शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
2
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
3
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
4
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
5
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
8
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
9
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
10
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
11
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
12
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
13
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
14
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
15
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
16
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
17
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
18
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
19
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : प्रत्येक विभागात कारागीर विद्यापीठ स्थापन करणार : संभाजीराव पाटील निलंगेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 18:38 IST

कारागीर हे देशाची संपत्ती असून ती जपणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात कारागीर कुशल विद्यापीठाची स्थापना केली जाईल. सिद्धगिरी मठावरील कारागीर ज्ञानपीठाला आवश्यक त्या परवानगी, मान्यता देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सोमवारी येथे केले.

ठळक मुद्देसिद्धगिरी ज्ञानपीठासाठी प्रयत्नशील : संभाजीराव पाटील निलंगेकरसिद्धगिरी कारागीर महाकुंभातील ‘कारागीर उत्सव’ परिसंवादाचे उदघाटन

कोल्हापूर : कारागीर हे देशाची संपत्ती असून ती जपणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात कारागीर कुशल विद्यापीठाची स्थापना केली जाईल. सिद्धगिरी मठावरील कारागीर ज्ञानपीठाला आवश्यक त्या परवानगी, मान्यता देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सोमवारी येथे केले.

कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानतर्फे आयोजित सिद्धगिरी कारागीर महाकुंभातील ‘कारागीर उत्सव’या परिसंवादाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गो संवर्धन, कृषी व ग्रामविकास मार्गदर्शक हृदयनाथसिंह, तर राष्ट्रीय कारागीर पंचायतीचे माजी अध्यक्ष नरेंद्रनाथ मेहरोत्रा, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयाचे डॉ. मनोजकुमार प्रमुख उपस्थित होते.

कामगार व कौशल्य विकास मंत्री पाटील निलंगेकर म्हणाले, केंद्र सरकारने महाराष्ट्रामध्ये सहा कौशल्य विद्यापीठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिले विद्यापीठ चंद्रपूरमध्ये उभारणार आहे. यामध्ये जंगल परिसरातील उत्पादन, कौशल्याला बळ दिले जाणार आहे. राष्ट्रीय कारागीर पंचायतीचे माजी अध्यक्ष मेहरोत्रा म्हणाले, स्मार्ट व्हिलेज नको समृद्ध ग्राम बनणे आवश्यक आहे.

कारागीरांचे विश्वविद्यालय उभे रहावे. डॉ. मनोजकुमार म्हणाले, विकासाच्या नावाखाली कारागिरी मारली गेली आहे. गावांना पुनर्रजीवन देणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात कौशल्य विकास विभागाअंतर्गत असणाऱ्या प्रशिक्षण संस्थांच्यावतीने ७५ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश मंत्री पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सिद्धगिरी महासंस्थानला सुर्पूद करण्यात आला.

यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, श्यामबिहारी गुप्ता, गोपाल उपाध्याय, कानसिंग निर्माण, विवेक चतुर्वेदी, वर्धा येथील मगन संग्रहालयच्या अध्यक्ष विभा गुप्ता, कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक करीम, सिद्धगिरी मठाचे कार्यकारी संचालक आर. डी. शिंदे, पी. डी. कांबळे, बी. जी. मांगले, आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील निलंगेकर म्हणाले

  1. *कौशल्य विकासासह शेतकरी, कारागिरांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यास शासनाचे प्राधान्य
  2. *सिद्धगिरी मठाने पुढाकार घेवून गुरुकुल शिक्षण पद्धती विकसित करावी.
  3. * स्वयंपूर्ण गावांच्या निर्मितीसाठी कारागिरांच्या कलेला अधिक प्रोत्साहन देणे गरजेचे.

 

 

टॅग्स :ministerमंत्रीkolhapurकोल्हापूर