शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

खासदारांसमोरच आंदोलक महिलांच्या नदीत उड्या; सर्वांचीच उडाली तारांबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 16:09 IST

गेल्या दिन दिवसांपासून या महिला पंचगंगा नदीच्या तीरावर जल आंदोलन करत आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांनी मायक्रो फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज माफ व्हावे, या मागणीसाठी महिलांनी गांधीनगरजवळ असलेल्या पंचगंगा नदीच्या तीरावर जल आंदोलन पुकारले आहे. या आंदोलक महिलांची भेट घेण्यासाठी खासदार धैर्यशील माने गेले असता त्यांच्यासमोरच काही आंदोलक महिलांनी पाण्यात उड्या मारल्याची घटना शुक्रवारी घडली. 

गेल्या दिन दिवसांपासून या महिला पंचगंगा नदीच्या तीरावर जल आंदोलन करत आहे. आज या आंदोलक महिलांचे निवेदन स्वीकारण्यासाठी खासदार धैर्यशील माने आंदोलनस्थळी आले होते. त्यावेळी काही महिलांनी थेट नदीत उड्या घेत आंदोलन केले. त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. छत्रपती शासन संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

हजारो महिला त्या ठिकाणी जमल्या आहेत. या भागात मायक्रो फायनान्सचे आर्थिक जाळे आहे. पुरामुळे या महिलांना कर्ज फेडणे शक्य नाही. कमी प्रमाणात बचतगट आहेत. शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा कर्जमाफी द्यावी, अशी या महिलांची मागणी आहे. यासंबंधी मी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. कोणतीही वसूली पूरग्रस्त भागात होऊ नये, असे आदेश जिल्हाधिऱ्यांनी दिले आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांशी यांसंदर्भात बोललो असून पुढील आठवड्यात भेटून चर्चा करणार आहे, असे यासंदर्भात बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले. 

दरम्यान, कोल्हापूरात ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. मात्र, या पुराच्या फटक्यातून अद्याप नागरिक सावरले नाहीत. तसेच, कर्ज घेणाऱ्या हजारो महिला अस्वस्थ आहेत. त्यातच मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज वसुली सुरू आहे. त्यामुळे महापुरात सर्व वाहून गेले असून अद्याप सरकारी मदत मिळाली नाही, असे असताना मायक्रो फायनान्स कंपनीचे कर्ज फेडायचे कोठून, असा सवाल करत या महिलांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. तसेच, मायक्रो फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज व्हावे, अशी मागणी या आंदोलक महिलांनी केली आहे.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूर