शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कोल्हापूर : भरधाव कारच्या धडकेत विद्युत खांब कोसळला, लाईन बझार येथे दोन रिक्षांसह चार दुचाकींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 17:27 IST

लाईन बझार पद्मा पथकाजवळ भरधाव आलिशान कार धडकून रस्त्यावरील विद्युत खांब कोसळला. यावेळी खांबाखाली सापडून दोन रिक्षांसह तीन दुचाकींची मोडतोड झाली तर कारमधील दोघेजण जखमी झाले. अमोल अशोक जाधव (२२, रा. लाईन बझार), राहुल नंदकुमार जाधव (२५, रा. राजारामपुरी) अशी त्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देभरधाव कारच्या धडकेत विद्युत खांब कोसळला लाईन बझार येथ दोन रिक्षांसह चार दुचाकींचे नुकसान, दोघे जखमी पोलिसाची मध्यस्थी

कोल्हापूर : लाईन बझार पद्मा पथकाजवळ भरधाव आलिशान कार धडकून रस्त्यावरील विद्युत खांब कोसळला. यावेळी खांबाखाली सापडून दोन रिक्षांसह तीन दुचाकींची मोडतोड झाली तर कारमधील दोघेजण जखमी झाले. अमोल अशोक जाधव (२२, रा. लाईन बझार), राहुल नंदकुमार जाधव (२५, रा. राजारामपुरी) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना रविवारी (दि. १७) मध्यरात्री घडली. अपघातादरम्यान रस्त्यावर वाहनधारकांची वर्दळ नव्हती त्यामुळे मोठा अनर्थ टळला.अधिक माहिती अशी, राहुल नंदकुमार जाधव (लाईन बझार, छावा चौक) यांच्या मालकीची सुमारे ३४ लाख किमतीची आलिशान कार नातेवाईक संग्रामसिंह विलासराव जाधव, अमोल जाधव व राहुल जाधव असे तिघेजण बाहेरगावी गेले होते.

रविवारी मध्यरात्री घरी परतत असताना घरापासून काही अंतरावरील पद्मा पथकाजवळ संग्रामसिंह जाधव याचा भरधाव कारच्या स्टेअरिंगवरील ताबा सुटून ती रस्त्यावरील विद्युत खांबाला धडकली. धडक इतकी जोरात होती की, विद्युत खांब रस्त्यावर कोसळला. या खांबाखाली सापडून दोन रिक्षांसह तीन दुचाकींचे मोठे नुकसान झाले.

कारच्या समोरील काच, डेडलाईट, बॉनेट, बंपर, इंजिन आॅईलचे सुमारे दीड लाख किमतीचे नुकसान झाले. रिक्षाचालक विलास पांडुरंग धुमाळ, चंद्रकांत शिर्के, तस्लिम असेफ शेख, प्रफुल्ल विलासराव धुमाळ, गजानन दिनकर जाधव, शामराव वसंतराव घाटगे (सर्व रा. लाईन बझार) आदींच्या वाहनांचे सुमारे ५ ते २५ हजार रुपयांपर्यंत नुकसान झाले.विद्युत खांब रस्त्यावर कोसळल्याने त्याच्या वाहिन्याही रस्त्यावर लोंबकळत होत्या. त्यातून विद्युत प्रवाहासह सुरू असल्याने नागरिकांनी प्रसंगावधान राखून तत्काळ अग्निशामक दलास फोन केला. जवान ओंकार खेडकर, रमेश पोवार, सुरेंद्र जगदाळे, निवास जाधव, तानाजी वडर यांनी घटनास्थळी धाव घेतली. ‘

महावितरण’च्या वायरमनना बोलावून विद्युत प्रवाह बंद केला. त्यानंतर कारमधील जखमींना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. अपघात मध्यरात्री घडला त्यावेळी विद्युत खांब कोसळल्याने त्यावरील वाहिन्या रस्त्यावर लोंबकळत होत्या. रस्त्यावर कोणी नागरिक नव्हते. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.पोलिसाची मध्यस्थीअपघातानंतर एका पोलिसाने यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. नुकसान झालेल्या वाहनधारकांना भरपाई भरून देण्याची त्याने जबाबदारी स्वीकारल्याने रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता; परंतु या घटनेची नोंद महापालिका अग्निशामक दलाकडे झाली.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात