शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

काय होणार..? कोल्हापूर हद्दवाढीचा अहवाल सोमवारी देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 12:02 IST

जिल्हा परिषदेत अभ्यास सुरू : अहवाल गोपनीय असल्याचा दावा

कोल्हापूर : शहर हद्दवाढीतील प्रस्तावित आठ गावांची प्रशासकीय आणि हद्दवाढीत येण्यासंबंधी सकारात्मक, नकारात्मकतेचा अहवाल येत्या सोमवारी महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे जिल्हा परिषद प्रशासन पाठवणार आहे. अहवाल गोपनीय आहे. त्यामुळे यासंबंधी अधिक माहिती देता येणार नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.दोन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश शासनाने महापालिकेस दिले होते. त्यानंतर १ जुलै रोजी महापालिका प्रशासकांनी जिल्हा परिषदेला पत्र पाठवले होते.महापालिकेने जिल्हा परिषदेला दिलेल्या पत्रात कोणत्या स्वरूपाची माहिती हवी आहे याचा स्पष्ट उल्लेख नाही, असे जिल्हा परिषद प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी वेळावेळी घेतलेल्या हद्दवाढीसंंबंधीच्या बैठकीत ग्रामपंचायतीचे ठराव, प्रशासकीय माहिती, लोकसंख्या, नागरीकरणाचे क्षेत्र, खुल्या जागा, ग्रामपंचायतमध्ये कार्यरत कर्मचारी यांची माहिती आठ गावांतून घेण्यासंबंधीच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनास दिल्या होत्या. प्रशासनाने अहवाल गोपनीय ठेवला आहे. यामुळे सोमवारी जिल्हा परिषदेकडून महापालिकेला अहवाल गेल्यानंतर अहवालात नेमके काय आहे, हे अधिकृतपणे उघड होणार आहे.

गावे कोणती आहेत..?उचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा तर्फ ठाणे, नवे बालिंगा, नवे पाडळी, उजळाईवाडी या गावांची माहितीचा अहवाल जिल्हा परिषदेकडून महापालिका प्रशासनाने मागितला आहे. जिल्हा परिषदेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिका शासनाला अहवाल पाठवणार आहे. त्यानंतर शासन हद्दवाढीसंंबंधीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

अहवालाचा बेसग्रामपंचायतीचे ठराव, प्रशासकीय माहिती, लोकसंख्या, नागरीकरणाचे क्षेत्र, खुल्या जागा, ग्रामपंचायतचे कर्मचारी यांची माहिती घेतली जात आहे.

ग्रामपंचायती स्वायत्त असल्याने..प्रत्येक ग्रामपंचायत स्वायत्त आहे. तेथे सरपंच, उपसरपंच, सदस्य, प्रशासकीय यंत्रणा स्वतंत्र आहे. यामुळे ग्रामपंचायतींनी हद्दवाढीसंबंधी कोणता अहवाल द्यायचा यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद यंत्रणेला हस्तक्षेप करता येणार नाही, असे जिल्हा परिषदेमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.