शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची लढाई अजून संपलेली नाही, सतेज पाटील यांचे हाळवणकरांना प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 18:45 IST

‘गोकुळ’ दूध संघातील भ्रष्टाचाराविरोधातील लढाई अजून संपलेली नाही. जोपर्यंत या ठिकाणी काहीजणांनी चालविलेले दुकान बंद करून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दुकान सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, हे आमदार सुरेश हाळवणकरांनी लक्षात घ्यावे, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी येथे प्रत्युत्तर दिले.

ठळक मुद्दे ‘गोकुळ’ची लढाई अजून संपलेली नाहीसतेज पाटील यांचे हाळवणकरांना प्रत्युत्तरपालकमंत्र्यांकडे कला महोत्सव घेण्यासाठीच वेळ

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघातील भ्रष्टाचाराविरोधातील लढाई अजून संपलेली नाही. जोपर्यंत या ठिकाणी काहीजणांनी चालविलेले दुकान बंद करून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दुकान सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, हे आमदार सुरेश हाळवणकरांनी लक्षात घ्यावे, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी येथे प्रत्युत्तर दिले. त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कला महोत्सव घ्यायला वेळ आहे; पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेळ नाही, अशा शब्दांत त्यांनी टीकाही केली.कर्जमाफीसंदर्भात आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटारसायकल रॅली काढून निदर्शने केली. यावेळी ते बोलत होते. भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभात आ. हाळवणकरांनी खासदार धनंजय महाडिक यांना ‘भाजपमध्ये या, मंत्री करू,’ असे निमंत्रण देत ‘गोकुळ’विरोधातील विरोधकांचा आवाज बंद केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले होते. त्या वक्तव्याचा आमदार सतेज पाटील यांनी यावेळी समाचार घेतला.

‘गोकुळ’मधील भ्रष्टाचाराविरोधातील लढाई अजून संपलेली नाही. आम्ही त्याविरोधात सहकार न्यायालयात गेलो असून, तीन महिन्यांत याचा निर्णय झाला नाही तर उच्च न्यायालयातही दाद मागणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. ‘गोकुळ’मधील भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी करून पुरावेही सरकारला सादर केले आहेत. त्यामुळे हिंमत असेल तर सरकारच्या माध्यमातून आ. हाळवणकरांनी या ठिकाणी प्रशासक नेमावा, असे आव्हानही आ. पाटील यांनी दिले.

पालकमंत्र्यांना कला महोत्सव घ्यायला वेळ आहे; परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेळ नाही. ज्यांना शेतकऱ्यांबद्दल आत्मीयताच नाही अशी माणसे सत्तेत बसली आहेत; त्यामुळे आपल्याला संघर्षच करावा लागेल, असे आ. पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घालण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे. यासाठी एखादी बैठक घ्यावी; परंतु त्यांच्याकडून असे होत नाही. गेल्या काही महिन्यात साखरेचे दर घसरले असून साखर कारखानदार अडचणीत आहेत. त्यासाठी त्यांनी बैठक बोलवावी, अशी मागणी करूनही पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याची टीका, आ. पाटील यांनी केली.

आता हाळवणकरही मंत्रिपद वाटायला लागलेयापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे मंत्रिपद वाटत होते; परंतु आता आ. हाळवणकरही पदे वाटत असून, नंतर महेश जाधवही मंत्रिपदे वाटतील. त्यामुळे भाजपमध्ये आता काही खरे नाही, अशा शब्दांत आ. सतेज पाटील यांनी आ. हाळवणकरांच्या वक्तव्याची खिल्ली उडविली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील