शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

कोल्हापूरच्या खंडपीठाबाबत अनुकूल पुनर्विचार व्हावा : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 11:14 IST

गेल्या ३८ वर्षांपासून कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकार, सामाजिक संघटनांच्या खंडपीठाच्या मागणीच्या लढ्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी बळ देण्याच्या उद्देशाने उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दत्ता यांनी भेट घेतली.

कोल्हापूर : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीची पुनर्तपासणी व सर्वसमावेशक जनतेच्या हितासाठी अनुकूलपणे पुनर्विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे नियमित खंडपीठाची स्थापना होईपर्यंत, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरात स्थापन करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्त यांच्याकडे केली.

गेल्या ३८ वर्षांपासून कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकार, सामाजिक संघटनांच्या खंडपीठाच्या मागणीच्या लढ्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी बळ देण्याच्या उद्देशाने उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दत्ता यांनी भेट घेतली. तत्पूर्वी यासंबधी ८ मार्च, २०२२ रोजी मागणी व भेटीसंदर्भात पत्र पाठविले होते. या पत्राचा आशय धरून मुख्यमंत्री ठाकरे यांनी या खंडपीठाची आवश्यकता समजावून सांगितली. औरंगाबाद येथे १९८४ साली मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन झाल्यानंतर, राज्यातील दक्षिणेकडील प्रदेशात समाविष्ट असणाऱ्या या सहा जिल्ह्यांतून कोल्हापुरात खंडपीठ व्हावे, अशी सातत्याने मागणी करण्यात येत आहे.

याच आधारावर महाविकास आघाडीनेही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या मागणीसाठी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी खंडपीठासाठी लोकप्रतिनिधी आणि खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळासमावेत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. यापूर्वीच्या मुख्यमंंत्र्यांनी १२ नोव्हेंबर, २०१२ आणि १९ जून, २०१९ रोजी पत्रांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन मुख्य न्यायाधीशांकडे सहा जिल्ह्यांतील अधिकार क्षेत्राचा वापर करण्याकरिता खंडपीठ-सर्किट बेंच स्थापन करण्याबाबतचा पत्रव्यवहार केला आहे.

राज्यातील याचिकाकर्तांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, उच्च न्यायालयाची खंडपीठे स्थापन करण्याबाबत भारतीय कायदा आयोगाने अध्याय २३० मधील अहवालात (परिच्छेद क्रमांक १.८, १.९ आणि १.१० नुसार) शिफारस केली आहे. राज्यातील लोकप्रतिनिधींकडून हा मुद्दा सातत्याने विधिमंडळात मांडला जात आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करावे, अशी या चर्चेदरम्यान मागणी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरे