शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

कोल्हापूर : दिनकरला मिळाला हक्काचा निवारा, चंद्रकांतदादांच्या पुढाकाराला अनेक दातृत्वाचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 15:55 IST

जीवरक्षक म्हटले की करवीर तालुक्यातील कांडगावचा सुपुत्र दिनकर कांबळेचे नाव चटकन समोर येते. गेली अनेक वर्षे तो हक्काच्या घरापासून वंचित होता, यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला, त्यास समाजातील अनेक दातृत्वाचे हात लागले आणि दिनकरचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले.

ठळक मुद्देजीवबा नाना पार्क येथे हक्काच्या घराचे स्वप्न समाजातील अनेक दातृत्वाचे हात नवीन घरात संपर्क कार्यालयनोकरीही कायमची व्हावी

कोल्हापूर : जीवरक्षक म्हटले की करवीर तालुक्यातील कांडगावचा सुपुत्र दिनकर कांबळेचे नाव चटकन समोर येते. यामागे दिनकरचे कर्तृत्व आणि त्याग आहे. पण गेली अनेक वर्षे तो हक्काच्या घरापासून वंचित होता, यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला, त्यास समाजातील अनेक दातृत्वाचे हात लागले आणि दिनकरचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले.समाजात अनेकजण सामाजिक कामे करतात, पण त्यांच्यापेक्षा निश्चितच वेगळे असे काम दिनकर कांबळे करीत आहेत. मदत करायची राहू दे, पण त्या घटनेकडे बघायचेही धाडस होत नाही. अशी कामे करण्यासाठी पदोपदी स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्यांची संख्या फारच कमी. त्यामध्ये दिनकरचे नाव अव्वल घ्यावे लागेल.

गेली २२ वर्षे अविरतपणे हे काम सुरू आहे. त्यातून आपल्या पदरात काय पडणार, माझ्या कुटुंबाचे काय होणार, हे केल्यानंतर समाज मला काय देणार, हे विचार दिनकरच्या मनाला कधी शिवलेच नाहीत. त्यामुळेच आज एका विशिष्ट उंचीवर त्याचे नाव आहे.

सामाजिक काम करत असताना त्याचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते, कांडगावमध्ये राहते घर आहे. पण कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात एखादी दुर्घटना घडली, तर तेथून येताना वेळ जातो. यासाठी शहरात घराची गरज होती. अनेकांनी घरासह नोकरीची आश्वासने दिली, पण ती कधी हवेत विरली, हे दिनकरलाही कळले नाही.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिनकरला हक्काचा निवारा करून द्यायचा, हा निर्णय घेतला आणि जीवबा नाना पार्क परिसरात ‘वन बीएचके’ घराचे बुकिंगही केले. मंत्री पाटील यांच्या या निर्णयाला समाजातील अनेक दातृत्वाचे हात पुढे येत असल्याने लवकरच दिनकरला हक्काचा निवारा मिळणार आहे.

नोकरीही कायमची व्हावीदिनकर कांबळे सध्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहे. मंत्री पाटील यांनी त्याच्या कायमच्या निवाऱ्यांची सोय केली, त्याप्रमाणे नोकरीही कायम करावी, अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे.

नवीन घरात संपर्क कार्यालयकेवळ राहण्यासाठी नवीन घराचा वापर दिनकर करणार नाही. तिथे संपर्क कार्यालय सुरू केले जाणार असून, तिथे नागरिकांना थेट संपर्क साधता येणार आहे.

 

शहरात राहात नसल्याने दुर्घटना घडल्यानंतर तत्काळ पोहोचता येत नाही. ही गरज ओळखून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घर देऊन खूप मोठे काम केले. हे घर नसून नागरिकांसाठी संपर्क कार्यालय राहणार आहे.- दिनकर कांबळे, जीवरक्षक 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHomeघर