शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

कोल्हापूर : पावसामुळे एस.टी.चे ११ लाखांचे उत्पन्न बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 17:45 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुराचे पाणी आल्याने अनेक मार्ग पाण्याखाली गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने काही मार्गांवरील फेऱ्या रद्द केल्याने सुमारे ११ लाख ३९८ रुपयांचे उत्पन्न बुडले आहे.

ठळक मुद्दे पावसामुळे एस.टी.चे ११ लाखांचे उत्पन्न बुडालेदोन दिवसांत ३९ हजार किलोमीटर रद्द; १ हजार फेऱ्या ठप्प

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुराचे पाणी आल्याने अनेक मार्ग पाण्याखाली गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने काही मार्गांवरील फेऱ्या रद्द केल्याने सुमारे ११ लाख ३९८ रुपयांचे उत्पन्न बुडले आहे.जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाणी पात्राबाहेर पडल्याने अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. एस. टी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही मार्गांवरील वाहतूक बंद केली आहे. प्रवाशांची अडचण दूर करण्यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असली तरी प्रवाशांना यांचा आर्थिक फटका मात्र बसत आहे.कोल्हापूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर रजपूतवाडीजवळ पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक पुणे-बंगलोर महामार्गावरून बोरपाडळेमार्गे वळविण्यात आली आहे.

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर टेकवाडीजवळ पाणी आल्याने कोकणात जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. ही वाहतूक राधानगरीमार्गे वळविण्यात आली आहे. कळे येथे पाणी आल्याने बाजारभोगावला जाणारी वाहतूक बंद आहे. भडगाव पुलावर पाणी आल्याने गडहिंग्लजमधून नेसरी, चंदगडला जाणारी वाहतूक आजरामार्गे वळविली आहे.

३९ हजार किलोमीटर रद्दकोल्हापूर विभागातील कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, कागल, राधानगरी, गगनबावडा, आजरा या बारा आगारांतील दोन दिवसांत १ हजार १७ गाड्यांच्या फेऱ्या पावसामुळे रद्द झाल्या आहेत. त्यामुळे एकूण ३९ हजार ५०५ किलोमीटरचा प्रवास रद्द झाल्याने सुमारे ११ लाख ४८८ रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळkolhapurकोल्हापूर