शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

Kolhapur Flood : महापूराच्या तडाख्यात धर्माच्या भिंती वाहिल्या, मदरशातही जेवणाच्या पंगती बसल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 15:49 IST

कोल्हापूरमध्ये शुक्रवारी दिवसभर अतीवृष्टी झाल्यानंतर आख्खं शहर जलमय झालं. शहरात जाणारी सर्वच वाहनं शहराबाहेरच थांबवण्यात आली आहेत.

ठळक मुद्देसरकारी आणि खासगी गाड्यांमधल्या प्रवाशांची अन्न-पाण्याविना मोठी होणारी अडचण लक्षात घेऊन त्यांच्या मदतीला शिरोलीमधील मुस्लिम बांधव पुढे आले आहेत.

कोल्हापूर - पावसाळा अन् दुर्घटना हे जणू आता दुर्दैवी समीकरण बनलं आहे. पावसाळ्यात नद्यांना पूर येतो, गावं पाण्याखाली जातात, दरडी कोसळतात आणि लोकांचा आक्रोश पाहताना डोळे पाणावतात. आता, पुन्हा एकदा कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात पुराने थैमान घातले आहे. तर, रायगड आणि रत्नागिरीत हाहाकार पाहायला मिळत आहे. मात्र, दुर्घटना आणि संकाटात जाती-धर्माच्या भिंती कोसळल्याचं अनेकदा आपण पाहिलं आहे. आता, कोल्हापुरातीही तोच प्रत्यय नागरिकांना आला आहे. 

कोल्हापूरमध्ये शुक्रवारी दिवसभर अतीवृष्टी झाल्यानंतर आख्खं शहर जलमय झालं. शहरात जाणारी सर्वच वाहनं शहराबाहेरच थांबवण्यात आली आहेत. त्यामुळे या सरकारी आणि खासगी गाड्यांमधल्या प्रवाशांची अन्न-पाण्याविना मोठी होणारी अडचण लक्षात घेऊन त्यांच्या मदतीला शिरोलीमधील मुस्लिम बांधव पुढे आले आहेत. शिरोलीतील मुस्लिम बांधवांनी वाहनांमध्ये अडकून पडलेल्या या प्रवाशांची जेवणाची आणि निवासाची सोय स्थानिक मदरशामध्येच केली. जवळपास 200 हून अधिक प्रवाशांना शिरोलीतील या मदरशामध्ये आसरा मिळाला आहे. एकूण 4 एसटी बसेस आणि 6 खासगी कारमधील प्रवाशांची या मदरशामध्ये सोय करण्यात आली आहे.

पुणे, देवगड, औरंगाबाद, सोलापूर अशा विविध भागातून मोठ्या संख्येने आलेली वाहनं महापुरामुळे पुणे-बंगळुरू महामार्ग बंद झाल्यानंतर शिरोली भागातच थांबवण्यात आली. त्यामुळे सरकारी एसटी बसेस आणि अनेक वाहनांच्या रांगा शिरोली भागातील महामार्गावर लागल्या आहेत. या मदरशात मैनुद्दिन मुल्ला, शकील किल्लेदार आणि त्यांच्या गटानं प्रवाशांना कोणतीही कमतरता भासू नये यासाठी प्रयत्नशील असल्याचं म्हटलं. 

सर्वोतोपरी मदतीसाठी आम्ही सज्ज

“राष्ट्रीय महामार्गावर अडकलेल्या प्रवासी, वाहन चालक यांची सोय मदरशांमध्ये केले आहे. त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरवले आहेत. चहा-नाश्ता, दोन वेळेचे जेवण याबरोबर त्यांच्या निवासाची सोय केली आहे. त्यांना कशाची कमतरता पडू नये याची काळजी आम्ही सर्वतोपरी घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, शकडो जाती-धर्माच्या लोकांनी नबलेला भारत संकटसमयी विविधतेतील एकता जगाला दाखवून देतो. याच मदतीच्या भावनेतून कोरोना संकटातही देशाने जगापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरMuslimमुस्लीमRainपाऊसcarकारkolhapurकोल्हापूर