शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

कोल्हापूर : कार्यालयीन कारभाराची उच्च स्तरीय चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 18:12 IST

कार्यालयीन कारभाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी कोल्हापूर भारत राखीव बटालियन-३ च्या कार्यालयात झालेल्या लाचलुचपतच्या कारवाई नंतर कार्यालयातील कामकाजाचे नमुने व गैरप्रकार पुढे येत असून सन २०१६ पासून झालेल्या कार्यालयीन भरतीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.

ठळक मुद्देकार्यालयीन कारभाराची उच्च स्तरीय चौकशीची मागणी कारवाई न होण्यामागचे गौडबंगाल

कोल्हापूर : कार्यालयीन कारभाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी कोल्हापूर भारत राखीव बटालियन-३ च्या कार्यालयात झालेल्या लाचलुचपतच्या कारवाई नंतर कार्यालयातील कामकाजाचे नमुने व गैरप्रकार पुढे येत असून सन २०१६ पासून झालेल्या कार्यालयीन भरतीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.सामूहिक पद्धतीने लाच घेण्याच्या प्रकाराने उजेडात आलेला भारत राखीव बटालियनच्या कारभार जनतेसमोर आला आहे. येथे जवानांच्या प्रत्येक कामात टक्केवारीही ठरलेली आहे. हा प्रकार गेले कित्येक वर्ष चालू आहे.

सुरुवातीच्या काळात या प्रकाराला काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विरोध झाला; पण हा विरोध मोडून काढण्यात लाचखोर अधिकारी यशस्वी झाले; मात्र विरोध करणारे गडचिरोली, पुण्याला पाठविण्यात आले. विरोध करणारा या कार्यालयात ठेवायचा नाही. असा अलिखित नियमच या कार्यालयात आहे.या कार्यालयामार्फत सन २०१७ मध्ये झालेल्या भरतीचे गौडबंगाल काय अशी चर्चा जवानांच्या सोशलमीडिया ग्रुपवर रंगली असून यातूनच बटालियनच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी होत आहे.

या भरतीमध्ये झालेला गैर कारभार कार्यालयातील ज्या अधिकाऱ्यांना माहीत झाला, ज्यांनी आवाज उठवला, त्यांना कार्यालयातून गरज नसतानाही गडचिरोलीला पाठविण्यात आले. तेथील कार्यकाळ पूर्ण होताच त्यांना मूळ ठिकाणी हजर करून घेणे आवश्यक असताना पुन्हा त्यांना प्रशिक्षण केंद्र पुणे या ठिकाणी पाठविण्यात आले.

याबाबत विशेष महानिरीक्षकाकडे तक्रारीनंतर त्यांना मूळ पदावर हजर होण्यासाठी सांगण्यात आले, मात्र समादेशकांनी त्यांना हजर करून घेण्याऐवजी त्यांची गैरहजरी घेऊन त्याचे एक महिन्याचे वेतनही रोखले. त्या वरिष्ठांना शासकीय कोट्यातून मिळणारे शासकीय निवासस्थानही त्यांना मिळू नये, यासाठी एक यंत्रणा कार्यरत असल्याचे त्या पत्रात लिहिण्यात आले आहे.याच बटालियनमधील काही जवानांनी कार्यालयाकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी वरिष्ठांना पत्रे दिली होती; मात्र त्यावरही आजपर्यंत काही कारवाई न होण्यामागचे गौडबंगाल जवानांना समजलेले नाही.

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर