शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

कोल्हापूर : गवत, चिंच, नारळाचा शिवाजी विद्यापीठाच्या उत्पन्नाला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 11:40 IST

गवत, विविध रोपे, चिंच आणि नारळ यांच्या विक्रीतून शिवाजी विद्यापीठाच्या उत्पन्नवाढीला हातभार लागत आहे. या विक्रीतून वर्षाकाठी विद्यापीठाला सुमारे पाच लाख रुपये मिळतात.

ठळक मुद्दे गवत, चिंच, नारळाचा शिवाजी विद्यापीठाच्या उत्पन्नाला हातभारवर्षाकाठी मिळतात पाच लाख रुपये; वृक्ष संवर्धनाचा खर्च

संतोष मिठारी

कोल्हापूर : गवत, विविध रोपे, चिंच आणि नारळ यांच्या विक्रीतून शिवाजी विद्यापीठाच्या उत्पन्नवाढीला हातभार लागत आहे. या विक्रीतून वर्षाकाठी विद्यापीठाला सुमारे पाच लाख रुपये मिळतात.विद्यापीठाचा परिसर ८५० एकरांमध्ये पसरलेला आहे. वृक्षांचा आणि मोकळा परिसर असलेल्या ६०० एकर परिसरात गवत उगविते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा ते अज्ञातांकडून पेटविण्याचा प्रकार होतो.

या आगीमुळे झाडांची हानी होते. त्यामुळे विद्यापीठातर्फे दरवर्षी निविदा पद्धतीने या गवताची विक्री केली जाते. त्यातून सुमारे चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. पर्यावरणशास्त्र विभाग, प्रौढ निरंतर शिक्षण विभाग आणि विद्यापीठाच्या मुख्य इमारत परिसरात चिंच आणि लोककला केंद्राच्या मागील बाजूस नारळाची झाडे आहेत. त्यांच्या विक्रीमधून साधारणत: २५ हजार रुपये मिळतात.

हे उत्पन्न विद्यापीठ परिसरातील झाडांच्या संवर्धनासाठी खर्च केले जाते. दरम्यान, गेल्या वर्षी विद्यापीठाने संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या मागील विहिरीच्या परिसरात नारळाची १६१ झाडे लावली. त्यात यावर्षी ४० झाडांची भर पडणार आहे.

आठ नंबरचे प्रवेशद्वार ते क्रांतिवन मार्गावरील दोन्ही बाजूंना चिंचेची आणि मुद्रणालयाच्या परिसरात आवळ्याची प्रत्येकी २०० झाडे लावली आहेत. त्यांतून येत्या काही वर्षांत विद्यापीठातील जैवविविधतेला बळ आणि उत्पन्नवाढीसाठीचा हातभार वाढणार आहे.

सव्वा लाख रोपांची विक्रीविद्यापीठातील वनस्पतिशास्त्र अधिविभागातील लीड बॉटनिकल गार्डनद्वारे स्थानिक, डोंगरी परिसरातील विविध प्रजातींच्या रोपांची नाममात्र दरात विक्री केली जाते. काही सामाजिक संस्थांना ती मोफत दिली जातात.

दरवर्षी विविध रोपांच्या विक्रीतून सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. गेल्या वर्षी विभागाने सव्वा लाख रोपे वितरित केली. त्यातील सुमारे ४० हजार रोपांच्या विक्रीतून दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याचे वनस्पतिशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ. डी. के. गायकवाड यांनी सांगितले.

आग लागून झाडांची हानी होऊ नये म्हणून गवत आणि पक्ष्यांनी खाऊन राहिलेल्या फळांची विक्री केली जाते. पैसे मिळविणे हा त्यामागील उद्देश नाही. जैवविविधतेला बळ देण्यासाठी या वर्षी नारळ, आवळा आणि चिंचेची झाडे लावली आहेत. फळझाडांमध्ये स्थानिक प्रजातींची झाडे आवर्जून लावली जात आहेत.-डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, उद्यान विभाग, शिवाजी विद्यापीठ 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर