शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

कोल्हापूर : पोलिसांची गांधीगिरी, ‘शाहूं’च्या पुतळ्याने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 11:18 IST

पोलीस सामान्यांपेक्षा वेगळे असतात, अशी अजूनही जनसामान्यांची धारणा आहे. कदाचित अंगावरील वर्दीमुळे त्यांचे हे वेगळेपण नागरिकांना दूर लोटते. अशा वर्दीमधील माणसांना राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याभोवती साफसफाई करताना पाहिल्यामुळे गुरुवारी सकाळी शाहूनगर येथील सामान्य नागरिकांना चांगलाच धक्का बसला.

ठळक मुद्देपोलिसांच्या गांधीगिरीमुळे ‘शाहूं’च्या पुतळ्याने घेतला मोकळा श्वासराजारामपुरी पोलिसांचा उपक्रम; सर्व स्तरांतून कौतुक

प्रदीप शिंदेकोल्हापूर : पोलीस सामान्यांपेक्षा वेगळे असतात, अशी अजूनही जनसामान्यांची धारणा आहे. कदाचित अंगावरील वर्दीमुळे त्यांचे हे वेगळेपण नागरिकांना दूर लोटते. अशा वर्दीमधील माणसांना राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याभोवती साफसफाई करताना पाहिल्यामुळे गुरुवारी सकाळी शाहूनगर येथील सामान्य नागरिकांना चांगलाच धक्का बसला. पोलिसांच्या या अनोख्या गांधीगिरीमुळे शाहू महाराजांच्या पुतळ्याने मात्र मोकळा श्वास घेतला.

राजारामपुरीतील शाहूनगर ही कष्टकरी नागरिकांची वसाहत. साधारणपणे या परिसरात तीन ते साडेतीन हजार लोक राहतात. शिक्षणाचा अभाव आणि गरिबी यांमुळे या परिसरात किरकोळ वाद नेहमीच होत असल्याने पोलिसांचा वावरही येथे नेहमीचाच. गुरुवारी सकाळी पोलिसांचे पथक अचानक येथे दाखल होताच, या परिसरात गंभीर घटना घडल्याचा कयास लोकांनी व्यक्त केला. मात्र पोलिसांनी त्यांचा हा अंदाज चुकीचा ठरवत, एका वेगळ्याच गांधीगिरीचे दर्शन घडविल्याने नागरिकांना सुखद धक्का बसला.येथील चौकात राजर्षी शाहू महाराजांचा अर्धपुतळा आहे. त्यास दररोज पुष्पहारही अर्पण केला जातो; मात्र पुतळ्याच्या सभोवतीच्या कुंपणाची मोठी दुरवस्था झाली आहे. काही नागरिक त्यावरच कपडे वाळत घालत असतात. आतील बागेचेही विद्रूपीकरण झाले आहे. तसेच सभोवती असलेल्या, धूळ खात पडलेल्या जुन्या वाहनांमुळे हा पुतळ्याचा परिसर झाकला गेला होता.

राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी अनेकदा या परिसरात भेट दिली असल्यामुळे त्यांनी शाहूंच्या पुतळ्याची दुरवस्था दूर करण्याचे ठरविले. गुरुवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसोबतच त्यांनी या पुतळ्याभोवतीचा परिसर स्वच्छ करण्याच्या मोहिमेस सुरुवात केली.

केवळ स्वच्छता हा यामागील उद्देश नसून परिसरातील नागरिकांना एक प्रकारे वादविवाद, भांडण- तंटा यांपेक्षा चांगल्या उपक्रमाचे उदाहरण घालून दिले. त्यांच्या उपक्रमास नागरिकांनी तत्काळ हातभार लावत हा परिसर काही तासांत स्वच्छ केला.

पोलिसांना असलेल्या जबाबदारीचे भान, कामाबद्दलची त्यांची निष्ठा किंवा वरिष्ठांचा धाक अशा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पोलीस कर्तव्य करीत राहतात. गुन्हेगारी रोखण्यात अपयश येताच ते टीकेचे धनीही ठरतात. अशा नेहमीच्या कामापेक्षा आज काहीतरी वेगळे करीत असल्याची अनुभूती या पोलिसांना आली.

ही फक्त स्वच्छता मोहीम नव्हती, तर नागरिक आणि पोलिसांमधील सुसंवाद वाढून त्याचा उपयोग पोलिसांना जनजागृती आणि गुन्हे कमी करण्यासाठीही निश्चितच होऊ शकतो.- औदुंबर पाटील,पोलीस निरीक्षक ,राजारामपुरी पोलीस ठाणे

पोलिसांच्या या उपक्रमामुळे गुन्हेगारी कमी होऊन भयमुक्त वातावरणामध्ये सर्वांना वावरता येणार आहे. अंधश्रद्धेमुळे चौकात नेहमी नैवेद्य, लिंबू ठेवण्याचे अघोरी प्रकार घडतात, ते या स्वच्छता मोहिमेमुळे कमी होण्यास मदत होईल.- रोहित पोवार, रहिवाशी

 

टॅग्स :PoliceपोलिसSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर