शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कोल्हापूर :  फळ-भाज्या, धान्याचे दर भडकणार, मालवाहतूक संपाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 18:10 IST

देशव्यापी मालवाहतूक चक्काजाम आंंदोलनाचा परिणाम आता कोल्हापूर जिल्ह्याच्या बाजारपेठेवर जाणवू लागला आहे. सलग चौथ्या दिवशी संप सुरू राहिल्याने फळ-भाजीपाला, धान्य आवक थंडावली असून येत्या दोन दिवसांत संप न मिटल्यास भाववाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठळक मुद्देफळ-भाज्या, धान्याचे दर भडकणार, मालवाहतूक संपाचा परिणाम आवक घटली; डिझेल विक्रीत २५ टक्के घट; दैनंदिन जीवनावर परिणाम

कोल्हापूर : देशव्यापी मालवाहतूक चक्काजाम आंंदोलनाचा परिणाम आता कोल्हापूर जिल्ह्याच्या बाजारपेठेवर जाणवू लागला आहे. सलग चौथ्या दिवशी संप सुरू राहिल्याने फळ-भाजीपाला, धान्य आवक थंडावली असून येत्या दोन दिवसांत संप न मिटल्यास भाववाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषत: कांदा बटाट्याचे दर भडकण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल चा मुबलक साठा असला तरी मालवाहतूक संपामुळे डिझेलची विक्री सुमारे २५ टक्के घटली आहे.आॅल इंडिया मोटर्स ट्रॉन्स्पोर्ट काँग्रेस नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाच्यावतीने विविध मागण्यांसाठी गेले चार दिवस संप सुरू असल्याने मालवाहतुकीची चाके रस्त्याकडेला थांबली आहेत. या संपाचा दैनंदिन जीवनावर हळूहळू परिणाम जाणवू लागला आहे. मालवाहतुकीच्या संपामुळे कोल्हापूरच्या बाजारपेठेत मालाची आवक-जावक पूर्णपणे थंडावली आहे; त्यामुळे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवारी शुकशुकाट जाणवत होता.

कांदा-बटाट्याची आवक ८० टक्के घटली, दर स्थिरकोल्हापूरच्या बाजारपेठेत अहमदनगर, सोलापूर, पुणे या ठिकाणाहून मालवाहतुकीने कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. रोज किमान ४५ ते ५० ट्रक कांद्याची आवक होते; पण दिवसभरात फक्त १० ट्रकच कांद्याचे आल्याने सुमारे ८० टक्के कांदा वाहतुकीवर परिणाम जाणवत आहे. याशिवाय कांद्याच्या प्रमाणात बटाट्याचीही आवक आग्रा, इंदोरच्या बाजारपेठेतून कोल्हापुरात होते; पण या आवकेवरही सुमारे ७५ टक्के परिणाम झाला आहे.

हा संप अगोदरच जाहीर केला असल्याने व्यापाऱ्यांनी कांद्याचा साठा करून ठेवल्याने आवक घटली असली तरी कोल्हापुरात कांदा उपलब्ध होऊ लागल्याने अद्यापतरी दरावर कोणताही परिणाम झाला नसून दर स्थिर आहेत.

मालवाहतूकदारांच्या संपामुळे बाजार समितीतील आवक-जावकवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असून भाजीपाल्याची रोजची सुमारे ६० टक्के तर फळांची ८० टक्के आवक घटली आहे.- मोहन सालपे,सचिव, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती.

 

मालवाहतूकदारांच्या संपामुळे ट्रकसारखी डिझेलवर धावणारी वाहने रस्त्याकडेला थांबल्याने पंपावर डिझेलचा मुबलक साठा असूनही तो अपेक्षेप्रमाणे उचल होत नाही. या डिझेल विक्रीवर सुमारे २५ टक्के परिणाम झाला आहे.- गजकुमार माणगावे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल-डिझेल डिलर्स असोसिएशन. 

 

टॅग्स :Chakka jamचक्काजामTrafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर