शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्यांनी पाडले कांदा सौदे बंद, व्यापाऱ्यांना विचारला जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 19:29 IST

दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी सौदे बंद पाडले. व्यापाऱ्यांना तब्बल तासभर धारेवर धरल्याने बाजार समितीमधील वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले. समिती प्रशासनाने चर्चा केल्यानंतर पुन्हा सौदे पूर्ववत झाले.

ठळक मुद्दे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी पाडले कांदा सौदे बंदव्यापाऱ्यांना विचारला जाब१६ रुपये दर झाल्याने कांदा उत्पादक आक्रमक

कोल्हापूर : दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी सौदे बंद पाडले. व्यापाऱ्यांना तब्बल तासभर धारेवर धरल्याने बाजार समितीमधील वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले. समिती प्रशासनाने चर्चा केल्यानंतर पुन्हा सौदे पूर्ववत झाले.कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत रोज सरासरी १२ हजार पिशव्यांची आवक होते. बुधवारी तब्बल १५ हजार ४७९ पिशव्यांची आवक झाल्याने दरात थोडी घसरण झाली. गेले चार दिवस चांगल्या कांद्याला २३ ते २४ रुपये किलो दर राहिला; पण बुधवारी चांगल्या कांद्याचा दर २० रुपयांपर्यंतच थांबल्याने शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले.

 

 त्यानंतर शेतकऱ्यांनी समिती कार्यालयाकडे मोर्चा वळवत प्रशासनास जाब विचारला. समितीचे सभापती कृष्णात पाटील, संचालक नंदकुमार वळंजू, बाबूराव खोत, सचिव मोहन सालपे, उपसचिव राजेंद्र मंडलिक यांनी व्यापारी व शेतकऱ्यांची बैठक घेतली.

यामध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडत व्यापारी जाणीवपूर्वक दर पाडत असल्याचा आरोप केला. सोमवार, मंगळवारी २५ रुपये किलो असणारा कांदा एकदम १७ रुपयांवर कसा आला? अशी विचारणा करीत ‘दर सुधारले नाहीत तर सौदे सुरू होऊ देणार नाही,’ अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.

शेतकरी आमचे दैवत आहेत. तुम्ही आलात तरच आमची दुकाने सुरू राहतील, असे व्यापारी अशोककुमार आहुजा यांनी सांगितले. पुण्यासह इतर बाजारपेठांतील आजचे दर पहा, सगळीकडेच दर घसरल्याने येथे कोणीही दर पाडत नसल्याचे आहुजा यांनी सांगितले. २० रुपयांच्या खाली सौद्यात दर येणार नाही, याची खात्री द्या; मगच सौदे सुरू करा, यावर शेतकरी ठाम राहिले.

सौद्यात तुम्हाला अपेक्षित दर मिळाला नाही तर विक्री करू नका, तुमचा कांदा व्यापाऱ्यांच्या गोदामात सुरक्षित राहील. त्याचे कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणार नाही. शेतकऱ्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय समिती करील, असे सभापती कृष्णात पाटील, नंदकुमार वळंजू व मोहन सालपे यांनी सांगितले. त्याला व्यापाऱ्यांनीही सहमती दर्शविल्यानंतर सौदे पूर्ववत सुरू झाले.

बंदनंतर तोच दर!दरातील घसरणीचा निषेध करीत शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले. समितीने हस्तक्षेप केल्यानंतर सौदे सुरू झाले; पण दरात फारसा फरक पडला नाही.

 

व्यापाऱ्यांनी लूट सुरू केली असून, सरकारचे कोणतेच नियंत्रण राहिलेले नाही. आवक वाढली तरी एका दिवसात किलोमागे आठ रुपयांची घसरण होते कशी? किमान २५ रुपये दर मिळणे अपेक्षित आहे.- संपत शिरसाट,शेतकरी, श्रीगोंदा 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीonionकांदा