शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

कोल्हापूर :  ‘सत्ता संपादन निर्धार मेळावा’ पंढरपूरात २० मे रोजी : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 17:22 IST

सत्तेच्या माध्यमातूनच आपले प्रश्न मार्गी लावायचे आहेत, त्यासाठी २० मे रोजी पंढपूरात ‘सत्ता संपादन निर्धार मेळावा’चे आयोजन केल्याची माहिती भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषेदत दिली.

ठळक मुद्दे ‘सत्ता संपादन निर्धार मेळावा’ पंढरपूरात २० मे रोजी : प्रकाश आंबेडकर सत्तेत येऊन आमचे प्रश्न आम्हीच सोडवणार

कोल्हापूर : धनगर समाजाने कॉँग्रेस व भाजप कडे आरक्षणाची मागणी केली, पण कोणीही न्याय दिला नाही. त्यामुळे आता या समाजाने निर्णय घेतला आहे, आलुतेदार -बलुतेदारांना एकत्र करून शाहू, फुले, आंबेडकर यांची चळवळ दृढ करून सत्ता हस्तगत करायची. सत्तेच्या माध्यमातूनच आपले प्रश्न मार्गी लावायचे आहेत, त्यासाठी २० मे रोजी पंढपूरात ‘सत्ता संपादन निर्धार मेळावा’चे आयोजन केल्याची माहिती भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषेदत दिली.धनगर समाज आपल्या न्याय हक्कापासून वंचित राहिला आहे. कॉँग्रेस व भाजप ने त्यांना आश्वासने दिली पण त्याची अंमलबजावणी केली नाही. सत्तेवर येताच पंधरा दिवसात धनगरांना आरक्षण देण्याची घोषणा करणारे भाजपचे नेत्यांनी आता समाजबांधवांचा भावनिक छळ सुरू केला आहे.

सरकारला धडा शिकवण्याची वेळी आली असून सरकार विरोधातील आरपारची लढाई करायची आहे. व्यवस्था परिवर्तन, नवनिर्मिती व क्रांतीच्या नव्या लढाईला आता तोंड फुटले असून धनगर समाज आता मागतकर्ती नसून राज्यकर्ती होणार आहे. या लढाईची सुरूवात २० मे रोजी पंढरपूरातील निर्धार मेळाव्याने होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.समाजातील आलुतेदार-बलुतेदारांनी एकत्रीत येण्याची गरज असून या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून तसा प्रयत्न सुरू आहे. समाजामध्ये ३३ टक्के समुह आहेत, या सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचे असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी सागिंतले. 

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरkolhapurकोल्हापूर