शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापूर :  कृषी संशोधन केंद्राच्या जागेतील वृक्षांची बेसुमार तोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 11:48 IST

शेंडा पार्क परिसरातील कृषी संशोधन केंद्राच्या विस्तीर्ण जागेतील वृक्षांची बेसुमार तोड करण्यात आली आहे. या परिसरातील सुमारे २५0 हून अधिक झाडांची खुलेआम कत्तल झाल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एका बाजूला सरकार ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशी मोहीम दरवर्षी राबवित असतानाच शासकीय जागेतच झालेल्या या विनापरवाना तोडीमुळे सरकारच्या योजनेलाच हरताळ फासला आहे.

ठळक मुद्देकृषी संशोधन केंद्राच्या जागेतील वृक्षांची बेसुमार तोडशेंडा पार्क परिसरातील घटना : ‘झाडे लावा, झाडे जगवा’ मोहिमेला हरताळ

कोल्हापूर : शेंडा पार्क परिसरातील कृषी संशोधन केंद्राच्या विस्तीर्ण जागेतील वृक्षांची बेसुमार तोड करण्यात आली आहे. या परिसरातील सुमारे २५0 हून अधिक झाडांची खुलेआम कत्तल झाल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एका बाजूला सरकार ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशी मोहीम दरवर्षी राबवित असतानाच शासकीय जागेतच झालेल्या या विनापरवाना तोडीमुळे सरकारच्या योजनेलाच हरताळ फासला आहे.शासनाच्या वतीने प्रत्येकवर्षी जुलैच्या दरम्यान शतकोटी वृक्ष लागवड योजना राज्यभर राबविली जाते. शासकीय पड जमिनीवर मोठ्या संख्येने वृक्षारोपन केले जाते. योजनेच्या माध्यमातून ‘झाडे लावा, झाडे जगवा आणि परिसर प्रदूषणमुक्त ठेवा’ हा संदेश दिला जात आहे. यात सर्व सरकारी कार्यालयांचा सहभाग असतोच. यंदाच्यावर्षी या मोहिमेत कृषी संशोधन केंद्रानेही सहभाग नोंदविला आहे.कृषी संशोधन केंद्राची शेंडापार्क परिसरात सुमारे १५१ हेक्टर अशी विस्तीर्ण जमीन आहे. येथे विविध पिके घेऊन, त्यावर संशोधन प्रक्रिया राबविली जाते. संशोधन केंद्राच्या जागेत विविध प्रकारचे, तसेच जंगली वृक्ष मोठ्या संख्येने डोलाने उभारले आहेत. याशिवाय खुरटे, दाट झुडूपही मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या महिनाभरात या शासकीय जागेतील वृक्षांची बेसुमार तोड करण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे.

कटर मशीनच्या साहाय्याने काही मिनिटातच अनेक मोठमोठी झाडे जमीनदोस्त करण्याचे काम सुरू आहे. पोकलॅन, जेसीबी मशीनचाही यासाठी वापर केला जात आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींतून तीव्र नाराजीची लाट उमटत आहे.

खुल्या जागेतीलही वृक्षतोडजमिनीभोवती सुरक्षेसाठी चर खोदण्याचे काम सुरू आहे, हे निमित्त पुढे करून या शासकीय जागेतील वृक्षांची कत्तल केली जात आहे. चर खोदताना आडव्या येणाऱ्या वृक्षांसह खुल्या जागेतीलही वृक्षांची मोठ्या संख्येने तोड झाल्याने पर्यावरणप्रेमींतून संतापाची लाट उमटत आहे.

शिवाय येथे सुरक्षा भिंत उभारण्यासाठी अद्याप शासकीय निधी मंजूर नसताना, हा नाहक खर्च केला जात आहे. हे खोदलेले चर पावसाळ्यात पुन्हा मुजण्याची शक्यता असल्याने हा उठाठेव कशासाठी? असाही प्रश्न पर्यावरणप्रेमींतून विचारला जात आहे. 

 

कृषी संशोधन केंद्राच्या शासकीय जमिनीला सुरक्षा भिंत नसल्याने पिके, फळे चोरीचे प्रमाण वाढले आहे. पिकांच्या सुरक्षेसाठी चर खोदण्याचे काम सुरू आहे, भविष्यात येथे भिंत बांधण्यात येणार आहे. चर खोदताना काही आडवे येणारे झुडूप काढले आहेत. येथील काही जमीन पिकाऊ करण्याचेही काम सुरू आहे.- डॉ. जी. जी. खोत, सहयोगी संचालक, कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूर

 

खासगी अथवा कोणत्याही शासकीय जमिनीतील झाडे तोडताना वृक्षसंवर्धन समितीची परवानगी घेणे आवश्यक आहे, कृषी संशोधन केंद्राने झाडे तोडण्यासाठी अशी कोणतीही परवानगी घेतलेली नाही.- उदय गायकवाड,सदस्य, वृक्षसंवर्धन समिती, कोल्हापूर 

 

टॅग्स :agricultureशेतीkolhapurकोल्हापूर