शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
3
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
4
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
5
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
6
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
7
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
8
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
9
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

सातारा हिल मॅरेथॉनमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी मारली बाजी; ऋतुजा पाटील, सोनाली देसाई विजेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:07 IST

देशभरातून आलेल्या तब्बल ८ हजार २०० धावपटूंनी निसर्गाचे आव्हान स्वीकारत २१ किलो मीटरची ही खडतर शर्यत पूर्ण केली

कोल्हापूर : साताऱ्याच्या डोंगर-दऱ्यांत रविवारी रंगलेल्या १४ व्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्येकोल्हापूरच्या खेळाडूंनी बाजी मारली. महिला गटात कोल्हापूरच्या ऋतुजा पाटील, सोनाली देसाई यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.या स्पर्धेत देशभरातून आलेल्या तब्बल ८ हजार २०० धावपटूंनी निसर्गाचे आव्हान स्वीकारत २१ किलो मीटरची ही खडतर शर्यत पूर्ण केली. सातारा रनर्स फाउंडेशनने स्पर्धा आयोजिली होती. स्पर्धेला सकाळी ६:३० वाजता पोलिस परेड मैदानावरून सुरुवात झाली.ऋतुजा ही मूळच्या गडहिंग्लज येथील आहे. कुटुंबात क्रीडा क्षेत्रातील कोणतीही पार्श्वभूमीवर नाही. तिच्या वडिलांचे किराणा माल विक्रीचे दुकान आहे. ती स्थानिक शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर सराव करते. सन २०१६ पासून तिचा सातत्याने सराव सुरु आहे. खडतर प्रवास करत तिने मुंबई येथे झालेल्या दहा किलोमीटर चँलेज स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला. त्यानंतर पारगड (ता. चंदगड) येथे झालेल्या हाफ मॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक पटकावून विजयी घाेडदौड सुरू ठेवली. ती डॉ. घाळी महाविद्यालयात बीएसस्सीच्या तिसऱ्या वर्षात शिकते. स्कूल गेम क्रॉसकंट्रीमध्ये तिने राष्ट्रीय पदक पटकाविले. विद्यापीठ इंटरझोन आणि एनसीसीत राष्ट्रीय सुवर्णपदक पदाची मानकरी असल्याची माहिती प्रशिक्षक हरिदास शिंदे यांनी सांगितले.सोनाली या पोलिस दलात कॉन्स्टेबल आहेत. शहापूर (इचलकरंजी) पोलिस ठाण्यामध्ये त्या कार्यरत आहेत. गेल्या सहा वर्षांपासून त्या सराव करतात. घाटकोपर (मुंबई) येथील ऑल इंडिया पोलिस गेम्सही सराव करतात. पोलिस दलात रुजू होण्यापूर्वी त्यांनी क्रीडाक्षेत्रात चमक दाखविली आहे. हायस्कूल स्तरावर झालेल्या स्पर्धेतून राष्ट्रीय पदके पटकाविली आहे. गेल्या सहा वर्षापासून त्यांचा सराव सुरू आहे. त्यांची मोठी बहीण पोलिस दलात मुख्यालयात सेवेत आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचे सोनाली देसाई यांनी सांगितले.

कोल्हापूरच्या पल्लवी मूग यांची बाजीया स्पर्धेत अठरा वर्षांच्या तरुणांपासून ते वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांनी देखील सहभाग घेतला. कोल्हापूरच्या पल्लवी मूग यांनी महिलांच्या ४५ ते ४९ वयोगटात प्रथम येणाऱ्या बहुमान पटकवला. त्यांनी २१ किलोमीटर अंतर १ तास ५९ मिनिटे आणि २८ सेकंदात पूर्ण केले.

स्पर्धेतील विजेते व त्यांनी नोंदविलेली वेळ !महिला गटात ऋतुजा विजय पाटील यांनी २१ किलोमीटरचे अंतर १ तास, ३० मिनिटे ५२ सेंकदात पूर्ण केले. तृतीय क्रमांक पटकाविलेल्या सोनाली धोंडिराम देसाई यांनी हे अंतर १ तास, ३३ मिनिटे ४२ सेंकदात पूर्ण केले.