शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

कोल्हापूर : प्रत्येक विभागात कारागीर विद्यापीठ स्थापन करणार : संभाजीराव पाटील निलंगेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 5:26 PM

कारागीर हे देशाची संपत्ती असून ती जपणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात कारागीर कुशल विद्यापीठाची स्थापना केली जाईल. सिद्धगिरी मठावरील कारागीर ज्ञानपीठाला आवश्यक त्या परवानगी, मान्यता देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सोमवारी येथे केले.

ठळक मुद्देसिद्धगिरी ज्ञानपीठासाठी प्रयत्नशील : संभाजीराव पाटील निलंगेकरसिद्धगिरी कारागीर महाकुंभातील ‘कारागीर उत्सव’ परिसंवादाचे उदघाटन

कोल्हापूर : कारागीर हे देशाची संपत्ती असून ती जपणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात कारागीर कुशल विद्यापीठाची स्थापना केली जाईल. सिद्धगिरी मठावरील कारागीर ज्ञानपीठाला आवश्यक त्या परवानगी, मान्यता देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सोमवारी येथे केले.

कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानतर्फे आयोजित सिद्धगिरी कारागीर महाकुंभातील ‘कारागीर उत्सव’या परिसंवादाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गो संवर्धन, कृषी व ग्रामविकास मार्गदर्शक हृदयनाथसिंह, तर राष्ट्रीय कारागीर पंचायतीचे माजी अध्यक्ष नरेंद्रनाथ मेहरोत्रा, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयाचे डॉ. मनोजकुमार प्रमुख उपस्थित होते.

कामगार व कौशल्य विकास मंत्री पाटील निलंगेकर म्हणाले, केंद्र सरकारने महाराष्ट्रामध्ये सहा कौशल्य विद्यापीठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिले विद्यापीठ चंद्रपूरमध्ये उभारणार आहे. यामध्ये जंगल परिसरातील उत्पादन, कौशल्याला बळ दिले जाणार आहे. राष्ट्रीय कारागीर पंचायतीचे माजी अध्यक्ष मेहरोत्रा म्हणाले, स्मार्ट व्हिलेज नको समृद्ध ग्राम बनणे आवश्यक आहे.

कारागीरांचे विश्वविद्यालय उभे रहावे. डॉ. मनोजकुमार म्हणाले, विकासाच्या नावाखाली कारागिरी मारली गेली आहे. गावांना पुनर्रजीवन देणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात कौशल्य विकास विभागाअंतर्गत असणाऱ्या प्रशिक्षण संस्थांच्यावतीने ७५ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश मंत्री पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सिद्धगिरी महासंस्थानला सुर्पूद करण्यात आला.

यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, श्यामबिहारी गुप्ता, गोपाल उपाध्याय, कानसिंग निर्माण, विवेक चतुर्वेदी, वर्धा येथील मगन संग्रहालयच्या अध्यक्ष विभा गुप्ता, कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक करीम, सिद्धगिरी मठाचे कार्यकारी संचालक आर. डी. शिंदे, पी. डी. कांबळे, बी. जी. मांगले, आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील निलंगेकर म्हणाले

  1. *कौशल्य विकासासह शेतकरी, कारागिरांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यास शासनाचे प्राधान्य
  2. *सिद्धगिरी मठाने पुढाकार घेवून गुरुकुल शिक्षण पद्धती विकसित करावी.
  3. * स्वयंपूर्ण गावांच्या निर्मितीसाठी कारागिरांच्या कलेला अधिक प्रोत्साहन देणे गरजेचे.

 

 

टॅग्स :ministerमंत्रीkolhapurकोल्हापूर