शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
3
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
4
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
5
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
6
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
7
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
8
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
9
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
10
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
11
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
12
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
13
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
14
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
15
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
16
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
17
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
18
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
19
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
20
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”

कोल्हापूर : पेयजल योजना सलाईनवर : देखभाल-दुुरुस्ती निधीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:36 IST

वारंवार विनंत्या, पत्रव्यवहार करूनही शासनाकडून एक रुपयाचाही निधी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नळपाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्तीची कामे रखडली आहेत. निधी मंजूर आहे;

ठळक मुद्दे जिल्हा परिषद सदस्यांमध्येही नाराजी

नसिम सनदी ।कोल्हापूर : वारंवार विनंत्या, पत्रव्यवहार करूनही शासनाकडून एक रुपयाचाही निधी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नळपाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्तीची कामे रखडली आहेत. निधी मंजूर आहे; पण मंत्रालय स्तरावरून निधी प्रत्यक्ष खात्यावर जमा होत नसल्याने जिल्हा परिषदेचे प्रशासनही सध्या हतबल झाले आहे.

ग्रामीण भागात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय पेयजल व मुख्यमंत्री पेयजल अशा दोन योजना राबविल्या जातात. केंद्र सरकारने गेल्या वर्षी अध्यादेश काढत पेयजल योजनेच्या निधीतून देखभाल दुरुस्तीची कामे करण्यास निर्बंध घातले. यावरून बऱ्याच तक्रारी झाल्यानंतर मुख्यमंत्री पेयजल योजनेतील १५ टक्के निधी हा देखभाल दुरुस्तीसाठी वापरावा, असा निर्णय होऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी सुरू झाली. तथापि, प्रत्यक्षात गेल्या वर्षभरात एक रुपयाचाही निधी देखभाल दुरुस्तीसाठी आलेला नाही.

आता लोकसभा निवडणुकीची घाई सुरू झाल्याने आचारसंहिता लागण्यापूर्वी निधी वाटप व कामांना मंजुरी घेण्याचे आदेश शासन स्तरावरून जिल्हा परिषदांना प्राप्त झाले आहेत. तथापि, निधीच पाठविला जात नसल्याने कामे कधी सुरू होणार, अशी आता विचारणा होऊ लागली आहे.

निधीअभावी सर्व कामे खोळंबली आहेत.जिल्हा परिषदेने पेयजल योजनेच्या देखभालीसाठी २६ कोटी ५२ लाखांच्या निधीची मागणी सरकारकडे केली आहे. यापैकी राज्याच्या वाट्याची १४ कोटी रक्कम शासनाकडून डीपीडीसीकडे पाठविली जाणार आहे. या निधीपैकी १५ टक्के असा ४ कोटी २0 लाखांचा निधी देखभाल दुरुस्तीसाठीच राखून ठेवला आहे. यातीलही निम्मा निधी वीज बिलासाठी राखीव आहे. म्हणजे २ कोटी १0 लाख रुपयेच देखभालीसाठी मिळणार आहेत.जिल्हा परिषदेला निधीची प्रतीक्षादुरुस्तीची कामे जास्त असल्यानेअजून पाच कोटी रुपये लागणार असल्याने याबाबत स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी नोव्हेंबरमध्ये यासंदर्भात शासनाकडे पत्र पाठवून निधीची मागणी केली आहे.तत्पूर्वी सप्टेंबरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक व आमदार अमल महाडिक यांनी स्वत: पाणीपुरवठा मंत्र्यांची भेट घेऊन २१ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला आहे. या दोन्हीही प्रस्तावांची शासनाने अद्याप दखल घेतली नसल्याने जिल्हा परिषद निधीच्या प्रतीक्षेत आहे.कामे करायची तरी कधी?देखभाल दुरुस्ती हा जिव्हाळ्याचा विषय असून, पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करावी लागतात. दुष्काळी पार्श्वभूमीवर, तर ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक होते; पण अजून निधीच हातात आला नसल्याने दुरुस्तीची कामे पावसाळ्यात पूर आल्यावर करायची काय? असा संतप्त सवाल सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सुभाष सातपुते यांनी केला आहे. 

प्रशासन व लोकप्रतिनिधी या दोघांकडून निधी मागणीसाठी पाठविलेल्या प्रस्तावाबाबत शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. येत्या आठ दिवसांत यातील काही निधी प्राप्त होईल, अशी आशा आहे. त्यामुळे अनेक कामे मार्गी लागतील.- मनीष पवार, प्रभारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा

 

टॅग्स :water transportजलवाहतूकkolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद