शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कोल्हापूर : पोलिसांची गांधीगिरी, ‘शाहूं’च्या पुतळ्याने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 11:18 IST

पोलीस सामान्यांपेक्षा वेगळे असतात, अशी अजूनही जनसामान्यांची धारणा आहे. कदाचित अंगावरील वर्दीमुळे त्यांचे हे वेगळेपण नागरिकांना दूर लोटते. अशा वर्दीमधील माणसांना राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याभोवती साफसफाई करताना पाहिल्यामुळे गुरुवारी सकाळी शाहूनगर येथील सामान्य नागरिकांना चांगलाच धक्का बसला.

ठळक मुद्देपोलिसांच्या गांधीगिरीमुळे ‘शाहूं’च्या पुतळ्याने घेतला मोकळा श्वासराजारामपुरी पोलिसांचा उपक्रम; सर्व स्तरांतून कौतुक

प्रदीप शिंदेकोल्हापूर : पोलीस सामान्यांपेक्षा वेगळे असतात, अशी अजूनही जनसामान्यांची धारणा आहे. कदाचित अंगावरील वर्दीमुळे त्यांचे हे वेगळेपण नागरिकांना दूर लोटते. अशा वर्दीमधील माणसांना राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याभोवती साफसफाई करताना पाहिल्यामुळे गुरुवारी सकाळी शाहूनगर येथील सामान्य नागरिकांना चांगलाच धक्का बसला. पोलिसांच्या या अनोख्या गांधीगिरीमुळे शाहू महाराजांच्या पुतळ्याने मात्र मोकळा श्वास घेतला.

राजारामपुरीतील शाहूनगर ही कष्टकरी नागरिकांची वसाहत. साधारणपणे या परिसरात तीन ते साडेतीन हजार लोक राहतात. शिक्षणाचा अभाव आणि गरिबी यांमुळे या परिसरात किरकोळ वाद नेहमीच होत असल्याने पोलिसांचा वावरही येथे नेहमीचाच. गुरुवारी सकाळी पोलिसांचे पथक अचानक येथे दाखल होताच, या परिसरात गंभीर घटना घडल्याचा कयास लोकांनी व्यक्त केला. मात्र पोलिसांनी त्यांचा हा अंदाज चुकीचा ठरवत, एका वेगळ्याच गांधीगिरीचे दर्शन घडविल्याने नागरिकांना सुखद धक्का बसला.येथील चौकात राजर्षी शाहू महाराजांचा अर्धपुतळा आहे. त्यास दररोज पुष्पहारही अर्पण केला जातो; मात्र पुतळ्याच्या सभोवतीच्या कुंपणाची मोठी दुरवस्था झाली आहे. काही नागरिक त्यावरच कपडे वाळत घालत असतात. आतील बागेचेही विद्रूपीकरण झाले आहे. तसेच सभोवती असलेल्या, धूळ खात पडलेल्या जुन्या वाहनांमुळे हा पुतळ्याचा परिसर झाकला गेला होता.

राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी अनेकदा या परिसरात भेट दिली असल्यामुळे त्यांनी शाहूंच्या पुतळ्याची दुरवस्था दूर करण्याचे ठरविले. गुरुवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसोबतच त्यांनी या पुतळ्याभोवतीचा परिसर स्वच्छ करण्याच्या मोहिमेस सुरुवात केली.

केवळ स्वच्छता हा यामागील उद्देश नसून परिसरातील नागरिकांना एक प्रकारे वादविवाद, भांडण- तंटा यांपेक्षा चांगल्या उपक्रमाचे उदाहरण घालून दिले. त्यांच्या उपक्रमास नागरिकांनी तत्काळ हातभार लावत हा परिसर काही तासांत स्वच्छ केला.

पोलिसांना असलेल्या जबाबदारीचे भान, कामाबद्दलची त्यांची निष्ठा किंवा वरिष्ठांचा धाक अशा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पोलीस कर्तव्य करीत राहतात. गुन्हेगारी रोखण्यात अपयश येताच ते टीकेचे धनीही ठरतात. अशा नेहमीच्या कामापेक्षा आज काहीतरी वेगळे करीत असल्याची अनुभूती या पोलिसांना आली.

ही फक्त स्वच्छता मोहीम नव्हती, तर नागरिक आणि पोलिसांमधील सुसंवाद वाढून त्याचा उपयोग पोलिसांना जनजागृती आणि गुन्हे कमी करण्यासाठीही निश्चितच होऊ शकतो.- औदुंबर पाटील,पोलीस निरीक्षक ,राजारामपुरी पोलीस ठाणे

पोलिसांच्या या उपक्रमामुळे गुन्हेगारी कमी होऊन भयमुक्त वातावरणामध्ये सर्वांना वावरता येणार आहे. अंधश्रद्धेमुळे चौकात नेहमी नैवेद्य, लिंबू ठेवण्याचे अघोरी प्रकार घडतात, ते या स्वच्छता मोहिमेमुळे कमी होण्यास मदत होईल.- रोहित पोवार, रहिवाशी

 

टॅग्स :PoliceपोलिसSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर