शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

चर्चा करुन कोल्हापूरची हद्दवाढ अशक्यच, राजकीय इच्छाशक्ती हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:03 IST

राजेश क्षीरसागर आग्रही : अमल महाडिक, चंद्रदीप नरके यांचा अपेक्षेनुसारच विरोध कायम

कोल्हापूर : गेली पाच दशके या ना त्या कारणाने रखडलेली कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी यासाठी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीने नव्याने रेटा लावला आहे. या समितीच्या बुधवारी शिवाजी पेठेत झालेल्या बैठकीत कोल्हापूर दक्षिण व करवीरच्या आमदारांनी हद्दवाढीसंबंधी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी झाली. म्हणून ‘लोकमत’ने गुरुवारी हद्दवाढीशी संबंधित तिन्ही आमदारांकडे हद्दवाढीसंबंधी त्यांची भूमिका जाणून घेतली. कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर हे अपेक्षेप्रमाणे हद्दवाढीसाठी आग्रही असल्याचे, तर कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक व करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांचा मात्र विरोध असल्याचे स्पष्ट झाले. मूळ शहराचा विकास करा मगच हद्दवाढ करा, अशी त्यांची भूमिका आहे. पक्ष कोणताही असला तरी दक्षिण व करवीरच्या आमदारांची भूमिका कायम अशीच राहिली आहे. हद्दवाढीचे समर्थन करणे त्यांना राजकीयदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे त्यांची हीच भूमिका कायम असेल. ती गृहीत धरूनच राजकीय इच्छाशक्ती वापरली तरच हद्दवाढ होऊ शकते, अन्यथा ये रे माझ्या मागल्याप्रमाणे प्रश्नाचे गुऱ्हाळ कायमच सुरू राहील.विरोधासाठी विरोध नकोहद्दवाढीला याचा विरोध आणि त्याचा विरोध, असे होता कामा नये. पुण्यासारख्या शहरांनी सातत्याने हद्दवाढ केल्यामुळे आज या शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. कोल्हापूर शहरावर मर्यादा आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. म्हणूनच ग्रामीण भागाला उत्तम सुविधा देऊन त्यांना शहरात सामावून घेण्याची गरज आहे, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.फडणवीस, शिंदे यांच्याकडे निधीची मागणीएकीकडे शहरातील प्रश्न संपवत असताना दुसरीकडे प्राधिकरणाला मोठा निधी देऊन त्या माध्यमातून गावातील सोयीसुविधा उत्तम करणे आणि त्यांना शहरातील सुविधांच्या बरोबरीने आणणे महत्त्वाचे आहे. प्राधिकरणाला निधी देऊन त्या माध्यमातून गावागावांत विकासकामे झाली पाहिजेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. - आमदार अमल महाडिकलोकसंख्येची अट रद्द, मग अट्टाहास का?काही मंडळी शहराची लोकसंख्या कमी असल्याने विकासनिधी मिळत नसल्याचे सांगत आहेत. पण, केंद्र सरकारने ही अट यापूर्वीच रद्द केली आहे, मग हद्दवाढीसाठी अट्टाहास का? अशी विचारणा आमदार नरके यांनी केली. करवीरमधील ४२ गावांसाठी प्राधिकरण तयार केले, त्या माध्यमातून शहराशेजारील गावांचा विकास करण्याचे नियोजन आहे. पण, त्यातून किती विकास झाला? अशी विचारणाही आमदार चंद्रदीप नरके यांनी केली.

हद्दवाढीला २० गावांचा विरोधच !उचगाव : वीस गावांना विश्वासात न घेता हद्दवाढीचा निर्णय घेतल्यास या गावांतील ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. यापुढेही हद्दवाढीला तीव्र विरोधच राहील, असे उजळाईवाडी ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत हद्दवाढ विरोधी कृती समितीचे कार्याध्यक्ष सरपंच उत्तम आंबवडे व समितीचे अध्यक्ष उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांनी स्पष्ट केले.यावेळी उत्तम आंबवडे म्हणाले की, पालकमंत्री यांना भेटून हद्दवाढ का नको, तसेच शहराचे मूलभूत प्रश्न सोडविण्यास महानगरपालिकेला येत असलेले अपयश, हद्दवाढीचा घाट घालून ग्रामस्थांचे हाेणारे नुकसान हे निर्दशनास आणून देऊ. याबरोबर कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक आणि करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनाही भेटून हद्दवाढ कृती समिती आपली भूमिका मांडणार आहे.बैठकीसाठी सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी अडसूळ, पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील, सुमन गुरव, गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील, रूपाली पाटील, उपाध्यक्ष नारायण गाडगीळ, तंटामुक्ती अध्यक्ष नायकू बागणे, किरण अडसूळ, राहुल पाटील, चंद्रकांत डावरे, ए. व्ही. कांबळे, संदीप पाटोळे, रूपाली कुसळे, अमर मोरे, रसिका पाटील यांसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामविकासात ग्रामपंचायतीला १५ वित्त आयोगातून निधी उपलब्ध होत आहे. अन्य निधीतून गावचे मूलभूत प्रश्न सोडविले जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत उचगाव हद्दवाढीत जाणार नाही, कायम विरोधच राहील.- मधुकर चव्हाण, सरपंच, उचगाव

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरAmal Mahadikअमल महाडिक