शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कोल्हापूर : व्यवहार चातूर्याने जगण्याच्या प्रेरणा निश्चित करा : इंद्रजित देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 16:16 IST

लोक सत्ता, संपत्ती, मान,प्रतिष्ठा मिळण्यासाठी आयुष्यभर त्याच्या मागे धावतात. आयुष्य संपत आल्यानंतर लक्षात येते की या गोष्टी क्षणभंगूर असतात. आयुष्य आहे तोपर्यंत उच्चतम जीवन मुल्ये जगा त्यासाठी व्यवहार चातुर्याने जगण्याच्या प्रेरणा निश्चित करा असे आवाहन शनिवारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देव्यवहार चातूर्याने जगण्याच्या प्रेरणा निश्चित करा : इंद्रजित देशमुख वासुदेव देशिंगकर लिखित पुस्तकांचे प्रकाशन

कोल्हापूर : लोक सत्ता, संपत्ती, मान,प्रतिष्ठा मिळण्यासाठी आयुष्यभर त्याच्या मागे धावतात. आयुष्य संपत आल्यानंतर लक्षात येते की या गोष्टी क्षणभंगूर असतात. आयुष्य आहे तोपर्यंत उच्चतम जीवन मुल्ये जगा त्यासाठी व्यवहार चातुर्याने जगण्याच्या प्रेरणा निश्चित करा असे आवाहन शनिवारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले.कोल्हापुरातील रा. ना सामाणी सभागृहात डॉ. वासुदेव देशिंगकर लिखित व्यवहार चातुर्य व प्रेरणास्त्रोत या दोन पुस्तकांचे प्रकाशन समारंभाप्रसंगी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उद्योगपती रामप्रताप झंवर होते. व्यासपीठावर अक्षरदालनचे अमेय जोशी, डॉ. सुनिलकुमार लवटे उपस्थित होते.देशमुख म्हणाले, आपल्या जीवनाचे यश कशात आहे प्रत्येकाने ठरवले पाहीजे. पैसा आणि व्यवहाराने श्रीमंत होणे म्हणजे यश नव्हे कारण आजही श्रीमंत माणसांच्या नव्हे तर आयुष्यभर निर्विकार राहिलेल्या संतांच्या पालख्या उचलल्या जातात. सत्ता, संपत्ती, मान, प्रतिष्ठा, सौंदर्य नश्वर आहे. दुसऱ्यांचे जीवन समृद्ध करताना आपलेही आयुष्य नितीमुल्याने जगा, कुटूंब व्यवस्था आणि नात्यांचे महत्व जाणा.

सुनिलकुमार लवटे म्हणाले, व्यवहार चातूर्य आणि प्रेरणास्त्रोत ही पुस्तके म्हणजे आयुष्याचे सिंहावलोकन आहे. ही पुस्तके नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारे आणि ज्येष्ठांसाठी जगण्याच्या वाटा सांगणारे आहेत.रामप्रताप झंवर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रसन्न देशिंगकर यांनी सुत्रसंचलन केले. अमेय जोशी यांनी आभार मानले.

 कोल्हापुरातील रा. ना सामाणी सभागृहात शनिवारी डॉ. वासुदेव देशिंगकर लिखित पुस्तकांचे प्रकाशन अतिरिक्त कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी अमेय जोशी, डॉ. सुनिलकुमार लवटे, उद्योगपती रामप्रताप झंवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य