शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

कोल्हापूर : पावसामुळे एस.टी.चे ११ लाखांचे उत्पन्न बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 17:45 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुराचे पाणी आल्याने अनेक मार्ग पाण्याखाली गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने काही मार्गांवरील फेऱ्या रद्द केल्याने सुमारे ११ लाख ३९८ रुपयांचे उत्पन्न बुडले आहे.

ठळक मुद्दे पावसामुळे एस.टी.चे ११ लाखांचे उत्पन्न बुडालेदोन दिवसांत ३९ हजार किलोमीटर रद्द; १ हजार फेऱ्या ठप्प

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुराचे पाणी आल्याने अनेक मार्ग पाण्याखाली गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने काही मार्गांवरील फेऱ्या रद्द केल्याने सुमारे ११ लाख ३९८ रुपयांचे उत्पन्न बुडले आहे.जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाणी पात्राबाहेर पडल्याने अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. एस. टी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही मार्गांवरील वाहतूक बंद केली आहे. प्रवाशांची अडचण दूर करण्यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असली तरी प्रवाशांना यांचा आर्थिक फटका मात्र बसत आहे.कोल्हापूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर रजपूतवाडीजवळ पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक पुणे-बंगलोर महामार्गावरून बोरपाडळेमार्गे वळविण्यात आली आहे.

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर टेकवाडीजवळ पाणी आल्याने कोकणात जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. ही वाहतूक राधानगरीमार्गे वळविण्यात आली आहे. कळे येथे पाणी आल्याने बाजारभोगावला जाणारी वाहतूक बंद आहे. भडगाव पुलावर पाणी आल्याने गडहिंग्लजमधून नेसरी, चंदगडला जाणारी वाहतूक आजरामार्गे वळविली आहे.

३९ हजार किलोमीटर रद्दकोल्हापूर विभागातील कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, कागल, राधानगरी, गगनबावडा, आजरा या बारा आगारांतील दोन दिवसांत १ हजार १७ गाड्यांच्या फेऱ्या पावसामुळे रद्द झाल्या आहेत. त्यामुळे एकूण ३९ हजार ५०५ किलोमीटरचा प्रवास रद्द झाल्याने सुमारे ११ लाख ४८८ रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळkolhapurकोल्हापूर