शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

कोल्हापुरातील धरणे सुरक्षित, ‘पाटबंधारे’ चार दिवसांत अहवाल देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 12:18 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे लघुपाटबंधारे तलाव फुटल्यानंतर राज्यातील सर्व धरणांचे आॅडिट करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार कोल्हापुरातील बहुतांश धरणांचे आॅडिट पूर्ण झाले असून, सर्व धरणे सुरक्षित आहेत. याबाबतचा अहवाल येत्या चार दिवसांत सरकारला पाठविला जाणार आहे. या आॅडिटशिवाय पावसाळ्यापूर्वी एप्रिल-मेमध्ये; तर पावसाळ्यानंतर नोव्हेंबर महिन्यात धरणांची तपासणी केली जाते.

ठळक मुद्देकोल्हापुरातील धरणे सुरक्षित, वर्षातून दोन वेळा आॅडिट‘पाटबंधारे’ चार दिवसांत अहवाल देणार

राजाराम लोंढे

कोल्हापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे लघुपाटबंधारे तलाव फुटल्यानंतर राज्यातील सर्व धरणांचे आॅडिट करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार कोल्हापुरातील बहुतांश धरणांचे आॅडिट पूर्ण झाले असून, सर्व धरणे सुरक्षित आहेत. याबाबतचा अहवाल येत्या चार दिवसांत सरकारला पाठविला जाणार आहे. या आॅडिटशिवाय पावसाळ्यापूर्वी एप्रिल-मेमध्ये; तर पावसाळ्यानंतर नोव्हेंबर महिन्यात धरणांची तपासणी केली जाते.तिवरे धरण फुटल्यानंतर राज्यातील पाटबंधाऱ्याची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पाटबंधारे विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकारी अभियंत्यांकडून सर्व धरणांचे आॅडिट करून तत्काळ अहवाल मागविला आहे. कोल्हापुरात ‘वारणा’, ‘राधानगरी’, ‘दूधगंगा’, ‘तुळशी’ या मोठ्या प्रकल्पांसह मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्प ४० च्या पुढे आहेत. या धरणांची देखरेख ‘उत्तर’ व ‘दक्षिण’ विभागामार्फत केली जाते. धरणांचे दरवर्षी दोन वेळा आॅडिट केले जाते.

पावसाळ्यापूर्वी एप्रिल-मे; तर पावसाळ्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आॅडिट केले जाते. यापैकी एक आॅडिट पाटबंधाऱ्यांचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता; तर दुसऱ्यांदा नाशिक येथील धरण सुरक्षितता संघटनेच्या माध्यमातून केले जाते. या वर्षीही आॅडिट झालेले आहे.

तिवरे धरणफुटीनंतर राज्य सरकारने पुन्हा आॅडिट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंत्यांनी काम सुरू केले असून सर्व धरणे, बंधारे व तलाव १०० टक्के सुरक्षित असल्याचा अहवाल तयार झाला आहे. काही किरकोळ दुरुस्त्या असतील तर त्या स्थानिक पातळीवरच करण्याच्या सूचना दिल्या जातात.‘दूधगंगा’ व ‘वारणा’ धरणांना गळती आहे. याबाबत धरण सुरक्षितता संघटनेला कळविलेले आहे. त्यांनी केंद्रीय जलविद्युत संशोधन केंद्र, दिल्ली यांच्यामार्फत उपाययोजना सुरू केल्या आहेत. या केंद्रात शास्त्रज्ञ आहेत. ते धरणाला भेट देऊन कशा प्रकारे दुरुस्तीचे काम केले पाहिजे, याविषयी मार्गदर्शन करतात.काळम्मावाडीची गळीत कमी करण्यात यश!काळम्मावाडी धरणाला फार पूर्वीपासून गळती आहे. १९९९ मध्ये प्रतिसेकंद ३८५ लिटर पाणी गळतीतून जात होते. त्यानंतर वेळोवेळी उपाय केल्याने आता केवळ प्रतिसेकंद ८० लिटर पाण्याची गळती राहिली आहे.धरणक्षेत्रांत रोज दोन-तीन भूकंप‘दूधगंगा’, ‘वारणा’, ‘कोयना’ या पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख धरण परिसरांत रोज दोन ते तीन भूकंप होतातच. ३.५ रेक्टरपेक्षा कमी असल्याने ते जाणवत नाहीत. वर्षभरात भूकंपाचे ६०० धक्के होतात. त्याची नोंद पाटबंधारे विभागाकडे होते.तलाव, बंधारे अंतर्गत सिंचनक्षेत्रधरणाचा प्रकार              बांधण्याची जबाबदारी         सिंचनक्षेत्र हेक्टरमध्ये

  1. पाझर तलाव                     जिल्हा परिषद                      ० ते १००
  2. लघू पाटबंधारा                 जलसंधारण विभाग             १०० ते २५०
  3. मध्यम प्रकल्प                 पाटबंधारे विभाग                 २५० ते १०००
  4. मोठे प्रकल्प                      पाटबंधारे विभाग               १००० च्या पुढे

 

जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित असून वर्षातून दोन वेळा त्यांचे आॅडिट होते. तिवरेच्या घटनेनंतर पुन्हा आॅडिट केले जात असून, त्याचा अहवाल लवकरच सादर केला जाईल.- एस. एम. गुरव, उपकार्यकारी अभियंता 

 

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर