गवत, विविध रोपे, चिंच आणि नारळ यांच्या विक्रीतून शिवाजी विद्यापीठाच्या उत्पन्नवाढीला हातभार लागत आहे. या विक्रीतून वर्षाकाठी विद्यापीठाला सुमारे पाच लाख रुपये मिळतात.विद्यापीठाचा परिसर ८५० एकरांमध्ये पसरलेला आहे. वृक्षांचा आणि मोकळा परिसर असलेल्या ६०० एकर परिसरात गवत उगविते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा ते अज्ञातांकडून पेटविण्याचा प्रकार होतो.

या आगीमुळे झाडांची हानी होते. त्यामुळे विद्यापीठातर्फे दरवर्षी निविदा पद्धतीने या गवताची विक्री केली जाते. त्यातून सुमारे चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. पर्यावरणशास्त्र विभाग, प्रौढ निरंतर शिक्षण विभाग आणि विद्यापीठाच्या मुख्य इमारत परिसरात चिंच आणि लोककला केंद्राच्या मागील बाजूस नारळाची झाडे आहेत. त्यांच्या विक्रीमधून साधारणत: २५ हजार रुपये मिळतात.

हे उत्पन्न विद्यापीठ परिसरातील झाडांच्या संवर्धनासाठी खर्च केले जाते. दरम्यान, गेल्या वर्षी विद्यापीठाने संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या मागील विहिरीच्या परिसरात नारळाची १६१ झाडे लावली. त्यात यावर्षी ४० झाडांची भर पडणार आहे.

आठ नंबरचे प्रवेशद्वार ते क्रांतिवन मार्गावरील दोन्ही बाजूंना चिंचेची आणि मुद्रणालयाच्या परिसरात आवळ्याची प्रत्येकी २०० झाडे लावली आहेत. त्यांतून येत्या काही वर्षांत विद्यापीठातील जैवविविधतेला बळ आणि उत्पन्नवाढीसाठीचा हातभार वाढणार आहे.

सव्वा लाख रोपांची विक्रीविद्यापीठातील वनस्पतिशास्त्र अधिविभागातील लीड बॉटनिकल गार्डनद्वारे स्थानिक, डोंगरी परिसरातील विविध प्रजातींच्या रोपांची नाममात्र दरात विक्री केली जाते. काही सामाजिक संस्थांना ती मोफत दिली जातात.

दरवर्षी विविध रोपांच्या विक्रीतून सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. गेल्या वर्षी विभागाने सव्वा लाख रोपे वितरित केली. त्यातील सुमारे ४० हजार रोपांच्या विक्रीतून दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याचे वनस्पतिशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ. डी. के. गायकवाड यांनी सांगितले.

आग लागून झाडांची हानी होऊ नये म्हणून गवत आणि पक्ष्यांनी खाऊन राहिलेल्या फळांची विक्री केली जाते. पैसे मिळविणे हा त्यामागील उद्देश नाही. जैवविविधतेला बळ देण्यासाठी या वर्षी नारळ, आवळा आणि चिंचेची झाडे लावली आहेत. फळझाडांमध्ये स्थानिक प्रजातींची झाडे आवर्जून लावली जात आहेत.-डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, उद्यान विभाग, शिवाजी विद्यापीठ 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर