शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
6
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
7
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
8
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
9
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
10
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
11
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
12
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
13
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
14
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
15
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
17
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
18
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
19
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
20
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ऊसदरासाठी सरकारला सनदशीर मार्गाने नमवू, संपतराव पवार-पाटील यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 17:31 IST

ऊस दराच्या बाबतीत फक्त घोषणांचा पाऊस पाडणारं व शेतकऱ्यांना हाताहात फसवणाऱ्या या करंट्या सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे, ऊसाला विनाकपात एकरकमी ३५०० रुपये दर दिलाच पाहिजे यासाठी सरकारला सनदशीर मार्गाने नमवू तसेच भविष्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी शेतकऱ्यांना केले.

ठळक मुद्दे ऊसदरासाठी सरकारला सनदशीर मार्गाने नमवू, संपतराव पवार-पाटील यांचा इशाराशेकापचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; शेतकऱ्याला फसविणाऱ्या सरकारला हद्दपार करा

कोल्हापूर : ऊस दराच्या बाबतीत फक्त घोषणांचा पाऊस पाडणारं व शेतकऱ्यांना हाताहात फसवणाऱ्या या करंट्या सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे, ऊसाला विनाकपात एकरकमी ३५०० रुपये दर दिलाच पाहिजे यासाठी सरकारला सनदशीर मार्गाने नमवू तसेच भविष्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी शेतकऱ्यांना केले.शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांच्या विवीध प्रश्नासाठी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात ‘इन्कलाब झिंदाबाद’च्या घोषणां दिल्या. मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी केले. शेकाप कार्यालयापासून मोर्चाला प्रारंभ झाला.

हातात शेकापचे लाल झेंडे, डोक्यावर टोप्या, गळ्यात स्कार्प घेऊन घोषणा देत शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. तेथे मोर्चाचे रुपांतर जाहिर सभेत झाले. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, एफआरपी ची रक्कम १४ दिवसात मिळावी, विनाकपात ३५०० रुपये दर ऊसाला मिळावा, गोकुळ मल्टीस्टेट करण्यास शासनाने परवानगी देऊ नये आदी घोषणांचा उहापोह अनेक नेत्यांनी आपल्या भाषणातून केला.

यावेळी अनेक नेत्यांची भाषणे झाली. शिष्ठमंडळाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंद यांना शिष्ठमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रा. टी. एस. पाटील, दत्तात्रय पाटील, बाबुराव कदम, अशोकराव पवार, अंबाजी पाटील, वसंत कांबळे, संतराम पाटील, शामराव मुळीक, सुभाष सावंत, चंद्रकांत बागडी, बाबासाहेब देवकर, सरदार पाटील, एकनाथ पाटील, सुशांत बोरगे, भिमराव कदम यांच्यासह उज्वला कदम, मिनाक्षी पाटील, वैशाली खाडे, पूजा पाटील, पदमा पाटील, जिजाबाई सुतार आदींचा सहभाग होता.

शेतकरी महिलेच्या वेशभूषाडोक्यावर बुट्टी घेऊन महिला महिला शेतकरी वेशभूषेत मोर्चात सहभागी झालेल्या मुलींनी साºयांचे लक्ष वेधले. तर मोर्चाच्या अग्रभागी बैलगाडीत निर्धार मोर्चाचा फलकही झळकत होता.

मोर्चातील प्रमुख मागण्या..१)शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे२)ऊसाची एफआरपी’ एकरकमी १४ दिवसात मिळावी, ऊसाला प्रतिटन विनाकपात ३५०० रुपये मिळावे३)गोकुळ मल्टीस्टेट करण्यास शासनाने परवानगी देऊ नये.४)स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे सर्व शेती मालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव मिळावा५)म्हैस दुधाला प्रतिलिटर ६० रुपये, गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३० रुपये भाव द्या६)गुळाला प्रति क्विंटल किमान ५००० रुपये भाव द्या७) शेतीमालाची हमीभावाने खरेदी करणारी शासकिय खरेदी केंद्रे बाजारनिहाय सुरु करावीत 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर