शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

कोल्हापूर : प्रत्येक विभागात कारागीर विद्यापीठ स्थापन करणार : संभाजीराव पाटील निलंगेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 18:38 IST

कारागीर हे देशाची संपत्ती असून ती जपणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात कारागीर कुशल विद्यापीठाची स्थापना केली जाईल. सिद्धगिरी मठावरील कारागीर ज्ञानपीठाला आवश्यक त्या परवानगी, मान्यता देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सोमवारी येथे केले.

ठळक मुद्देसिद्धगिरी ज्ञानपीठासाठी प्रयत्नशील : संभाजीराव पाटील निलंगेकरसिद्धगिरी कारागीर महाकुंभातील ‘कारागीर उत्सव’ परिसंवादाचे उदघाटन

कोल्हापूर : कारागीर हे देशाची संपत्ती असून ती जपणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात कारागीर कुशल विद्यापीठाची स्थापना केली जाईल. सिद्धगिरी मठावरील कारागीर ज्ञानपीठाला आवश्यक त्या परवानगी, मान्यता देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सोमवारी येथे केले.

कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानतर्फे आयोजित सिद्धगिरी कारागीर महाकुंभातील ‘कारागीर उत्सव’या परिसंवादाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गो संवर्धन, कृषी व ग्रामविकास मार्गदर्शक हृदयनाथसिंह, तर राष्ट्रीय कारागीर पंचायतीचे माजी अध्यक्ष नरेंद्रनाथ मेहरोत्रा, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयाचे डॉ. मनोजकुमार प्रमुख उपस्थित होते.

कामगार व कौशल्य विकास मंत्री पाटील निलंगेकर म्हणाले, केंद्र सरकारने महाराष्ट्रामध्ये सहा कौशल्य विद्यापीठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिले विद्यापीठ चंद्रपूरमध्ये उभारणार आहे. यामध्ये जंगल परिसरातील उत्पादन, कौशल्याला बळ दिले जाणार आहे. राष्ट्रीय कारागीर पंचायतीचे माजी अध्यक्ष मेहरोत्रा म्हणाले, स्मार्ट व्हिलेज नको समृद्ध ग्राम बनणे आवश्यक आहे.

कारागीरांचे विश्वविद्यालय उभे रहावे. डॉ. मनोजकुमार म्हणाले, विकासाच्या नावाखाली कारागिरी मारली गेली आहे. गावांना पुनर्रजीवन देणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात कौशल्य विकास विभागाअंतर्गत असणाऱ्या प्रशिक्षण संस्थांच्यावतीने ७५ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश मंत्री पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सिद्धगिरी महासंस्थानला सुर्पूद करण्यात आला.

यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, श्यामबिहारी गुप्ता, गोपाल उपाध्याय, कानसिंग निर्माण, विवेक चतुर्वेदी, वर्धा येथील मगन संग्रहालयच्या अध्यक्ष विभा गुप्ता, कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक करीम, सिद्धगिरी मठाचे कार्यकारी संचालक आर. डी. शिंदे, पी. डी. कांबळे, बी. जी. मांगले, आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील निलंगेकर म्हणाले

  1. *कौशल्य विकासासह शेतकरी, कारागिरांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यास शासनाचे प्राधान्य
  2. *सिद्धगिरी मठाने पुढाकार घेवून गुरुकुल शिक्षण पद्धती विकसित करावी.
  3. * स्वयंपूर्ण गावांच्या निर्मितीसाठी कारागिरांच्या कलेला अधिक प्रोत्साहन देणे गरजेचे.

 

 

टॅग्स :ministerमंत्रीkolhapurकोल्हापूर