शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कोल्हापूर : दिनकरला मिळाला हक्काचा निवारा, चंद्रकांतदादांच्या पुढाकाराला अनेक दातृत्वाचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 15:55 IST

जीवरक्षक म्हटले की करवीर तालुक्यातील कांडगावचा सुपुत्र दिनकर कांबळेचे नाव चटकन समोर येते. गेली अनेक वर्षे तो हक्काच्या घरापासून वंचित होता, यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला, त्यास समाजातील अनेक दातृत्वाचे हात लागले आणि दिनकरचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले.

ठळक मुद्देजीवबा नाना पार्क येथे हक्काच्या घराचे स्वप्न समाजातील अनेक दातृत्वाचे हात नवीन घरात संपर्क कार्यालयनोकरीही कायमची व्हावी

कोल्हापूर : जीवरक्षक म्हटले की करवीर तालुक्यातील कांडगावचा सुपुत्र दिनकर कांबळेचे नाव चटकन समोर येते. यामागे दिनकरचे कर्तृत्व आणि त्याग आहे. पण गेली अनेक वर्षे तो हक्काच्या घरापासून वंचित होता, यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला, त्यास समाजातील अनेक दातृत्वाचे हात लागले आणि दिनकरचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले.समाजात अनेकजण सामाजिक कामे करतात, पण त्यांच्यापेक्षा निश्चितच वेगळे असे काम दिनकर कांबळे करीत आहेत. मदत करायची राहू दे, पण त्या घटनेकडे बघायचेही धाडस होत नाही. अशी कामे करण्यासाठी पदोपदी स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्यांची संख्या फारच कमी. त्यामध्ये दिनकरचे नाव अव्वल घ्यावे लागेल.

गेली २२ वर्षे अविरतपणे हे काम सुरू आहे. त्यातून आपल्या पदरात काय पडणार, माझ्या कुटुंबाचे काय होणार, हे केल्यानंतर समाज मला काय देणार, हे विचार दिनकरच्या मनाला कधी शिवलेच नाहीत. त्यामुळेच आज एका विशिष्ट उंचीवर त्याचे नाव आहे.

सामाजिक काम करत असताना त्याचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते, कांडगावमध्ये राहते घर आहे. पण कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात एखादी दुर्घटना घडली, तर तेथून येताना वेळ जातो. यासाठी शहरात घराची गरज होती. अनेकांनी घरासह नोकरीची आश्वासने दिली, पण ती कधी हवेत विरली, हे दिनकरलाही कळले नाही.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिनकरला हक्काचा निवारा करून द्यायचा, हा निर्णय घेतला आणि जीवबा नाना पार्क परिसरात ‘वन बीएचके’ घराचे बुकिंगही केले. मंत्री पाटील यांच्या या निर्णयाला समाजातील अनेक दातृत्वाचे हात पुढे येत असल्याने लवकरच दिनकरला हक्काचा निवारा मिळणार आहे.

नोकरीही कायमची व्हावीदिनकर कांबळे सध्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहे. मंत्री पाटील यांनी त्याच्या कायमच्या निवाऱ्यांची सोय केली, त्याप्रमाणे नोकरीही कायम करावी, अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे.

नवीन घरात संपर्क कार्यालयकेवळ राहण्यासाठी नवीन घराचा वापर दिनकर करणार नाही. तिथे संपर्क कार्यालय सुरू केले जाणार असून, तिथे नागरिकांना थेट संपर्क साधता येणार आहे.

 

शहरात राहात नसल्याने दुर्घटना घडल्यानंतर तत्काळ पोहोचता येत नाही. ही गरज ओळखून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घर देऊन खूप मोठे काम केले. हे घर नसून नागरिकांसाठी संपर्क कार्यालय राहणार आहे.- दिनकर कांबळे, जीवरक्षक 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHomeघर