शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

कोल्हापूर : ऊसदरासाठी सरकारला सनदशीर मार्गाने नमवू, संपतराव पवार-पाटील यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 17:31 IST

ऊस दराच्या बाबतीत फक्त घोषणांचा पाऊस पाडणारं व शेतकऱ्यांना हाताहात फसवणाऱ्या या करंट्या सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे, ऊसाला विनाकपात एकरकमी ३५०० रुपये दर दिलाच पाहिजे यासाठी सरकारला सनदशीर मार्गाने नमवू तसेच भविष्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी शेतकऱ्यांना केले.

ठळक मुद्दे ऊसदरासाठी सरकारला सनदशीर मार्गाने नमवू, संपतराव पवार-पाटील यांचा इशाराशेकापचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; शेतकऱ्याला फसविणाऱ्या सरकारला हद्दपार करा

कोल्हापूर : ऊस दराच्या बाबतीत फक्त घोषणांचा पाऊस पाडणारं व शेतकऱ्यांना हाताहात फसवणाऱ्या या करंट्या सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे, ऊसाला विनाकपात एकरकमी ३५०० रुपये दर दिलाच पाहिजे यासाठी सरकारला सनदशीर मार्गाने नमवू तसेच भविष्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी शेतकऱ्यांना केले.शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांच्या विवीध प्रश्नासाठी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात ‘इन्कलाब झिंदाबाद’च्या घोषणां दिल्या. मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी केले. शेकाप कार्यालयापासून मोर्चाला प्रारंभ झाला.

हातात शेकापचे लाल झेंडे, डोक्यावर टोप्या, गळ्यात स्कार्प घेऊन घोषणा देत शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. तेथे मोर्चाचे रुपांतर जाहिर सभेत झाले. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, एफआरपी ची रक्कम १४ दिवसात मिळावी, विनाकपात ३५०० रुपये दर ऊसाला मिळावा, गोकुळ मल्टीस्टेट करण्यास शासनाने परवानगी देऊ नये आदी घोषणांचा उहापोह अनेक नेत्यांनी आपल्या भाषणातून केला.

यावेळी अनेक नेत्यांची भाषणे झाली. शिष्ठमंडळाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंद यांना शिष्ठमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रा. टी. एस. पाटील, दत्तात्रय पाटील, बाबुराव कदम, अशोकराव पवार, अंबाजी पाटील, वसंत कांबळे, संतराम पाटील, शामराव मुळीक, सुभाष सावंत, चंद्रकांत बागडी, बाबासाहेब देवकर, सरदार पाटील, एकनाथ पाटील, सुशांत बोरगे, भिमराव कदम यांच्यासह उज्वला कदम, मिनाक्षी पाटील, वैशाली खाडे, पूजा पाटील, पदमा पाटील, जिजाबाई सुतार आदींचा सहभाग होता.

शेतकरी महिलेच्या वेशभूषाडोक्यावर बुट्टी घेऊन महिला महिला शेतकरी वेशभूषेत मोर्चात सहभागी झालेल्या मुलींनी साºयांचे लक्ष वेधले. तर मोर्चाच्या अग्रभागी बैलगाडीत निर्धार मोर्चाचा फलकही झळकत होता.

मोर्चातील प्रमुख मागण्या..१)शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे२)ऊसाची एफआरपी’ एकरकमी १४ दिवसात मिळावी, ऊसाला प्रतिटन विनाकपात ३५०० रुपये मिळावे३)गोकुळ मल्टीस्टेट करण्यास शासनाने परवानगी देऊ नये.४)स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे सर्व शेती मालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव मिळावा५)म्हैस दुधाला प्रतिलिटर ६० रुपये, गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३० रुपये भाव द्या६)गुळाला प्रति क्विंटल किमान ५००० रुपये भाव द्या७) शेतीमालाची हमीभावाने खरेदी करणारी शासकिय खरेदी केंद्रे बाजारनिहाय सुरु करावीत 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर