शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

सर्वसंमतीशिवाय कोल्हापूरची हद्दवाढ अशक्य, खासदार शाहू छत्रपतींनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:38 IST

मग कागलपर्यंतची गावे घ्याच, विरोधातील १८ गावच्या सरपंचांनी घेतली भेट

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीचा निर्णय सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि सर्वसंमतीशिवाय होणार नाही, हे स्पष्टच आहे. दोन्ही बाजूंशी समन्वय घडविण्याचे काम सध्या सुरू आहे. दोन्ही बाजूंशी चर्चा झाल्यानंतर एकमतानेच हद्दवाढीचा निर्णय होईल; अन्यथा होणार नाही, असे खासदार शाहू छत्रपती यांनी बुधवारी स्पष्ट केले. परवाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना भेटण्यावर लोकप्रतिनिधींचे एकमत झाले, हद्दवाढीवर नव्हे, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.शहराच्या हद्दवाढीला विरोध करणाऱ्या १८ गावांतील सरपंच आणि हद्दवाढविरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने खासदार शाहू छत्रपती यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. हद्दवाढीला आपला विरोध का आहे, याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. त्यावेळी शाहू छत्रपती यांनी हे स्पष्टीकरण दिले.शहरालगतच्या १८ गावांचा हद्दवाढीत समावेश केला तर बागायत शेती, पशुधन नष्ट होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होणार आहे, असे शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. शहरात नागरी सुविधा देण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. कचरा, रस्ते, गार्डन, क्रीडांगणे यांची दुरवस्था झाली आहे. महापालिकेला जर शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देता येत नसतील तर मग आम्हाला पुन्हा शहरात कशासाठी घेण्याचा आग्रह धरला जात आहे, अशी विचारणा यावेळी करण्यात आली.सहपालकमंत्री माधुरी मिसाळ कोल्हापुरात आल्या होत्या. त्यांनी पुण्याची अनेक वेळा हद्दवाढ झाली; परंतु त्या गावांना अजूनही महापालिका नागरी सुविधा देऊ शकलेली नाही, अशी कबुली दिली आहे. त्यामुळे आम्ही शहरात आलो तर आम्हाला सुविधा मिळतील का, याबाबत आम्ही साशंक आहोत. जर महापालिकेने काही आराखडा तयार केला असेल तर तो दाखवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.अनेक वर्षे शहराची हद्दवाढ झाली नाही, असे वारंवार सांगितले जात आहे. त्यात ग्रामीण भागातील नागरिकांचा काय दोष? हद्दवाढ करता आली नाही, हा राज्यकर्त्यांचा दाेष आहे, याकडेही शिष्टमंडळाने लक्ष वेधले.शिष्टमंडळात उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उजळाईवाडीचे उत्तम आंबवडेकर, सरनोबतवाडीच्या शुभांगी आडसूळ, वडणगेच्या सरपंच संगीता पाटील, वळीवडेच्या रूपाली कुसाळे, गांधीनगरचे संदीप पाटोळे, मोरेवाडीचे ए. व्ही. कांबळे, माजी सरपंच अमर मोरे, कळंब्याच्या सुमन गुरव, मुडशिंगीचे अश्विनी शिरगावे, पाचगावच्या प्रियंका पाटील, गोकुळ शिरगावचे चंद्रकांत डावरे, कंदलगावचे राहुल पाटील, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले, नायकू बागणे, किरण आडसूळ, भाग्यश्री पारखे यांचा समावेश होता.

मग कागलपर्यंतची गावे घ्याचशाहू छत्रपती म्हणाले की, हद्दवाढ केल्याशिवाय कोल्हापूरची लोकसंख्या वाढत नाही आणि त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेत त्याचा समावेश होत नाही. त्यावर वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगले म्हणाले, आमची २० गावे घेऊनही लोकसंख्या १० लाखांपर्यंत जात नाही. तेव्हा मग पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसह कागलमधील गावेही घ्या.

जागा हडप करण्यासाठी का?हद्दवाढ करा म्हणून आग्रह धरणाऱ्या एका लोकप्रतिनिधीने जयप्रभा, शासकीय विश्रामगृहाचीही जागा सोडलेली नाही; त्यामुळे आमची गावेही अशा जागा हडप करण्यासाठीच तुम्हांला हवी आहेत का, अशी विचारणा गोकुळ शिरगावचे माजी उपसरपंच साताप्पा कांबळे यांनी बैठकीत केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर