शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होऊन प्रशासनास सहकार्य करावे, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 17:36 IST

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून पूरपरिस्थितीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल होत आहेत.

कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून पूरपरिस्थितीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल होत आहेत. लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होऊन प्रशासनास सहकार्य  करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

जिल्ह्यात काल आणि आज पडलेल्या पावसामुळे तसेच धरण प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पूरपरिस्थिती गंभीर होऊ शकते याचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला आणि आर्मी व नेव्हीला मदतीसाठी विनंती केली आहे. त्यानुसार एनडीआरएफचे एक पथक दाखल झाले असून त्यांनी आंबेवाडी-चिखली येथील पूरग्रस्तांसाठी बचाव  व मदतकार्य सुरू केले आहे. दुसरे पथक थोड्याच वेळात दाखल होणार असून आर्मीचे 80 जणांचे पथक कोल्हापूरकडे रवाना झाले असून मुंबईहून नेव्हीची यंत्रणाही विमानाने कोल्हापूरात येईल. या सर्वांची मदत घेऊन जिल्ह्यातील गंभीर बनत चालेली परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र लोकांनी घरात पाणी येण्याची वाट न बघता अगोदरच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

जिल्ह्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी, शिरोळ तालुक्यातील राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, हासूर, कुटवाड, कनवाड, हासुर आदि गावांना पाण्याने वेढा दिला आहे. या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम प्रशासनाने युध्द पातळीवर हाती घेतले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, याबरोबरच कोल्हापूर शहरातील सखल भागात पूराचे पाणी चढत आहे.लोकांनी पाणी चढण्याअगोदरच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, तसेच शहरातील पूराचे पाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र लोकांनी पूरपरिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

लोकांचे सुरक्षित ठिकाणी  स्थलांतर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे पाण्याचा वेढा दिलेल्या गावातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्याने हाती घेतले असून यासाठी स्थानिक यंत्रणांबरोबरच एनडीआरएफ,आर्मी व नेव्हीची मदत घेण्यात येत आहे. काल संध्याकाळपर्यंत जिल्ह्यतील  1353 कुटुंबातील 5851 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.

 आज दिवसभरात शिये येथील 130 कुटुंबाचे, चिखली- आंबेवाडी येथील 300 कुटुंबाचे व गाडेगोंडवाडी येथील 90 कुटुंबाचे, परिते येथील 22 कुटुंबाचे, निढोरी येथील 82 कुटुंबाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे तर  पाडळी बु. गावातील 100  टक्के स्थलांतर झाले आहे. तसेच आरे गावचे 75 टक्के स्थलांतर झाले आहे. 

गगनबावडा तालुक्यातील 190 लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असून शहरातही अनेक ठिकाणी पूरग्रस्तांचे स्थलांतर केले आहे. पूराचे पाणी शिरलेल्या जिल्ह्याच्या अनेक गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.    राजाराम बंधारा दुपारी 12 वाजताची पाणी पातळी 52 फूट 6 इंच होती. त्याबरोबरच  राधानगरी धरणातून 17 हजार 400 क्युसेक, तुळशी धरणातून 4 हजार 947, चिकोत्रा धरणातून 2 हजार क्युसेक, दुधगंगा धरणातून 20 हजार 300, कोयना धरणातून 1 लाख 10 हजार 970 क्युसेक्सचा  विसर्ग सुरू आहे. 

धरण प्रकल्पातून सोडण्यात येणारे पाणी आणि सध्या सुरू असलेला पाऊस यामुळे नद्याच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. तरी नदी पात्रालगतच्या लोकांनी सतर्क राहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून जिल्हयातील जनतेने घाबरुन जाऊ नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. पूरग्रस्तांच्या व नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हास्तराव नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून त्याचा टोल फ्री क्रमांक 1077 असा आहे. जनतेने टोल फ्री क्रमांकावर पूरपरिस्थितीबाबत अथवा मदतीची आवश्यकता असल्यास  संपर्क साधावा, असे आवाहनही दौलत देसाई यांनी केले आहे.

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर