शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सर्वसंमतीशिवाय कोल्हापूरची हद्दवाढ अशक्य, खासदार शाहू छत्रपतींनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:38 IST

मग कागलपर्यंतची गावे घ्याच, विरोधातील १८ गावच्या सरपंचांनी घेतली भेट

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीचा निर्णय सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि सर्वसंमतीशिवाय होणार नाही, हे स्पष्टच आहे. दोन्ही बाजूंशी समन्वय घडविण्याचे काम सध्या सुरू आहे. दोन्ही बाजूंशी चर्चा झाल्यानंतर एकमतानेच हद्दवाढीचा निर्णय होईल; अन्यथा होणार नाही, असे खासदार शाहू छत्रपती यांनी बुधवारी स्पष्ट केले. परवाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना भेटण्यावर लोकप्रतिनिधींचे एकमत झाले, हद्दवाढीवर नव्हे, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.शहराच्या हद्दवाढीला विरोध करणाऱ्या १८ गावांतील सरपंच आणि हद्दवाढविरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने खासदार शाहू छत्रपती यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. हद्दवाढीला आपला विरोध का आहे, याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. त्यावेळी शाहू छत्रपती यांनी हे स्पष्टीकरण दिले.शहरालगतच्या १८ गावांचा हद्दवाढीत समावेश केला तर बागायत शेती, पशुधन नष्ट होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होणार आहे, असे शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. शहरात नागरी सुविधा देण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. कचरा, रस्ते, गार्डन, क्रीडांगणे यांची दुरवस्था झाली आहे. महापालिकेला जर शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देता येत नसतील तर मग आम्हाला पुन्हा शहरात कशासाठी घेण्याचा आग्रह धरला जात आहे, अशी विचारणा यावेळी करण्यात आली.सहपालकमंत्री माधुरी मिसाळ कोल्हापुरात आल्या होत्या. त्यांनी पुण्याची अनेक वेळा हद्दवाढ झाली; परंतु त्या गावांना अजूनही महापालिका नागरी सुविधा देऊ शकलेली नाही, अशी कबुली दिली आहे. त्यामुळे आम्ही शहरात आलो तर आम्हाला सुविधा मिळतील का, याबाबत आम्ही साशंक आहोत. जर महापालिकेने काही आराखडा तयार केला असेल तर तो दाखवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.अनेक वर्षे शहराची हद्दवाढ झाली नाही, असे वारंवार सांगितले जात आहे. त्यात ग्रामीण भागातील नागरिकांचा काय दोष? हद्दवाढ करता आली नाही, हा राज्यकर्त्यांचा दाेष आहे, याकडेही शिष्टमंडळाने लक्ष वेधले.शिष्टमंडळात उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उजळाईवाडीचे उत्तम आंबवडेकर, सरनोबतवाडीच्या शुभांगी आडसूळ, वडणगेच्या सरपंच संगीता पाटील, वळीवडेच्या रूपाली कुसाळे, गांधीनगरचे संदीप पाटोळे, मोरेवाडीचे ए. व्ही. कांबळे, माजी सरपंच अमर मोरे, कळंब्याच्या सुमन गुरव, मुडशिंगीचे अश्विनी शिरगावे, पाचगावच्या प्रियंका पाटील, गोकुळ शिरगावचे चंद्रकांत डावरे, कंदलगावचे राहुल पाटील, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले, नायकू बागणे, किरण आडसूळ, भाग्यश्री पारखे यांचा समावेश होता.

मग कागलपर्यंतची गावे घ्याचशाहू छत्रपती म्हणाले की, हद्दवाढ केल्याशिवाय कोल्हापूरची लोकसंख्या वाढत नाही आणि त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेत त्याचा समावेश होत नाही. त्यावर वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगले म्हणाले, आमची २० गावे घेऊनही लोकसंख्या १० लाखांपर्यंत जात नाही. तेव्हा मग पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसह कागलमधील गावेही घ्या.

जागा हडप करण्यासाठी का?हद्दवाढ करा म्हणून आग्रह धरणाऱ्या एका लोकप्रतिनिधीने जयप्रभा, शासकीय विश्रामगृहाचीही जागा सोडलेली नाही; त्यामुळे आमची गावेही अशा जागा हडप करण्यासाठीच तुम्हांला हवी आहेत का, अशी विचारणा गोकुळ शिरगावचे माजी उपसरपंच साताप्पा कांबळे यांनी बैठकीत केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर