शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोल्हापूर : चंदगडसाठी भाजपकडून अशोक चराटींचे नाव पुढे, उद्या पालकमंत्र्यांचा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 11:40 IST

चंदगड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेद्वार म्हणून आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांचे नाव पुढे आले आहे.

ठळक मुद्देचंदगडसाठी भाजपकडून अशोक चराटींचे नाव पुढेउद्या पालकमंत्र्यांचा दौरा, आढावा घेण्याची शक्यता

कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेद्वार म्हणून आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांचे नाव पुढे आले आहे.

मतदारसंघातील लिंगायत मते, आधीच्या संस्थात्मक व अन्य राजकारणामध्ये चराटी, देशपांडे गटाने इतरांना केलेले सहकार्य आणि नव्याने या मतदारसंघात झालेल्या भाजपच्या जुळणीचा आढावा घेतल्यानंतर चराटी यांचे नाव चर्चेत आले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी आजरा, गडहिंग्लज दौऱ्यावर आहेत. यावेळी या मतदारसंघाचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर संध्यादेवी कुपेकर यांनी दोनवेळा या मतदारसंघातून बाजी मारली आहे. आगामी निवडणुकीमध्ये त्यांच्याऐवजी कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर रिंगणात येण्याची दाट शक्यता आहे. चंदगडमधून नरसिंगराव पाटील यांचे चिरंजीव राजेश पाटील, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील आणि गोपाळराव पाटील हे याहीवेळी स्पर्धेत असतील.एक-दीड वर्षांपूर्वीपर्यंत नंदिनी बाभूळकर यांनीच भाजपमध्ये यावे, यासाठी प्रयत्न झाले; परंतु त्यांनी राष्ट्रवादीमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. राजेश पाटील यांची उमेद्वारी संजय मंडलिक यांच्या भूमिकेवर ठरू शकते; त्यामुळे संजय मंडलिकांचा लोकसभेचा निकाल काय लागतो, यालाही त्यांच्यादृष्टीने महत्त्व आहे.भाजपमध्ये जेव्हा चंदगडच्या उमेद्वारीची चर्चा झाली, तेव्हा आता जुने चेहरे चालणार नाही, यावर भर देण्यात आला आहे. चंदगडची जनता गेली अनेक वर्षे तीन पाटील उमेद्वारांना मदत करत आली; मात्र यामध्ये कुपेकर बाजी मारत आले आहेत.

म्हणूनच यावेळी नवा चेहरा देण्याची इच्छा असलेल्या भाजप नेत्यांसमोर अशोक चराटी हे एकमेव नाव आले आहे. आजरा येथील अण्णा भाऊ संस्था समूहाच्या माध्यमातून १२00 हून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार देणाºया समूहाचे नेते म्हणून अशोक चराटी कार्यरत आहेत.सध्या ते आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष, जिल्हा बँक संचालक, बाजार समिती संचालक अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. भरमूअण्णा पाटील यांचा आजरा तालुक्यातील किणे कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघातील गट अशोक चराटी यांनीच सांभाळला होता; त्यामुळे आजरा तालुक्यातील चंदगडमध्ये समाविष्ट असणाऱ्या ३0/३२ गावांमध्ये चराटी यांचा प्रभावी संपर्क आहे.

सत्तेचा वापर करण्याची खुबी, नेटके नियोजन या बळावर काशिनाथ चराटी आणि माधवराव देशपांडे यांच्यानंतर चराटी यांनी आजरा तालुक्यामध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. म्हणूनच भाजपकडून त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार सुरू आहे; मात्र यासाठी भाजपमधीलच रमेश रेडेकर यांच्या महत्त्वाकांक्षेला लगाम घालावा लागणार आहे.

चंदगडमधील पाटील ठरणार महत्त्वाचेकुपेकरांनी चंदगड तालुक्यात गावोगावी आपला गट तयार केला आहे. गोपाळराव पाटील सध्या भाजपमध्ये आहेत. लोकसभेनंतरच्या परिस्थितीमध्ये राजेश पाटील किंवा भरमूअण्णा पाटील यांचे भाजपला सहकार्य मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न होणार आहेत.

चांगले पद देण्याची तयारी दर्शवून त्यांनी चराटी यांच्यामागे ताकद लावावी, असे हे सूत्र असेल. गडहिंग्लज तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर लिंगायत मतेही चराटी यांना मिळू शकतात. या मतदारसंघातील भाजपचे सदस्य तर मदत करतीलच याशिवाय अधिकाधिक निधी देत अन्य पक्षांच्या सदस्यांनीही भाजपला मदत करावी, असे प्रयत्न सुरू आहेत.

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील