शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कोल्हापूर :लबाड कारखानदार दिशाभूल करतात : रघुनाथदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 11:51 IST

सरकारच्या मदतीशिवाय साखर कारखाने एफआरपी देऊ शकतात; पण ही लबाड मंडळी शॉर्टमार्जिनचे कारण पुढे करत शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याची टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली. पहिली उचल ‘एफआरपी’ व उर्वरित पैसे हप्त्याने दिल्याशिवाय उसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

ठळक मुद्देलबाड कारखानदार दिशाभूल करतात : रघुनाथदादा पाटील‘एफआरपी’ दिल्याशिवाय कांड्याला हात लावू देणार नाही

कोल्हापूर : सरकारच्या मदतीशिवाय साखर कारखाने एफआरपी देऊ शकतात; पण ही लबाड मंडळी शॉर्टमार्जिनचे कारण पुढे करत शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याची टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली. पहिली उचल ‘एफआरपी’ व उर्वरित पैसे हप्त्याने दिल्याशिवाय उसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.शेतकरी संघटनांनी केलेली ऊस दराची मागणी आणि साखर कारखानदारांची भूमिका यामुळे ऊस हंगामाची कोंडी निर्माण झाली आहे. सरकार मदत करेल, साखर कारखाने सुरू करा, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कारखानदारांना केली होती. त्या पार्श्वभूमीवर रघुनाथदादा पाटील म्हणाले, सरकारच्या मदतीची काहीच गरज नाही. साखरेचे बाजारातील दराचा हिशेब घालून कारखानदार चुकीची माहिती देत आहेत.

एक टन ऊस गाळपानंतर १२० किलो साखर, ३०० किलो बगॅस, ४० किलो मोलॅसिस मिळते. या सगळ्याचा हिशेब केला तर ‘एफआरपी’ देणे सहज शक्य आहे पण लबाड कारखानदार संघटितपणे शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना लूटण्याचे काम करत आहेत. एफआरपीची रक्कम पहिला हप्ता म्हणून द्या आणि त्यानंतर टप्प्या-टप्प्याने उर्वरित रक्कम देण्याचे आश्वासन दिल्याशिवाय उसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही.कायदा मोडून बघाच!एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. कोणत्या जिल्ह्यात ऊसतोड सुरू आहे, हे कारखानदारांनी विचारणा करू नये. त्यांनी कायद्याचे पालन करावे, अन्यथा कायदा मोडून बघावा, असा इशारा पाटील यांनी दिला. 

 

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर