शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

कोल्हापूर : मागील बिल मिळाल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही: शेतकरी संघटनांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 17:58 IST

गेल्या ऊस हंगामातील अंतिम बिल अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही, ते दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा शनिवारी शेतकरी संघटनांच्या समन्वय परिषदेतर्फे देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून कारखानदार व सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देमागील उसाचे बिल मिळाल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही: शेतकरी संघटनांचा इशाराजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा : साखर कारखानदार, सरकारविरोधात तीव्र निदर्शने

कोल्हापूर : गेल्या ऊस हंगामातील अंतिम बिल अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही, ते दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा शनिवारी शेतकरी संघटनांच्या समन्वय परिषदेतर्फे देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून कारखानदार व सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.दुपारी एकच्या सुमारास दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या धडक मोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये जवळपास तेरा शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शेतकरी एकजुटीचा विजय असो, ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, यंदाच्या हंगामात पहिली उचल एकरकमी ३५०० रुपये द्यावी, मागील बिलाची थकबाकी प्रतिटन ४०० रुपये मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत दसरा चौकातून या धडक मोर्चाला सुरुवात झाली. सीपीआर चौक, शिवाजी चौक, बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, फोर्ड कॉर्नर, व्हिनस टॉकीज, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली.शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील म्हणाले, मागील हंगामातील दोनशे रुपयांचे काय झाले हे पालकमंत्र्यांनी सांगावे. पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी मागील देणी भागविली पाहिजेत, मागील एफआरपी अधिक दोनशे रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, मागील हंगामात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एफआरपी अधिक २०० रुपये असा तोडगा निघाला होता, परंतु कारखान्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. पालकमंत्र्यांनी याची जबाबदारी म्हणून सर्व कारखान्यांना मागील अंतिम बिले देण्यास सांगावे. पालकमंत्र्यांनी एक बैठक घेऊन ऊसदराबाबत अंतिम निर्णय घ्यावा. तसेच १२.५० रिकव्हरी असणाऱ्या कारखान्यांना ३२५० रुपये अंतिम दर निघत आहे तो देऊनच कारखाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. तसेच या हंगामात पहिली उचल एकरकमी ३५०० रुपये द्यावी.आंदोलनात शेतकरी संघटनेचे पी. जी. पाटील, टी. आर. पाटील, अ‍ॅड. माणिक शिंदे, बळिराजा संघटनेचे गणेश जगताप, बी. जी. पाटील, साजीद मुल्ला, अंकुश आंदोलनचे धनाजी चुडमुंगे, जयशिवराय जयकिसान संघटनेचे शिवाजी माने, संभाजी ब्रिगेडचे रूपेश पाटील, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पालकमंत्र्यांच्या घराऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चासमन्वय परिषदेतर्फे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता; परंतु पालकमंत्री बाहेरगावी असल्याने पोलिसांच्या सूचनेनुसार हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर