शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Kolhapur: ‘केडीसीसी’चा दहा हजार कोटी ठेवीचा विक्रम, ढोबळ नफ्याचा तीनशे कोटींचा टप्पा पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:31 IST

दहा वर्षांत तब्बल ७ हजार कोटींनी ठेवीत वाढ  

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (केडीसीसी) २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल १० हजार काेटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार केला आहे. प्रशासकीय कारकीर्द संपुष्टात येऊन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर गेल्या दहा वर्षांत बँकेच्या ठेवी सात हजार कोटीने वाढल्या आहेत. हा बँकेवर असणारा सामान्य माणसाचा विश्वास अधोरेखित होतो.जिल्हा बँकेचा संचित तोटा वाढल्याने बँकेवर नोव्हेंबर २००९ मध्ये संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ आणले. नोव्हेंबर २००९ ते मे २०१५ पर्यंत जिल्हा बँकेवर प्रशासकीय मंडळ कार्यरत होते. प्रशासकीय मंडळाने कर्मचाऱ्यांच्या साथीने काही वसुली नेटाने करून संचित कमी करण्याचा प्रयत्न केला.

पण, तरीही मार्च २०१५ मध्ये बँकेचा १०३ कोटी संचित तोटा राहिला. सहकार विभागाने बँकेची निवडणूक लावली आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ कार्यरत झाले. मंत्री मुश्रीफ व संचालकांनी बँक व्यवस्थापनाला आर्थिक शिस्त लावत असताना स्वत:पासून काटकसरीचे धोरण अवलंबले.त्यानंतर, बँकेने प्रगतीला सुरुवात केली. एकीकडे ग्राहकांचा विश्वास निर्माण करत ठेवी वाढीसाठी विशेष मोहीम राबवली. दुसऱ्या बाजूला विविध कर्ज याेजनांच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धीचे उद्दिष्ट ठेवले. त्यामुळेच, गेल्या पंधरा वर्षांत ठेवीमध्ये तब्बल ७ हजार कोटीने वाढ होण्याची किमया बँकेने केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत एक हजार कोटीने ठेवीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी २४२.६५ कोटींचा ढोबळ नफा होता, यावर्षी तो ३२० कोटींच्या पुढे गेल्याचे समजते.बँकेची गाडी न वापरणारे अध्यक्षसहकारी संस्थांमध्ये अध्यक्षांना गाडी असते. मात्र, २०१५ पासून अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षांसह संचालकांच्या गाड्या बंद करून काटकसरीचे धोरण अवलंबले. बँकेची गाडी न वापरणारे अध्यक्ष मुश्रीफ हे राज्यातील जिल्हा बँकेचे एकमेव अध्यक्ष आहेत.

तुलनात्मक बँकेची झेप..

तपशीलमार्च २०१५मार्च २०२४   मार्च २०२५
ठेवी२८९० कोटी९०४४ कोटी१० हजार कोटी
कर्जे२१६७ कोटी    ६९७६ कोटी    ७६०० कोटी
नफा/तोटा १०३ कोटी (संचित तोटा)२४२ कोटी (ढोबळ नफा) ३२० कोटी (ढोबळ नफा)

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकHasan Mushrifहसन मुश्रीफ