शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कोल्हापूर : समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न राज्यभर राबवा : भारत पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 14:22 IST

शेतकरी आत्महत्या रोखणाऱ्या, रोजगार हमी योजना व चारा छावण्यांची गरज कमी करणाऱ्या समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न राज्यभर राबवा, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देसमन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न राज्यभर राबवा : भारत पाटणकर अंबाबाई मंदिरात पुजारी हटावचा लढा तीव्र होणार

कोल्हापूर : शेतकरी आत्महत्या रोखणाऱ्या, रोजगार हमी योजना व चारा छावण्यांची गरज कमी करणाऱ्या समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न राज्यभर राबवा, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केली आहे.

येत्या शनिवारपासून (२९ ते ३0 डिसेंबर) कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील लाटवडे येथील आंबोळी वसाहती मुक्ती दलाचे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. ११ जिल्ह्यांतील प्रतिनिधी येथे सहभागी होणार असून, येथे आटपाडी पॅटर्नसह लोकसभा निवडणुकांमध्ये चळवळी पुढे नेणाऱ्या पक्षाच्यामागे ताकद उभी करण्याचे ठराव केले जाणार आहेत.या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. पाटणकर यांनी कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये पत्रकार बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केली. यावेळी १९८६ पासून चळवळीत सक्रीय असलेल्या नंदुरबारच्या ठगीबाई वसावी, गेल आॅम्वेट, संपत देसाई, मारुती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. पाटणकर म्हणाले, श्रमिक मुक्ती दल राज्यात ३९ वर्षांपासून कार्यरत असून, यंदाचे हे २२ वे अधिवेशन आहे. मागील अधिवेशन साताऱ्यात झाले होते. या वेळच्या अधिवेशनाला आगामी लोकसभा निवडणुकीचा संदर्भ असल्याने या संदर्भातील भूमिका स्पष्ट केली जाणार आहे, स्वतंत्र उमेदवार उभे केले जाणार नसले, तरी समग्र पर्यायी विकासाचा आराखडा मान्य असणाऱ्यांच्याच मागे चळवळीची ताकद उभी केली जाणार आहे.

याशिवाय नैसर्गिक संसाधनावरील मालकी, ही त्या भागातील जनतेची राहायला हवी असतानाही बड्या भांडवलदारांना देण्याचे धोरण मुक्ती दलाने मोडीस काढले आहे; त्यामुळे रायगड येथील अंबानी व टाटांना प्रकल्प गुंडाळावे लागले. येथून पुढे पुन्हा असे प्रकल्प हातपाय पसरू नयेत, यासाठी अधिवेशनात लढ्याची दिशा ठरवली जाणार आहे.

काय आहे आटपाडी पॅटर्नसांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी तालुक्यात स्थानिक पाणलोट आणि बाहेरील मोठ्या धरणातील पाणी यांचे एकत्रिकरण करून, बंद पाईपलाईनद्वारे सव्वालाख हेक्टर क्षेत्राला पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प राबविण्यात आला आहे.

२00५ मध्ये श्रमिक मुक्ती दलाच्या समन्यायी पाणी वाटप धोरणातून सातत्याने पाठपुरावा होत, २0१६ मध्ये तो पूर्णत्वास गेला आहे. अशा प्रकारे दुष्काळी पट्ट्यातील लोकांना हक्काचे पाणी उपलब्ध करून देणारा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. त्याचा विस्तार सर्वत्र केल्यास दुष्काळाची दाहकता कमी होणार आहे.

अंबाबाई मंदिरात पुजारी हटावचा लढा तीव्र होणारश्रमिक मुक्ती दलाने पंढरपूर देवालय बडवेमुक्त केले. त्यासाठी कायदा करण्यास शासनास भाग पाडले. कोल्हापुरात अंबाबाई मंदिरातही त्याच धर्तीवर कायदा करून पुजारी हटविण्याचा निर्णय झाला. तथापि, आजतागायत कायद्याची अंमलबजावणीच झाली नसल्यामुळे मंदिरात पारंपरिक पुजारी कायम आहेत. या अधिवेशनात हे पुजारी हटविण्यासंबंधी लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती डॉ. पाटणकर यांनी दिली. 

 

टॅग्स :Waterपाणीkolhapurकोल्हापूर