शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

कोल्हापूर :भाजप सरकारविरोधात रस्त्यावरील संघर्षासाठी तयार रहा : मेघा पानसरे यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 17:02 IST

एकीकाळे कामगार संघटना देशाचे राजकारण ठरवत होती, पण जागतिकीकरणामुळे कामगार चळवळीला धक्का बसला आहे. कोणतेही सरकार आले तरी आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर यावेच लागते, भाजप सरकारच्या कालावधीत कामगार वर्गासह सर्वच क्षेत्रात अस्वस्थता पसरली असून याविरोधात रस्त्यावर उतरून संघर्षासाठी तयार रहा. असे आवाहन ‘आयटक’च्या नेत्या डॉ. मेघा पानसरे यांनी केले.

ठळक मुद्देभाजप सरकारविरोधात रस्त्यावरील संघर्षासाठी तयार रहा : मेघा पानसरे यांचे आवाहन ‘आयटक’चे त्रैवार्षिक अधिवेशन : पानसरे हत्यारे न सापडण्यामागील गौडबंगाल काय?

कोल्हापूर : एकीकाळे कामगार संघटना देशाचे राजकारण ठरवत होती, पण जागतिकीकरणामुळे कामगार चळवळीला धक्का बसला आहे. कोणतेही सरकार आले तरी आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर यावेच लागते, भाजप सरकारच्या कालावधीत कामगार वर्गासह सर्वच क्षेत्रात अस्वस्थता पसरली असून याविरोधात रस्त्यावर उतरून संघर्षासाठी तयार रहा. असे आवाहन ‘आयटक’च्या नेत्या डॉ. मेघा पानसरे यांनी केले.आॅल इंडिया ट्रेड युनियन कॉँग्रेस (आयटक)शी संलग्न जिल्ह्यातील कामगारांचा मेळावा बुधवारी शाहू स्मारक भवनात झाला. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. डॉ. पानसरे म्हणाल्या, स्वर्गीय गोविंद पानसरे यांनी उभी हयात कामगार चळवळीत घालविली. त्यांनी दिलेल्या स्वाभिमानी शिकवणीच्या बळावर चळवळ पुढे चालू आहे. कोणतेही सरकार कष्टकऱ्यांना स्वइच्छेने देत नाही, त्यासाठी संघर्ष अटळ असतो. ‘आयटक’ ही जागतिक पातळीवरील मोठी संघटना असून त्यामाध्यमातून लाखो कष्टकऱ्यांना न्याय देता आला.

कष्ट, प्रामाणिकपणा व नैतिकता ही चळवळीची ताकद असून त्या भांडवलावरच सरकारला जाब विचारू शकतो. पण चळवळीचे विचार मान्य नसणाऱ्यांनी गोविंद पानसरे, दाभोलकर आदींची हत्या केली. साडे तीन वर्षे झाले तरी त्यांचा मास्टरमार्इंड सापडत नाही, हे दुर्देवी असून कर्नाटक पोलीसांनी गौरी लंकेश व कलबुर्गी यांच्या हत्येचा छडा लागला पण महाराष्ट्र पोलीस अजूनही चाचपडतच तपास करत आहे, यामागील गौडबंगाल काय? असा सवालही डॉ. पानसरे यांनी केला.‘आयटक’चे जनरल सेक्रेटरी दिलीप पवार म्हणाले, चळवळीच्या ताकदीवर असंघटीत कामगारांची महामंडळे झाली पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अनेकांच्या बलिदानातून कायदे निर्माण झाले, ते बदलण्याचे षडयंत्र सरकारचे सुरू असल्याने संघर्षासाठी तयार रहावे. एस. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. बळवंत पोवार, उमेश पानसरे यांनी मनोगत व्यक्त केले. जमीर शेख यांनी आभार मानले. विक्रम कदम, सशिला यादव, सदाशिव निकम आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूर