शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Flood : महापूराच्या तडाख्यात धर्माच्या भिंती वाहिल्या, मदरशातही जेवणाच्या पंगती बसल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 15:49 IST

कोल्हापूरमध्ये शुक्रवारी दिवसभर अतीवृष्टी झाल्यानंतर आख्खं शहर जलमय झालं. शहरात जाणारी सर्वच वाहनं शहराबाहेरच थांबवण्यात आली आहेत.

ठळक मुद्देसरकारी आणि खासगी गाड्यांमधल्या प्रवाशांची अन्न-पाण्याविना मोठी होणारी अडचण लक्षात घेऊन त्यांच्या मदतीला शिरोलीमधील मुस्लिम बांधव पुढे आले आहेत.

कोल्हापूर - पावसाळा अन् दुर्घटना हे जणू आता दुर्दैवी समीकरण बनलं आहे. पावसाळ्यात नद्यांना पूर येतो, गावं पाण्याखाली जातात, दरडी कोसळतात आणि लोकांचा आक्रोश पाहताना डोळे पाणावतात. आता, पुन्हा एकदा कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात पुराने थैमान घातले आहे. तर, रायगड आणि रत्नागिरीत हाहाकार पाहायला मिळत आहे. मात्र, दुर्घटना आणि संकाटात जाती-धर्माच्या भिंती कोसळल्याचं अनेकदा आपण पाहिलं आहे. आता, कोल्हापुरातीही तोच प्रत्यय नागरिकांना आला आहे. 

कोल्हापूरमध्ये शुक्रवारी दिवसभर अतीवृष्टी झाल्यानंतर आख्खं शहर जलमय झालं. शहरात जाणारी सर्वच वाहनं शहराबाहेरच थांबवण्यात आली आहेत. त्यामुळे या सरकारी आणि खासगी गाड्यांमधल्या प्रवाशांची अन्न-पाण्याविना मोठी होणारी अडचण लक्षात घेऊन त्यांच्या मदतीला शिरोलीमधील मुस्लिम बांधव पुढे आले आहेत. शिरोलीतील मुस्लिम बांधवांनी वाहनांमध्ये अडकून पडलेल्या या प्रवाशांची जेवणाची आणि निवासाची सोय स्थानिक मदरशामध्येच केली. जवळपास 200 हून अधिक प्रवाशांना शिरोलीतील या मदरशामध्ये आसरा मिळाला आहे. एकूण 4 एसटी बसेस आणि 6 खासगी कारमधील प्रवाशांची या मदरशामध्ये सोय करण्यात आली आहे.

पुणे, देवगड, औरंगाबाद, सोलापूर अशा विविध भागातून मोठ्या संख्येने आलेली वाहनं महापुरामुळे पुणे-बंगळुरू महामार्ग बंद झाल्यानंतर शिरोली भागातच थांबवण्यात आली. त्यामुळे सरकारी एसटी बसेस आणि अनेक वाहनांच्या रांगा शिरोली भागातील महामार्गावर लागल्या आहेत. या मदरशात मैनुद्दिन मुल्ला, शकील किल्लेदार आणि त्यांच्या गटानं प्रवाशांना कोणतीही कमतरता भासू नये यासाठी प्रयत्नशील असल्याचं म्हटलं. 

सर्वोतोपरी मदतीसाठी आम्ही सज्ज

“राष्ट्रीय महामार्गावर अडकलेल्या प्रवासी, वाहन चालक यांची सोय मदरशांमध्ये केले आहे. त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरवले आहेत. चहा-नाश्ता, दोन वेळेचे जेवण याबरोबर त्यांच्या निवासाची सोय केली आहे. त्यांना कशाची कमतरता पडू नये याची काळजी आम्ही सर्वतोपरी घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, शकडो जाती-धर्माच्या लोकांनी नबलेला भारत संकटसमयी विविधतेतील एकता जगाला दाखवून देतो. याच मदतीच्या भावनेतून कोरोना संकटातही देशाने जगापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरMuslimमुस्लीमRainपाऊसcarकारkolhapurकोल्हापूर