शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

कोल्हापूर :भाजप सरकारविरोधात रस्त्यावरील संघर्षासाठी तयार रहा : मेघा पानसरे यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 17:02 IST

एकीकाळे कामगार संघटना देशाचे राजकारण ठरवत होती, पण जागतिकीकरणामुळे कामगार चळवळीला धक्का बसला आहे. कोणतेही सरकार आले तरी आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर यावेच लागते, भाजप सरकारच्या कालावधीत कामगार वर्गासह सर्वच क्षेत्रात अस्वस्थता पसरली असून याविरोधात रस्त्यावर उतरून संघर्षासाठी तयार रहा. असे आवाहन ‘आयटक’च्या नेत्या डॉ. मेघा पानसरे यांनी केले.

ठळक मुद्देभाजप सरकारविरोधात रस्त्यावरील संघर्षासाठी तयार रहा : मेघा पानसरे यांचे आवाहन ‘आयटक’चे त्रैवार्षिक अधिवेशन : पानसरे हत्यारे न सापडण्यामागील गौडबंगाल काय?

कोल्हापूर : एकीकाळे कामगार संघटना देशाचे राजकारण ठरवत होती, पण जागतिकीकरणामुळे कामगार चळवळीला धक्का बसला आहे. कोणतेही सरकार आले तरी आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर यावेच लागते, भाजप सरकारच्या कालावधीत कामगार वर्गासह सर्वच क्षेत्रात अस्वस्थता पसरली असून याविरोधात रस्त्यावर उतरून संघर्षासाठी तयार रहा. असे आवाहन ‘आयटक’च्या नेत्या डॉ. मेघा पानसरे यांनी केले.आॅल इंडिया ट्रेड युनियन कॉँग्रेस (आयटक)शी संलग्न जिल्ह्यातील कामगारांचा मेळावा बुधवारी शाहू स्मारक भवनात झाला. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. डॉ. पानसरे म्हणाल्या, स्वर्गीय गोविंद पानसरे यांनी उभी हयात कामगार चळवळीत घालविली. त्यांनी दिलेल्या स्वाभिमानी शिकवणीच्या बळावर चळवळ पुढे चालू आहे. कोणतेही सरकार कष्टकऱ्यांना स्वइच्छेने देत नाही, त्यासाठी संघर्ष अटळ असतो. ‘आयटक’ ही जागतिक पातळीवरील मोठी संघटना असून त्यामाध्यमातून लाखो कष्टकऱ्यांना न्याय देता आला.

कष्ट, प्रामाणिकपणा व नैतिकता ही चळवळीची ताकद असून त्या भांडवलावरच सरकारला जाब विचारू शकतो. पण चळवळीचे विचार मान्य नसणाऱ्यांनी गोविंद पानसरे, दाभोलकर आदींची हत्या केली. साडे तीन वर्षे झाले तरी त्यांचा मास्टरमार्इंड सापडत नाही, हे दुर्देवी असून कर्नाटक पोलीसांनी गौरी लंकेश व कलबुर्गी यांच्या हत्येचा छडा लागला पण महाराष्ट्र पोलीस अजूनही चाचपडतच तपास करत आहे, यामागील गौडबंगाल काय? असा सवालही डॉ. पानसरे यांनी केला.‘आयटक’चे जनरल सेक्रेटरी दिलीप पवार म्हणाले, चळवळीच्या ताकदीवर असंघटीत कामगारांची महामंडळे झाली पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अनेकांच्या बलिदानातून कायदे निर्माण झाले, ते बदलण्याचे षडयंत्र सरकारचे सुरू असल्याने संघर्षासाठी तयार रहावे. एस. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. बळवंत पोवार, उमेश पानसरे यांनी मनोगत व्यक्त केले. जमीर शेख यांनी आभार मानले. विक्रम कदम, सशिला यादव, सदाशिव निकम आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूर