शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन
3
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
4
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
5
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
6
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
7
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
8
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
9
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
10
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
11
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
12
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
13
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
14
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
15
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
16
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
17
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
18
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
19
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
20
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील धरणे सुरक्षित, ‘पाटबंधारे’ चार दिवसांत अहवाल देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 12:18 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे लघुपाटबंधारे तलाव फुटल्यानंतर राज्यातील सर्व धरणांचे आॅडिट करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार कोल्हापुरातील बहुतांश धरणांचे आॅडिट पूर्ण झाले असून, सर्व धरणे सुरक्षित आहेत. याबाबतचा अहवाल येत्या चार दिवसांत सरकारला पाठविला जाणार आहे. या आॅडिटशिवाय पावसाळ्यापूर्वी एप्रिल-मेमध्ये; तर पावसाळ्यानंतर नोव्हेंबर महिन्यात धरणांची तपासणी केली जाते.

ठळक मुद्देकोल्हापुरातील धरणे सुरक्षित, वर्षातून दोन वेळा आॅडिट‘पाटबंधारे’ चार दिवसांत अहवाल देणार

राजाराम लोंढे

कोल्हापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे लघुपाटबंधारे तलाव फुटल्यानंतर राज्यातील सर्व धरणांचे आॅडिट करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार कोल्हापुरातील बहुतांश धरणांचे आॅडिट पूर्ण झाले असून, सर्व धरणे सुरक्षित आहेत. याबाबतचा अहवाल येत्या चार दिवसांत सरकारला पाठविला जाणार आहे. या आॅडिटशिवाय पावसाळ्यापूर्वी एप्रिल-मेमध्ये; तर पावसाळ्यानंतर नोव्हेंबर महिन्यात धरणांची तपासणी केली जाते.तिवरे धरण फुटल्यानंतर राज्यातील पाटबंधाऱ्याची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पाटबंधारे विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकारी अभियंत्यांकडून सर्व धरणांचे आॅडिट करून तत्काळ अहवाल मागविला आहे. कोल्हापुरात ‘वारणा’, ‘राधानगरी’, ‘दूधगंगा’, ‘तुळशी’ या मोठ्या प्रकल्पांसह मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्प ४० च्या पुढे आहेत. या धरणांची देखरेख ‘उत्तर’ व ‘दक्षिण’ विभागामार्फत केली जाते. धरणांचे दरवर्षी दोन वेळा आॅडिट केले जाते.

पावसाळ्यापूर्वी एप्रिल-मे; तर पावसाळ्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आॅडिट केले जाते. यापैकी एक आॅडिट पाटबंधाऱ्यांचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता; तर दुसऱ्यांदा नाशिक येथील धरण सुरक्षितता संघटनेच्या माध्यमातून केले जाते. या वर्षीही आॅडिट झालेले आहे.

तिवरे धरणफुटीनंतर राज्य सरकारने पुन्हा आॅडिट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंत्यांनी काम सुरू केले असून सर्व धरणे, बंधारे व तलाव १०० टक्के सुरक्षित असल्याचा अहवाल तयार झाला आहे. काही किरकोळ दुरुस्त्या असतील तर त्या स्थानिक पातळीवरच करण्याच्या सूचना दिल्या जातात.‘दूधगंगा’ व ‘वारणा’ धरणांना गळती आहे. याबाबत धरण सुरक्षितता संघटनेला कळविलेले आहे. त्यांनी केंद्रीय जलविद्युत संशोधन केंद्र, दिल्ली यांच्यामार्फत उपाययोजना सुरू केल्या आहेत. या केंद्रात शास्त्रज्ञ आहेत. ते धरणाला भेट देऊन कशा प्रकारे दुरुस्तीचे काम केले पाहिजे, याविषयी मार्गदर्शन करतात.काळम्मावाडीची गळीत कमी करण्यात यश!काळम्मावाडी धरणाला फार पूर्वीपासून गळती आहे. १९९९ मध्ये प्रतिसेकंद ३८५ लिटर पाणी गळतीतून जात होते. त्यानंतर वेळोवेळी उपाय केल्याने आता केवळ प्रतिसेकंद ८० लिटर पाण्याची गळती राहिली आहे.धरणक्षेत्रांत रोज दोन-तीन भूकंप‘दूधगंगा’, ‘वारणा’, ‘कोयना’ या पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख धरण परिसरांत रोज दोन ते तीन भूकंप होतातच. ३.५ रेक्टरपेक्षा कमी असल्याने ते जाणवत नाहीत. वर्षभरात भूकंपाचे ६०० धक्के होतात. त्याची नोंद पाटबंधारे विभागाकडे होते.तलाव, बंधारे अंतर्गत सिंचनक्षेत्रधरणाचा प्रकार              बांधण्याची जबाबदारी         सिंचनक्षेत्र हेक्टरमध्ये

  1. पाझर तलाव                     जिल्हा परिषद                      ० ते १००
  2. लघू पाटबंधारा                 जलसंधारण विभाग             १०० ते २५०
  3. मध्यम प्रकल्प                 पाटबंधारे विभाग                 २५० ते १०००
  4. मोठे प्रकल्प                      पाटबंधारे विभाग               १००० च्या पुढे

 

जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित असून वर्षातून दोन वेळा त्यांचे आॅडिट होते. तिवरेच्या घटनेनंतर पुन्हा आॅडिट केले जात असून, त्याचा अहवाल लवकरच सादर केला जाईल.- एस. एम. गुरव, उपकार्यकारी अभियंता 

 

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर