शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य न्यायमूर्तींच्या भेटीत अडकले खंडपीठ; दोन मुख्यमंत्री, अनेक मुख्य न्यायमूर्ती बदलून गेले तरी निर्णयाला मुहूर्त नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 12:55 IST

चालढकल करण्याचा प्रयत्न, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

उद्धव गोडसेकोल्हापूर : सहा वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील खंडपीठासाठी निधीची घोषणा केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची भेट घेऊन चर्चा करताच हा प्रश्न निकाली निघून कोल्हापुरात खंडपीठाचे कामकाज सुरू होईल, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर दोन मुख्यमंत्री आणि अनेक मुख्य न्यायमूर्ती बदलून गेले तरी खंडपीठाच्या निर्णयाला अजून मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे आता तरी मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्तींच्या भेटीचा योग येणार का, असा सवाल कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील नागरिक विचारत आहेत. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा तेच आश्वासन दिल्याने आश्वासनांचे गाजर पुन्हा चर्चेत आले.सहा वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील जाहीर कार्यक्रमात खंडपीठासाठी निधीची घोषणा केली होती. मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांची भेट होताच हा प्रश्न निकाली निघेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर सरकार बदलले. कोरोना काळात आंदोलन थंडावले. त्यानंतर वकिलांनी पुन्हा आंदोलनाची तीव्रता वाढवत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काही झाले नाही. सरकार बदलल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्य न्यायमूर्तींशी पत्रव्यवहार केला. मात्र, प्रत्येक वेळी मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्तींच्या भेटीचे कारण पुढे करून या विषयात चालढकल झाली.भेटीसाठी पत्रव्यवहार नाहीचमुख्य न्यायमूर्तींची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने पत्रव्यवहार करावा, अशी मागणी बार असोसिएशनने केली होती. यासाठी वारंवार स्मरणपत्र पाठवली. मात्र, खंडपीठाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्य न्यायमूर्तींच्या कार्यालयात एकदाही पत्रव्यवहार झाला नसल्याची माहिती वकिलांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सहा जिल्ह्यातील मंत्री, आमदार आणि खासदारांनी दबाव वाढवणे गरजेचे आहे.भेटी होतात; चर्चा नाहीमुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्ती वर्षातील चार वेळा आढावा बैठकीसाठी भेटतात. याशिवाय स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताकदिनी भेटी होतात. गेल्या सहा वर्षांत अशा भेटी वेळोवेळी झाल्या. मात्र, कोल्हापुरातील खंडपीठाचा विषय त्यांच्या अजेंड्यावर आलाच नाही. याचे कारण काय असावे, असा प्रश्न वकिलांकडून उपस्थित केला जात आहे.

पुन्हा पुण्याची टूम..उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चार दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात बोलताना कोल्हापूरसह पुण्यातही खंडपीठ स्थापनेसाठी प्रयत्नशील असल्याचा उल्लेख केला. कोल्हापूरची मागणी आग्रही असताना पुण्याचा उल्लेख कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  • माजी न्यायमूर्ती मोहित शहा यांचा अहवाल महत्त्वाचा.
  • माजी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांचेही बार असोसिएशनला पत्र.
  • भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवणे आवश्यक.
  • पालकमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची गरज.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालयChief Ministerमुख्यमंत्री