शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पोलिसांची गांधीगिरी, ‘शाहूं’च्या पुतळ्याने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 11:18 IST

पोलीस सामान्यांपेक्षा वेगळे असतात, अशी अजूनही जनसामान्यांची धारणा आहे. कदाचित अंगावरील वर्दीमुळे त्यांचे हे वेगळेपण नागरिकांना दूर लोटते. अशा वर्दीमधील माणसांना राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याभोवती साफसफाई करताना पाहिल्यामुळे गुरुवारी सकाळी शाहूनगर येथील सामान्य नागरिकांना चांगलाच धक्का बसला.

ठळक मुद्देपोलिसांच्या गांधीगिरीमुळे ‘शाहूं’च्या पुतळ्याने घेतला मोकळा श्वासराजारामपुरी पोलिसांचा उपक्रम; सर्व स्तरांतून कौतुक

प्रदीप शिंदेकोल्हापूर : पोलीस सामान्यांपेक्षा वेगळे असतात, अशी अजूनही जनसामान्यांची धारणा आहे. कदाचित अंगावरील वर्दीमुळे त्यांचे हे वेगळेपण नागरिकांना दूर लोटते. अशा वर्दीमधील माणसांना राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याभोवती साफसफाई करताना पाहिल्यामुळे गुरुवारी सकाळी शाहूनगर येथील सामान्य नागरिकांना चांगलाच धक्का बसला. पोलिसांच्या या अनोख्या गांधीगिरीमुळे शाहू महाराजांच्या पुतळ्याने मात्र मोकळा श्वास घेतला.

राजारामपुरीतील शाहूनगर ही कष्टकरी नागरिकांची वसाहत. साधारणपणे या परिसरात तीन ते साडेतीन हजार लोक राहतात. शिक्षणाचा अभाव आणि गरिबी यांमुळे या परिसरात किरकोळ वाद नेहमीच होत असल्याने पोलिसांचा वावरही येथे नेहमीचाच. गुरुवारी सकाळी पोलिसांचे पथक अचानक येथे दाखल होताच, या परिसरात गंभीर घटना घडल्याचा कयास लोकांनी व्यक्त केला. मात्र पोलिसांनी त्यांचा हा अंदाज चुकीचा ठरवत, एका वेगळ्याच गांधीगिरीचे दर्शन घडविल्याने नागरिकांना सुखद धक्का बसला.येथील चौकात राजर्षी शाहू महाराजांचा अर्धपुतळा आहे. त्यास दररोज पुष्पहारही अर्पण केला जातो; मात्र पुतळ्याच्या सभोवतीच्या कुंपणाची मोठी दुरवस्था झाली आहे. काही नागरिक त्यावरच कपडे वाळत घालत असतात. आतील बागेचेही विद्रूपीकरण झाले आहे. तसेच सभोवती असलेल्या, धूळ खात पडलेल्या जुन्या वाहनांमुळे हा पुतळ्याचा परिसर झाकला गेला होता.

राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी अनेकदा या परिसरात भेट दिली असल्यामुळे त्यांनी शाहूंच्या पुतळ्याची दुरवस्था दूर करण्याचे ठरविले. गुरुवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसोबतच त्यांनी या पुतळ्याभोवतीचा परिसर स्वच्छ करण्याच्या मोहिमेस सुरुवात केली.

केवळ स्वच्छता हा यामागील उद्देश नसून परिसरातील नागरिकांना एक प्रकारे वादविवाद, भांडण- तंटा यांपेक्षा चांगल्या उपक्रमाचे उदाहरण घालून दिले. त्यांच्या उपक्रमास नागरिकांनी तत्काळ हातभार लावत हा परिसर काही तासांत स्वच्छ केला.

पोलिसांना असलेल्या जबाबदारीचे भान, कामाबद्दलची त्यांची निष्ठा किंवा वरिष्ठांचा धाक अशा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पोलीस कर्तव्य करीत राहतात. गुन्हेगारी रोखण्यात अपयश येताच ते टीकेचे धनीही ठरतात. अशा नेहमीच्या कामापेक्षा आज काहीतरी वेगळे करीत असल्याची अनुभूती या पोलिसांना आली.

ही फक्त स्वच्छता मोहीम नव्हती, तर नागरिक आणि पोलिसांमधील सुसंवाद वाढून त्याचा उपयोग पोलिसांना जनजागृती आणि गुन्हे कमी करण्यासाठीही निश्चितच होऊ शकतो.- औदुंबर पाटील,पोलीस निरीक्षक ,राजारामपुरी पोलीस ठाणे

पोलिसांच्या या उपक्रमामुळे गुन्हेगारी कमी होऊन भयमुक्त वातावरणामध्ये सर्वांना वावरता येणार आहे. अंधश्रद्धेमुळे चौकात नेहमी नैवेद्य, लिंबू ठेवण्याचे अघोरी प्रकार घडतात, ते या स्वच्छता मोहिमेमुळे कमी होण्यास मदत होईल.- रोहित पोवार, रहिवाशी

 

टॅग्स :PoliceपोलिसSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर