शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची लढाई अजून संपलेली नाही, सतेज पाटील यांचे हाळवणकरांना प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 18:45 IST

‘गोकुळ’ दूध संघातील भ्रष्टाचाराविरोधातील लढाई अजून संपलेली नाही. जोपर्यंत या ठिकाणी काहीजणांनी चालविलेले दुकान बंद करून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दुकान सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, हे आमदार सुरेश हाळवणकरांनी लक्षात घ्यावे, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी येथे प्रत्युत्तर दिले.

ठळक मुद्दे ‘गोकुळ’ची लढाई अजून संपलेली नाहीसतेज पाटील यांचे हाळवणकरांना प्रत्युत्तरपालकमंत्र्यांकडे कला महोत्सव घेण्यासाठीच वेळ

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघातील भ्रष्टाचाराविरोधातील लढाई अजून संपलेली नाही. जोपर्यंत या ठिकाणी काहीजणांनी चालविलेले दुकान बंद करून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दुकान सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, हे आमदार सुरेश हाळवणकरांनी लक्षात घ्यावे, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी येथे प्रत्युत्तर दिले. त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कला महोत्सव घ्यायला वेळ आहे; पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेळ नाही, अशा शब्दांत त्यांनी टीकाही केली.कर्जमाफीसंदर्भात आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटारसायकल रॅली काढून निदर्शने केली. यावेळी ते बोलत होते. भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभात आ. हाळवणकरांनी खासदार धनंजय महाडिक यांना ‘भाजपमध्ये या, मंत्री करू,’ असे निमंत्रण देत ‘गोकुळ’विरोधातील विरोधकांचा आवाज बंद केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले होते. त्या वक्तव्याचा आमदार सतेज पाटील यांनी यावेळी समाचार घेतला.

‘गोकुळ’मधील भ्रष्टाचाराविरोधातील लढाई अजून संपलेली नाही. आम्ही त्याविरोधात सहकार न्यायालयात गेलो असून, तीन महिन्यांत याचा निर्णय झाला नाही तर उच्च न्यायालयातही दाद मागणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. ‘गोकुळ’मधील भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी करून पुरावेही सरकारला सादर केले आहेत. त्यामुळे हिंमत असेल तर सरकारच्या माध्यमातून आ. हाळवणकरांनी या ठिकाणी प्रशासक नेमावा, असे आव्हानही आ. पाटील यांनी दिले.

पालकमंत्र्यांना कला महोत्सव घ्यायला वेळ आहे; परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेळ नाही. ज्यांना शेतकऱ्यांबद्दल आत्मीयताच नाही अशी माणसे सत्तेत बसली आहेत; त्यामुळे आपल्याला संघर्षच करावा लागेल, असे आ. पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घालण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे. यासाठी एखादी बैठक घ्यावी; परंतु त्यांच्याकडून असे होत नाही. गेल्या काही महिन्यात साखरेचे दर घसरले असून साखर कारखानदार अडचणीत आहेत. त्यासाठी त्यांनी बैठक बोलवावी, अशी मागणी करूनही पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याची टीका, आ. पाटील यांनी केली.

आता हाळवणकरही मंत्रिपद वाटायला लागलेयापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे मंत्रिपद वाटत होते; परंतु आता आ. हाळवणकरही पदे वाटत असून, नंतर महेश जाधवही मंत्रिपदे वाटतील. त्यामुळे भाजपमध्ये आता काही खरे नाही, अशा शब्दांत आ. सतेज पाटील यांनी आ. हाळवणकरांच्या वक्तव्याची खिल्ली उडविली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील