शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

कोल्हापूर : काजू फळपीक विकास समितीची स्थापना, ३२ सदस्यांमध्ये जिल्ह्यातील तिघांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 17:55 IST

काजू पिकाच्या सर्वंकष विकासाचे धोरण निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ‘काजू फळपीक विकास समिती’ची स्थापना केली आहे.

ठळक मुद्देकाजू फळपीक विकास समितीची स्थापना३२ सदस्यांमध्ये जिल्ह्यातील तिघांचा समावेश

कोल्हापूर : काजू पिकाच्या सर्वंकष विकासाचे धोरण निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ‘काजू फळपीक विकास समिती’ची स्थापना केली आहे.कोकण विभागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काजूबियांचे मोठे उत्पादन होते. अनेक शेतकऱ्यांचे हे उदरनिवार्हाचे साधन असून, या दोन्ही जिल्ह्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड तालुक्यांतही काजूचे मोठे पीक येते. या पिकाच्या लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत कीड, रोग यांचा मोठा परिणाम होतो. शेतकऱ्यांना येणाऱ्या या अडचणींचा विचार करून या पिकाच्या सर्वंकष विकासासाठी ही समिती नेमण्यात आली आहे.गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये आजऱ्यातील भाजपचे कार्यकर्ते दयानंद भुसारी यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच चंदगड येथील दयानंद काणेकर आणि रमेश अनंत मुळीक यांचाही या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.कोकण विभाग हे या समितीचे कार्यक्षेत्र असून, दोन महिन्यांच्या कालावधीत या समितीने आपला अहवाल द्यावयाचा आहे. उत्पादक शेतकरी, उद्योजक यांच्याशी चर्चा करून या व्यवसायाबाबतच्या अडचणी समजून घ्यावयाच्या असून, त्यानंतर अभिप्रायासह अहवाल शासनाला सादर करावयाचा आहे. 

 

टॅग्स :fruitsफळेGovernmentसरकारzpजिल्हा परिषद