शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

कोल्हापूर : ‘अनुलोम’मुळे शासकीय योजना सामान्यांपर्यंत : चंद्रकांत दळवी, पंधरा अधिकारी पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 11:08 IST

लोककल्याणासाठी शासनाने केलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजना तळागाळांतील घटकांपर्यंत पोहोचविण्यामध्ये ‘अनुलोम’ या सामाजिक संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. विविध कार्यक्षेत्रांत काम करणाऱ्या अशा संस्थांनी एकत्र येऊन या कामाचे अनुकरण करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले. यावेळी १५ शासकीय अधिकाऱ्यांचा ‘अनुलोम सन्मित्र’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.

ठळक मुद्दे ‘अनुलोम अ‍ॅप’च्या माध्यमातून ७.५० लाख लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना १५ शासकीय अधिकाऱ्यांचा ‘अनुलोम सन्मित्र’ पुरस्काराने गौरव

कोल्हापूर : लोककल्याणासाठी शासनाने केलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजना तळागाळांतील घटकांपर्यंत पोहोचविण्यामध्ये ‘अनुलोम’ या सामाजिक संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. विविध कार्यक्षेत्रांत काम करणाऱ्या अशा संस्थांनी एकत्र येऊन या कामाचे अनुकरण करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले. यावेळी १५ शासकीय अधिकाऱ्यांचा ‘अनुलोम सन्मित्र’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.‘अनुगामी लोकराज्य महाअभियान’ पश्चिम महाराष्ट्र विकास मेळाव्याचे आयोजन राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन दळवी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.दळवी म्हणाले, अशा संस्थांना सहकार्य करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनीही सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. अशा संस्थांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या कामाचा लाभ सर्वसामान्यांना होणे हेच शासनाचे उद्दिष्ट आहे.

धर्मादाय सह.आयुक्त निवेदिता पवार यांनी आपल्या विभागाच्या कामकाजातही यापुढे ‘अनुलोम’चा प्रभावी पद्धतीने वापर करून घेऊ, असे सांगून नागरिकांनी ‘अनुलोम’ अ‍ॅपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फायदा करून घ्यावा, असे आवाहनही केले.सांगलीचे जिल्हाधिकारी विजयराव काळम-पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यात मार्चअखेरपर्यंत १००० हृदयशस्त्रक्रिया करण्याचा संकल्प केला आहे. ‘अनुलोम’च्या सहकार्याने जलयुक्त शिवारमध्येही भरीव काम करण्यात येत आहे.

‘अनुलोम’चे चंद्रकांत पवार यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, १८ महिन्यांपासून सुरू करण्यात आलेल्या या संस्थेने ७.५० लाख लोकांपर्यंत ‘अनुलोम अ‍ॅप’च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना पोहोचविल्या.

७५७०० जनसेवक यामध्ये काम करत आहेत. सुमारे २५ हजार लोकांना योजनांचे लाभ मिळवून देण्यात आले आहेत. येत्या काळात ५ हजार पाझर तलाव व ७६२ गावतलावातील गाळ काढण्यात येणार आहे.यावेळी पारस ओसवाल, मुकुंद भावे, पद्माताई कुबेर, प्रशांत कडोले, गिरीष चितळे, विलासराव चौथाई यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

या अधिकाऱ्यांचा झाला गौरवयावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘अनुलोम सन्मित्र’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यामध्ये विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, सांगलीचे जिल्हाधिकारी विजयराव काळम-पाटील, कोल्हापूर कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, इचकरंजीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, तहसीलदार (तासगांव) सुधाकर भोसले, तहसीलदार (माण) सुरेखा माने, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, डॉ. एकनाथ बोधले, साताऱ्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, तहसीलदार (अक्कलकोट) दीपक वजाळे, तालुका कृषी अधिकारी (कोरेगाव) सुनील साळुंखे यांचा समावेश होता.

अनुलोम संस्थेच्यावतीने आयोजित विकास मेळाव्याध्ये शुक्रवारी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शंकरराव कुलकर्णी, मुकुंद भावे, चंद्रकांत पवार, पद्माताई कुबेर, प्रशांत कडोले, गिरीष चितळे, विलासराव चौथाई उपस्थित होते. 

 

टॅग्स :commissionerआयुक्तkolhapurकोल्हापूर