शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

कोल्हापूर : चांदोली प्रकल्पग्रस्तांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 18:28 IST

निवळे (ता. कागल) येथील चांदोली अभयारण्यग्रस्तांना दिलेल्या जमिनी न्यायालयीन आदेशाने काढून घेण्यात आल्या आहेत. या जमिनी पुन्हा प्रकल्पग्रस्तांना मिळाव्यात यासह विविध मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलातर्फे प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

ठळक मुद्देअप्पर जिल्हाधिकारी यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी काढून घेणाऱ्यांवर होणार फौजदारी

कोल्हापूर : निवळे (ता. कागल) येथील चांदोली अभयारण्यग्रस्तांना दिलेल्या जमिनी न्यायालयीन आदेशाने काढून घेण्यात आल्या आहेत. या जमिनी पुन्हा प्रकल्पग्रस्तांना मिळाव्यात यासह विविध मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलातर्फे प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.दुपारी एक वाजता टॉऊन हॉल उद्यान येथून ‘श्रमुद’चे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, संपत देसाई, मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. ‘आमच्या जमिनी परत द्या’ अशा घोषणा देत आंदोलकांचा मोर्चा सीपीआर चौक, खानविलकर पेट्रोल पंपमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी तीव्र निदर्शने केली.

यानंतर डॉ. पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी झालेल्या चर्चेत चांदोली अभयारण्यातील निवळे गावातील ७२ प्रकल्पग्रस्तांचे गलगले (ता. कागल) येथे २००० साली पुनर्वसन झाले. तेव्हापासून ते जमीन कसत आहेत, परंतु ४ एप्रिल २०१८ ला अचानक न्यायालयाकडून जमीन सोडण्याच्या नोटिसा संबंधितांना आल्या आहेत.

यावर हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या एका बेंचने दिला असून, दुसऱ्या बेंचचा निर्णय हा प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने आहे. त्यामुळे दोन्ही बेंच एकत्र येऊन यावर सकारात्मक निर्णय देतील, असे अप्पर जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

ज्या जमिनींचा निकाल न्यायालयाकडून झालेला नाही अशा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी मूळ मालक काढून घेत आहेत, या मागणीवर अप्पर जिल्हाधिकारी काटकर यांनी संबंधित मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे सांगितले.आंदोलनात शंकर पाटील, डी. के. बोडके, संतोष गोटल, आकाराम झोरे, वसंत पाटील, शफिक सय्यद, नजीर चौगले यांच्यासह प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर