शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

कोल्हापूर : ऐन हंगामात रेल्वेस्थानकांतील आरक्षण खिडकी बंद, प्रवाशाच्या मोठ्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 12:53 IST

ऐन उन्हाळी सुटीमुळे पर्यटनासाठी रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असताना कोल्हापुरातील रेल्वेस्थानकावरील सध्या अस्तित्वात असलेल्या तीन आरक्षण तिकीट खिडक्यांपैकी एक खिडकी बंद आहे. दोन तिकीट खिडक्यांवर मोठ्या रांगा लागत असल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्दे ऐन हंगामात रेल्वेस्थानकांतील आरक्षण खिडकी बंद प्रवाशाच्या मोठ्या रांगा; प्रशासनाचे दुर्लक्ष

कोल्हापूर : ऐन उन्हाळी सुटीमुळे पर्यटनासाठी रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असताना कोल्हापुरातील रेल्वेस्थानकावरील सध्या अस्तित्वात असलेल्या तीन आरक्षण तिकीट खिडक्यांपैकी एक खिडकी बंद आहे. दोन तिकीट खिडक्यांवर मोठ्या रांगा लागत असल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथील आरक्षण कक्षातील एक आरक्षण खिडकी बंद असल्याने अन्य दोन खिडक्यांबाहेर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. (छाया : दीपक जाधव)शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुटी पडल्याने पर्यटनासह गावी जाण्यासाठी रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथील आरक्षण कक्षातील तीन तिकीट खिडक्यांपैकी एक खिडकी गेल्या महिन्याभरापासून बंद असल्याने, दोन खिडक्यांवर तिकीट काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

बंद खिडकीमुळे प्रवाशांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. तिकीट खिडक्यांवरचाही ताण काही प्रमाणावर कमी करण्यासाठी तिसरी खिडकी सुरू करणे गरजेचे आहे. मात्र अपुरे कर्मचारी व काही कर्मचारी सुटीवर गेल्याने ही खिडकी बंद ठेवण्यात आल्याचे प्रशासन सांगत आहे. पुरेसे कर्मचारी नियुक्तीबाबत वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याचे स्थानिक रेल्वे अधिकारी सांगत आहेत.रेल्वे तिकिटांच्या आरक्षणासाठी येथे दररोज ४०० ते ४५० आरक्षणाचे अर्ज भरले जातात. त्यामुळे दिवसाकाठी आरक्षणातून मिळणारे उत्पन्न लाखोंच्या घरात आहे. मात्र सध्या दोनच खिडक्या उपलब्ध आहेत. त्यामुळे आरक्षण केंद्रावर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

 

रिक्त पदे तत्काळ भरावीकोल्हापुरातील आरक्षण कक्षासाठी १२ कर्मचारी पदे मंजूर आहेत. त्यांपैकी सध्या नऊ कर्मचारी कार्यरत आहेत. आणखी तीन कर्मचाऱ्यांची गरज आहे. बंद खिडकीमुळे अन्य दोन खिडक्यांवर नेहमी गर्दी असते. त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग होतात. प्रशासनाने तत्काळ रिक्त पदे भरून ही खिडकी सुरू करावी.- शिवनाथ बियाणी,सदस्य, पुणे विभागीय सल्लागार समिती

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे