शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञान माणसाचा तिसरा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:06 IST

इंद्रजित देशमुख दैवी गुणांच्या बाबतीत विश्लेषण करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान या एका देखण्या दैवी गुणाबद्दल खूप देखणे विश्लेषण ...

इंद्रजित देशमुखदैवी गुणांच्या बाबतीत विश्लेषण करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान या एका देखण्या दैवी गुणाबद्दल खूप देखणे विश्लेषण केलेले आहे. वास्तविक परमार्थ आणि संसारसंपन्न व्हायचे असेल, तर आवश्यक असणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान असल्याशिवाय आपण संसार आणि परमार्थ यामध्ये पारंगत होऊ शकत नाही. प्रावीण्य किंवा पारंगत होण्यासाठी आवश्यक असणारा आंतरिक भाव ज्यामध्ये सामावलेला असतो त्या अफाट संग्रहाला ज्ञान म्हणता येईल. कदाचित याचसाठी आम्ही लहान असताना एक सुविचार वाचला आणि ऐकला होता आणि तो सुविचार असा होता की, ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. तिसरा याचा अर्थ या दोन डोळ्यांच्यापेक्षा पुढचा प्रगल्भ आणि पक्व असणारा डोळा होय. या ज्ञानाच्या आधारेच सतत जाणिवेत राहणे साधकाला सहज शक्य होतं, म्हणून तो आपल्याजवळ असणे खूप गरजेचे आहे. भक्तांची वर्गवारी सांगत असताना ज्ञानी भक्त आपला आत्मा आहे, हे भगवान श्रीकृष्ण यांनी याचसाठी सांगितले आहे.ज्ञानाबद्दलच चिंतन वाचून कदाचित आपल्याला असं वाटेल की, ज्ञान नेमकं म्हणायचं कशाला? उदरनिर्वाहद्वारे व्यवस्थित जगता यावं म्हणून एखाद्या विषयातील आत्मसात केलेल्या माहितीलाच ज्ञान म्हणावं का किंवा एखाद्या बाबतीत असामान्यत्व धारण करण्यासाठी त्याच बाबीतील जास्त व दार्शनिक विद्या संपादित करणे याला ज्ञान म्हणावं का? वास्तविक हे सगळे ज्ञानाचे अपुरे ज्ञान प्रकार आहेत. जे ज्ञान माउलींना अपेक्षित आहे ते अशा कुठल्या बाबीतून संपादित करता येण्यासारखे नाही. मर्यादित कक्षा असणाऱ्या मर्यादित प्रांतातील माहिती कधीच ज्ञान होऊ शकत नाही आणि त्या माहितीचा आपल्या आत्मिक शांतीसाठी कुठलाच फायदा होऊ शकत नाही, पण दैवी गुण म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची जी बाजू येऊ शकते, ती आपल्याला खूप शांत बनवते. यासाठी ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी म्हणतात,‘तें ज्ञान हृदयी प्रतिष्ठे।मग शांतीचा अंकुर फुटे।विस्तार बहु प्रगटे। आत्मबोधाचा।।’ज्या अनुभूतीमुळे आमच्या वृत्तीचा विस्तार होतो, आमच्या मनाच्या सर्व तºहेच्या संकुचितता लयाला जातात आणि आमच्या आत प्रगाढ शांतता नांदू लागते आणि आम्ही सतत आत्मबोधावर राहू शकतो हे परिवर्तन ज्या रसायनाद्वारे होऊ शकते ते अदृश्य रसायन म्हणजे ज्ञान होय. पुस्तकात वाचून अनुकरण करून ते प्राप्त होईल असे अजिबात नाही. मुळात ज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त आणि अप्राप्त असा भेदही होऊ शकत नाही. ज्ञान म्हणजे आपल्या आत झालेलं प्रत्यंतर आणि त्या प्रत्यंतरामुळे स्वत:च स्वत:ला ओळखून किंवा स्वत:च स्वत:च्या खऱ्या रूपाला ओळखून आपले आतील सगळे व्यवहार त्या खºया रूपाशी बांधील राहून करणे म्हणजे ज्ञान होय.या ज्ञानाबद्दल सांगत असतानाच माउलीने एका ठिकाणी सांगितले आहे की, सद् वस्तूच्या प्राप्तीची आणि तिच्या प्रचितीच्या जाणिवेची आग्रही भूमिका ज्या वृत्तीतून प्रसवते ती वृत्ती म्हणजे ज्ञान होय. या ज्ञानासाठी जगात दिसणारी भौतिक संपन्नता असली काय किंवा नसली काय फारसा फरक पडत नाही. कारण ही अंत:करणाची अवस्था आहे. बाह्यशरीराची नाही. योगायोगाने याच आठवड्यात जगद्गुरू तुकोबारायांची बीज आहे. तुकोबारायांच्या जीवनाच्या आत्मिक उंचीचा विचार केला तर त्यांनी ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी बाहेरच्या कुठल्या संसाधनाचा विकास करणे याचा फारसा विचार केला नाही. अगदी तुकोबारायांच्याच भाषेत सांगायचं झालं तर‘अर्थे लोपली पुराने। नाश केला शब्दज्ञाने।।’आत्मिक उंची वाढवण्यासाठी आणि स्वस्वरूपाची जाणीव किंवा ओळख करून घेण्यासाठी बाकी अर्थ आणि अर्थांतरन असणाºया कोणत्या माहितीची गरज नाही. गरज आहे ती फक्त बोधाची आणि त्या बोधाच्या अविचलतेसाठी आवश्यक असणाºया खºया ज्ञानाची.(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत.)