शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

कोल्हापूर : उद्योजकांच्या भल्यासाठी १९ टक्के वीज बिल शेतकऱ्यांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 10:58 IST

उपसा जलसिंचन कालवे योजनेचे ८१ टक्के वीज बिल त्या प्रकल्पामार्फत भरण्याचा शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, उर्वरित १९ टक्के वीज बिल तरी शेतकऱ्यांच्या माथी का मारता, असा सवाल श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी उपस्थित केला. उद्योजकांच्या भल्यासाठी हे १९ टक्के वीज बिल शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारले जात असल्याचा आरोप करत याविरोधात पुन्हा लढा उभारणार असल्याचे त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देभारत पाटणकर यांचा आरोप, उपसा जलसिंचन कालवे योजनाचार वर्षे आम्ही संघर्ष केला, पुन्हा लढा उभारणार : पाटणकर गणमाता अंबाबाई मुक्ती आंदोलन, २१ जानेवारी रोजी कोल्हापुरात बैठक जानेवारीमध्ये सातारा जिल्ह्यात श्रमिक मुक्ती दलाचे राज्य अधिवेशन

कोल्हापूर : उपसा जलसिंचन कालवे योजनेचे ८१ टक्के वीज बिल त्या प्रकल्पामार्फत भरण्याचा शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, उर्वरित १९ टक्के वीज बिल तरी शेतकऱ्यांच्या माथी का मारता, असा सवाल श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी उपस्थित केला. उद्योजकांच्या भल्यासाठी हे १९ टक्के वीज बिल शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारले जात असल्याचा आरोप करत याविरोधात पुन्हा लढा उभारणार असल्याचे त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.डॉ. पाटणकर म्हणाले, गेली चार वर्षे यासाठी आम्ही संघर्ष केला. वास्तविक याआधीच्या सरकारने आणि विद्यमान सरकारनेही आधीच हा निर्णय घेणे आवश्यक होते. या सरकारने तो घेतला याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो; पण लढा येथे संपलेला नाही.एकूण वीज बिलाच्या ८१ टक्के बिल आता त्या-त्या प्रकल्पांच्या माध्यमातून शासन भरणार आहे.

सर्व वीज बिल प्रकल्पांच्या माध्यमातून भरणे शक्य आहे, तसा अहवाल त्या-त्या विभागांनी शासनाला दिला आहे. आम्ही याबाबतच्या बैठकांमध्ये हे शासकीय अधिकाऱ्यांना पटवून दिले आहे तरीही शासनाने या बिलाच्या १९ टक्के बिल शेतकऱ्यांनी भरावे, असा निर्णय घेतला आहे. मात्र, या विरोधात आम्ही आंदोलन उभारणार आहोत.

यावेळी राज्य सचिव संपत देसाई, डॉ. प्रशांत पन्हाळकर (सातारा), प्रा. टी. एल. पाटील, मोहन अनपट (सोलापूर), प्रकाश सोरटे, मारुती पाटील, शंकर पाटील, दिनकर पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

गणमाता अंबाबाई मुक्ती आंदोलनडॉ. पाटणकर म्हणाले, दहा हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असलेली अंबाबाई आहे. ती गणमाता आहे. त्या काळामध्ये सामूहिक लोकशाहीवर भर होता. सर्व येणारे उत्पन्न हे देवीच्या साक्षीने वाटून घेण्याची पद्धत होती. सध्याच्या जत्रा हे याचेच प्रतीक आहे.

रा. चिं. ढेरे, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. शरद पाटील या सर्वांनी तशी मांडणी केली आहे म्हणूनच अंबामाता आणि तिच्या मुला समान असलेले भाविकांच्यामध्ये कुणीही दलाल नकोत, अशी आमची भूमिका आहे म्हणूनच पंढरपूरच्या धर्तीवर येथील अंबाबाई मंदिरातही व्यवस्था असावी, यासाठी गणमाता अंबाबाई मुक्ती आंदोलन उभारणार आहोत. दि. २१ जानेवारी २०१८ रोजी कोल्हापुरातच याबाबत बैठक होणार असून त्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल.

जानेवारीमध्ये सातारा जिल्ह्यात अधिवेशनपाटण तालुक्यातील सावरघर येथे दि. ६, ७, ८ जानेवारी २०१८ रोजी श्रमिक मुक्ती दलाचे राज्य अधिवेशन होणार असून पर्यायी विकास आराखडा, समन्यायी पाणी वाटप धोरणाची राज्यभर अंमलबजावणी, पुरुषसूक्तानुसार होणाऱ्या विठ्ठलपूजेला विरोध, नितीन आगेचे मारेकरी निर्दोष ठरल्याबद्दल जानेवारीअखेरीस मोर्चा, कंपन्यांच्या सीएसआर निधीतून प्रकल्पग्रस्तांसाठी उद्योग आदी विषयांवर या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर