शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

 कोल्हापूर :  खर्च कमी, वाढत्या संधीमुळे वाणिज्य शाखेकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 10:55 IST

अभियांत्रिकी, वैद्यकीय विद्याशाखांपेक्षा शिक्षणाचा कमी असलेला खर्च, रोजगारक्षम होण्यासाठी लागणारा कमी वेळ आणि वाढत्या संधी यांमुळे वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. समाजाच्या गरजेप्रमाणे हा बदल होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देखर्च कमी, वाढत्या संधीमुळे वाणिज्य शाखेकडे कलतज्ज्ञांचे मत; रोजगारक्षम होण्याचा कालावधी कमी

संतोष मिठारी

 कोल्हापूर : अभियांत्रिकी, वैद्यकीय विद्याशाखांपेक्षा शिक्षणाचा कमी असलेला खर्च, रोजगारक्षम होण्यासाठी लागणारा कमी वेळ आणि वाढत्या संधी यांमुळे वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. समाजाच्या गरजेप्रमाणे हा बदल होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या कलचाचणीचा निष्कर्ष शनिवारी (दि. १२) जाहीर झाला. त्यात २१ टक्के विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेमध्ये प्रवेशित होण्याबाबतचा कल दर्शविला आहे.‘वाणिज्य’कडील विद्यार्थ्यांचा वाढता कल का आहे, याची कारणे तज्ज्ञांकडून ‘लोकमत’ने जाणून घेतली. याबाबत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्याशाखांमधील शिक्षणाचा खर्च अधिक असतो. या अभ्यासक्रमाच्या पूर्ततेसाठी जास्त कालावधी लागतो.

या तुलनेत वाणिज्य शाखेचा पदवी, पदव्युत्तर शिक्षणाचा खर्च कमी येतो. रोजगारक्षम होण्याचा कालावधी कमी आहे. त्यासह विमा, बॅँकिंग, आदी क्षेत्रांत रोजगाराच्या संधी वाढत असल्याने वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे दिसते.

शिवाजी विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. ए. एम. गुरव म्हणाले, वाणिज्य आणि व्यवस्थापन हे सर्व क्षेत्रांना आवश्यक आहे. इमारत बांधण्यासाठी कॉस्टिंग करावे लागते. मशिनरी तयार करताना किंमत ठरविणे, उत्पादन निर्मितीनंतर तिचे विपणन करणे अशा प्रत्येक ठिकाणी वाणिज्य व्यवस्थापन लागते. ‘जीएसटी’मुळे कर नियोजन, हिशेब ठेवण्यासाठी सल्लागारांची मागणी वाढत आहे. व्यावसायिकपणे करिअर करता येत असल्याने वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. गेल्या चार वर्षांत वाणिज्य, व्यवस्थापन शाखेमध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.

‘वाणिज्य’कडील कलाची कारणे

  1. * पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी विविध अभ्यासक्रम.
  2. * जगभरात विमा, बँकिंग, नॉन-बँकिंग फायन्सस, ई-ट्रेडमध्ये होणारी वाढ
  3. * अन्य विद्याशाखांच्या तुलनेत रोजगारक्षम होण्यासाठी लागणारा कमी कालावधी.

 

शिवाजी विद्यापीठातील गेल्या चार वर्षांतील विद्यार्थिसंख्यावर्ष        वाणिज्य शाखा            व्यवस्थापन शाखा२०१३-१४     ४०६०४                   ४५८४२०१४-१५     ३८२३३                   ४६६५२०१५-१६     ४५७६२                   ४९२३२०१६-१७    ४७३८३                    ५२५२

तुकड्या वाढविल्याकोल्हापूर शहरामधील महाविद्यालयांतील वाणिज्य इंग्रजी माध्यमाची एकूण प्रवेश क्षमता ८८० आहे. त्यासाठी गेल्या वर्षी १४२९ अर्ज दाखल झाले. जादा ५४९ जागांवरील प्रवेशासाठी डी. डी. शिंदे सरकार कॉलेज, विवेकानंद महाविद्यालयाला स्वयंअर्थसाहाय्यित तुकडी देण्यात आली.

वाणिज्य शाखेत प्रवेशित झालेले शहरातील विद्यार्थीवर्ष                   विद्यार्थी* २०१३            २२७५* २०१४            २०४८* २०१५            २८११* २०१६           १९८३* २०१७            २३२४ 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीkolhapurकोल्हापूर