शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पेयजल योजना सलाईनवर : देखभाल-दुुरुस्ती निधीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:36 IST

वारंवार विनंत्या, पत्रव्यवहार करूनही शासनाकडून एक रुपयाचाही निधी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नळपाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्तीची कामे रखडली आहेत. निधी मंजूर आहे;

ठळक मुद्दे जिल्हा परिषद सदस्यांमध्येही नाराजी

नसिम सनदी ।कोल्हापूर : वारंवार विनंत्या, पत्रव्यवहार करूनही शासनाकडून एक रुपयाचाही निधी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नळपाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्तीची कामे रखडली आहेत. निधी मंजूर आहे; पण मंत्रालय स्तरावरून निधी प्रत्यक्ष खात्यावर जमा होत नसल्याने जिल्हा परिषदेचे प्रशासनही सध्या हतबल झाले आहे.

ग्रामीण भागात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय पेयजल व मुख्यमंत्री पेयजल अशा दोन योजना राबविल्या जातात. केंद्र सरकारने गेल्या वर्षी अध्यादेश काढत पेयजल योजनेच्या निधीतून देखभाल दुरुस्तीची कामे करण्यास निर्बंध घातले. यावरून बऱ्याच तक्रारी झाल्यानंतर मुख्यमंत्री पेयजल योजनेतील १५ टक्के निधी हा देखभाल दुरुस्तीसाठी वापरावा, असा निर्णय होऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी सुरू झाली. तथापि, प्रत्यक्षात गेल्या वर्षभरात एक रुपयाचाही निधी देखभाल दुरुस्तीसाठी आलेला नाही.

आता लोकसभा निवडणुकीची घाई सुरू झाल्याने आचारसंहिता लागण्यापूर्वी निधी वाटप व कामांना मंजुरी घेण्याचे आदेश शासन स्तरावरून जिल्हा परिषदांना प्राप्त झाले आहेत. तथापि, निधीच पाठविला जात नसल्याने कामे कधी सुरू होणार, अशी आता विचारणा होऊ लागली आहे.

निधीअभावी सर्व कामे खोळंबली आहेत.जिल्हा परिषदेने पेयजल योजनेच्या देखभालीसाठी २६ कोटी ५२ लाखांच्या निधीची मागणी सरकारकडे केली आहे. यापैकी राज्याच्या वाट्याची १४ कोटी रक्कम शासनाकडून डीपीडीसीकडे पाठविली जाणार आहे. या निधीपैकी १५ टक्के असा ४ कोटी २0 लाखांचा निधी देखभाल दुरुस्तीसाठीच राखून ठेवला आहे. यातीलही निम्मा निधी वीज बिलासाठी राखीव आहे. म्हणजे २ कोटी १0 लाख रुपयेच देखभालीसाठी मिळणार आहेत.जिल्हा परिषदेला निधीची प्रतीक्षादुरुस्तीची कामे जास्त असल्यानेअजून पाच कोटी रुपये लागणार असल्याने याबाबत स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी नोव्हेंबरमध्ये यासंदर्भात शासनाकडे पत्र पाठवून निधीची मागणी केली आहे.तत्पूर्वी सप्टेंबरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक व आमदार अमल महाडिक यांनी स्वत: पाणीपुरवठा मंत्र्यांची भेट घेऊन २१ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला आहे. या दोन्हीही प्रस्तावांची शासनाने अद्याप दखल घेतली नसल्याने जिल्हा परिषद निधीच्या प्रतीक्षेत आहे.कामे करायची तरी कधी?देखभाल दुरुस्ती हा जिव्हाळ्याचा विषय असून, पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करावी लागतात. दुष्काळी पार्श्वभूमीवर, तर ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक होते; पण अजून निधीच हातात आला नसल्याने दुरुस्तीची कामे पावसाळ्यात पूर आल्यावर करायची काय? असा संतप्त सवाल सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सुभाष सातपुते यांनी केला आहे. 

प्रशासन व लोकप्रतिनिधी या दोघांकडून निधी मागणीसाठी पाठविलेल्या प्रस्तावाबाबत शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. येत्या आठ दिवसांत यातील काही निधी प्राप्त होईल, अशी आशा आहे. त्यामुळे अनेक कामे मार्गी लागतील.- मनीष पवार, प्रभारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा

 

टॅग्स :water transportजलवाहतूकkolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद