शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न राज्यभर राबवा : भारत पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 14:22 IST

शेतकरी आत्महत्या रोखणाऱ्या, रोजगार हमी योजना व चारा छावण्यांची गरज कमी करणाऱ्या समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न राज्यभर राबवा, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देसमन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न राज्यभर राबवा : भारत पाटणकर अंबाबाई मंदिरात पुजारी हटावचा लढा तीव्र होणार

कोल्हापूर : शेतकरी आत्महत्या रोखणाऱ्या, रोजगार हमी योजना व चारा छावण्यांची गरज कमी करणाऱ्या समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न राज्यभर राबवा, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केली आहे.

येत्या शनिवारपासून (२९ ते ३0 डिसेंबर) कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील लाटवडे येथील आंबोळी वसाहती मुक्ती दलाचे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. ११ जिल्ह्यांतील प्रतिनिधी येथे सहभागी होणार असून, येथे आटपाडी पॅटर्नसह लोकसभा निवडणुकांमध्ये चळवळी पुढे नेणाऱ्या पक्षाच्यामागे ताकद उभी करण्याचे ठराव केले जाणार आहेत.या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. पाटणकर यांनी कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये पत्रकार बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केली. यावेळी १९८६ पासून चळवळीत सक्रीय असलेल्या नंदुरबारच्या ठगीबाई वसावी, गेल आॅम्वेट, संपत देसाई, मारुती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. पाटणकर म्हणाले, श्रमिक मुक्ती दल राज्यात ३९ वर्षांपासून कार्यरत असून, यंदाचे हे २२ वे अधिवेशन आहे. मागील अधिवेशन साताऱ्यात झाले होते. या वेळच्या अधिवेशनाला आगामी लोकसभा निवडणुकीचा संदर्भ असल्याने या संदर्भातील भूमिका स्पष्ट केली जाणार आहे, स्वतंत्र उमेदवार उभे केले जाणार नसले, तरी समग्र पर्यायी विकासाचा आराखडा मान्य असणाऱ्यांच्याच मागे चळवळीची ताकद उभी केली जाणार आहे.

याशिवाय नैसर्गिक संसाधनावरील मालकी, ही त्या भागातील जनतेची राहायला हवी असतानाही बड्या भांडवलदारांना देण्याचे धोरण मुक्ती दलाने मोडीस काढले आहे; त्यामुळे रायगड येथील अंबानी व टाटांना प्रकल्प गुंडाळावे लागले. येथून पुढे पुन्हा असे प्रकल्प हातपाय पसरू नयेत, यासाठी अधिवेशनात लढ्याची दिशा ठरवली जाणार आहे.

काय आहे आटपाडी पॅटर्नसांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी तालुक्यात स्थानिक पाणलोट आणि बाहेरील मोठ्या धरणातील पाणी यांचे एकत्रिकरण करून, बंद पाईपलाईनद्वारे सव्वालाख हेक्टर क्षेत्राला पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प राबविण्यात आला आहे.

२00५ मध्ये श्रमिक मुक्ती दलाच्या समन्यायी पाणी वाटप धोरणातून सातत्याने पाठपुरावा होत, २0१६ मध्ये तो पूर्णत्वास गेला आहे. अशा प्रकारे दुष्काळी पट्ट्यातील लोकांना हक्काचे पाणी उपलब्ध करून देणारा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. त्याचा विस्तार सर्वत्र केल्यास दुष्काळाची दाहकता कमी होणार आहे.

अंबाबाई मंदिरात पुजारी हटावचा लढा तीव्र होणारश्रमिक मुक्ती दलाने पंढरपूर देवालय बडवेमुक्त केले. त्यासाठी कायदा करण्यास शासनास भाग पाडले. कोल्हापुरात अंबाबाई मंदिरातही त्याच धर्तीवर कायदा करून पुजारी हटविण्याचा निर्णय झाला. तथापि, आजतागायत कायद्याची अंमलबजावणीच झाली नसल्यामुळे मंदिरात पारंपरिक पुजारी कायम आहेत. या अधिवेशनात हे पुजारी हटविण्यासंबंधी लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती डॉ. पाटणकर यांनी दिली. 

 

टॅग्स :Waterपाणीkolhapurकोल्हापूर