शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

 कोल्हापूर :  खर्च कमी, वाढत्या संधीमुळे वाणिज्य शाखेकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 10:55 IST

अभियांत्रिकी, वैद्यकीय विद्याशाखांपेक्षा शिक्षणाचा कमी असलेला खर्च, रोजगारक्षम होण्यासाठी लागणारा कमी वेळ आणि वाढत्या संधी यांमुळे वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. समाजाच्या गरजेप्रमाणे हा बदल होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देखर्च कमी, वाढत्या संधीमुळे वाणिज्य शाखेकडे कलतज्ज्ञांचे मत; रोजगारक्षम होण्याचा कालावधी कमी

संतोष मिठारी

 कोल्हापूर : अभियांत्रिकी, वैद्यकीय विद्याशाखांपेक्षा शिक्षणाचा कमी असलेला खर्च, रोजगारक्षम होण्यासाठी लागणारा कमी वेळ आणि वाढत्या संधी यांमुळे वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. समाजाच्या गरजेप्रमाणे हा बदल होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या कलचाचणीचा निष्कर्ष शनिवारी (दि. १२) जाहीर झाला. त्यात २१ टक्के विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेमध्ये प्रवेशित होण्याबाबतचा कल दर्शविला आहे.‘वाणिज्य’कडील विद्यार्थ्यांचा वाढता कल का आहे, याची कारणे तज्ज्ञांकडून ‘लोकमत’ने जाणून घेतली. याबाबत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्याशाखांमधील शिक्षणाचा खर्च अधिक असतो. या अभ्यासक्रमाच्या पूर्ततेसाठी जास्त कालावधी लागतो.

या तुलनेत वाणिज्य शाखेचा पदवी, पदव्युत्तर शिक्षणाचा खर्च कमी येतो. रोजगारक्षम होण्याचा कालावधी कमी आहे. त्यासह विमा, बॅँकिंग, आदी क्षेत्रांत रोजगाराच्या संधी वाढत असल्याने वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे दिसते.

शिवाजी विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. ए. एम. गुरव म्हणाले, वाणिज्य आणि व्यवस्थापन हे सर्व क्षेत्रांना आवश्यक आहे. इमारत बांधण्यासाठी कॉस्टिंग करावे लागते. मशिनरी तयार करताना किंमत ठरविणे, उत्पादन निर्मितीनंतर तिचे विपणन करणे अशा प्रत्येक ठिकाणी वाणिज्य व्यवस्थापन लागते. ‘जीएसटी’मुळे कर नियोजन, हिशेब ठेवण्यासाठी सल्लागारांची मागणी वाढत आहे. व्यावसायिकपणे करिअर करता येत असल्याने वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. गेल्या चार वर्षांत वाणिज्य, व्यवस्थापन शाखेमध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.

‘वाणिज्य’कडील कलाची कारणे

  1. * पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी विविध अभ्यासक्रम.
  2. * जगभरात विमा, बँकिंग, नॉन-बँकिंग फायन्सस, ई-ट्रेडमध्ये होणारी वाढ
  3. * अन्य विद्याशाखांच्या तुलनेत रोजगारक्षम होण्यासाठी लागणारा कमी कालावधी.

 

शिवाजी विद्यापीठातील गेल्या चार वर्षांतील विद्यार्थिसंख्यावर्ष        वाणिज्य शाखा            व्यवस्थापन शाखा२०१३-१४     ४०६०४                   ४५८४२०१४-१५     ३८२३३                   ४६६५२०१५-१६     ४५७६२                   ४९२३२०१६-१७    ४७३८३                    ५२५२

तुकड्या वाढविल्याकोल्हापूर शहरामधील महाविद्यालयांतील वाणिज्य इंग्रजी माध्यमाची एकूण प्रवेश क्षमता ८८० आहे. त्यासाठी गेल्या वर्षी १४२९ अर्ज दाखल झाले. जादा ५४९ जागांवरील प्रवेशासाठी डी. डी. शिंदे सरकार कॉलेज, विवेकानंद महाविद्यालयाला स्वयंअर्थसाहाय्यित तुकडी देण्यात आली.

वाणिज्य शाखेत प्रवेशित झालेले शहरातील विद्यार्थीवर्ष                   विद्यार्थी* २०१३            २२७५* २०१४            २०४८* २०१५            २८११* २०१६           १९८३* २०१७            २३२४ 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीkolhapurकोल्हापूर