शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

केएमटी पूर्वपदावर, राजारामपुरी रुट मात्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 18:16 IST

पापाची तिकटी ते गंगावेश या वर्दळीच्या रस्त्यावर रविवारी रात्री झालेल्या केएमटी बस अपघातानंतर बंद ठेवण्यात आलेली बस सेवा मंगळवारी पूर्ववत सुरु करण्यात आली. मात्र राजारामपुरी व कागल मार्गावरुन धावणाºया १४ बसेस अद्याप बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, दगडफेक, तोडफोडीमुळे दोन बसेस व अग्निशमन दलाच्या तीन वाहनांचे मिळून सुमारे दोन लाख रुपयांचे तर बससेवा बंद ठेवल्यामुळे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे केएमटी सुत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देराजारामपुरी, कागल मार्गावरुन धावणाºया १४ बसेस अद्याप बंददगडफेक, तोडफोडीमुळे दोन बसेस. अग्निशमन दलाच्या तीन वाहनांचे दोन लाखाचे नुकसान बंद ठेवल्यामुळे केएमटी प्रशासनाला बारा लाखाचे नुकसान

कोल्हापूर , दि. ३ :   पापाची तिकटी ते गंगावेश या वर्दळीच्या रस्त्यावर रविवारी रात्री झालेल्या केएमटी बस अपघातानंतर बंद ठेवण्यात आलेली बस सेवा मंगळवारी पूर्ववत सुरु करण्यात आली. मात्र राजारामपुरी व कागल मार्गावरुन धावणाºया १४ बसेस अद्याप बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, दगडफेक, तोडफोडीमुळे दोन बसेस व अग्निशमन दलाच्या तीन वाहनांचे मिळून सुमारे दोन लाख रुपयांचे तर बससेवा बंद ठेवल्यामुळे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे केएमटी सुत्रांनी सांगितले.

रविवारी रात्री साडेसात वाजता अपघात घडल्यानंतर जमावाकडून झालेली तोडफोड व दगडफेक पाहून केएमटी प्रशासनाला तात्काळ सर्व मार्गावरील बस सेवा बंद ठेवावी लागली. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रशासनाने बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या पाच बसेस बाहेर काढण्यात आल्यानंतर त्या पुन्हा काही तरुणांनी रस्त्यावर अडविल्या. त्यामुळे सोमवारी दिवसभरही बस सेवा बंद ठेवावी लागली.

मंगळवारी मात्र प्रशासनाने पहाटे पाच वाजल्यापासून बस सेवा पूर्ववत सुरु ठेवली. सुमारे ९७ बसेस मार्गावर सोडण्यात आल्या. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून राजारामपुरी मार्गावरील ८ तसेच कागल मार्गावरील ६ अशा एकूण १४ बसेस मंगळवारीही बंद ठेवल्या.

मंगळवारी बस सेवा सुरु झाल्यानंतर सकाळी अपघातातील जखमी आनंदा राऊत यांचे निधन झाल्याची बातमी बाहेर आली. त्यामुळे केएमटी प्रशासनाने अंत्ययात्रा जाणाºया मार्गावर एकही बस जाणार नाही याची खबरदारी घेतली. तोडफोड तसेच बससेवा बंद ठेवल्यामुळे केएमटी प्रशासनाला बारा लाखाचे नुकसान सहन करावे लागले.

आयुष्यमान संपले तरी गाड्या तंदुरुस्त---------------------------केएमटीच्या ताफ्यात २००७ साली घेण्यात आलेल्या बसेस पैकी आरटीओच्या नियमाप्रमाणे ३९ बसेसचे आयुष्यमान संपले आहे. तरीही या सर्व बसेस रस्त्यावरुन धावण्याइतक्या परिपूर्ण, तंदुरुस्त असल्याचा दावा केएमटीच्या काही अधिकाºयांकडून केला जातो. ३९ बसेस प्रत्येक वर्षी आरटीओ पासिंग केले जाते. त्यानंतरच या बसेस प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यावर सोडल्या जातात. ज्या बसचा अपघात झाला त्या बसचे पासिंग तर आॅगस्ट २०१७ मध्ये झाले आहे. सर्वच बसेसची देखभाल दुरुस्ती नियमित केली जाते. चालकांकडून कोणत्याही गंभीर स्वरुपाच्या तक्रारी या बस बाबत नव्हत्या,असे लॉगबुकवरील नोंदीवरुन समोर आले आहे. सोमवारी सर्व लॉगबुकवरील नोंदी तपासण्यात आल्या. त्यातून ही माहिती पुढे आली.मिरवणुक मार्ग का बंद केला नाही?------------------------प्रत्येक वर्षी मोहरमची मिरवणुक शिवाजी पुतळ्याजवळील घुडणपीर दर्गा येथून सुरु होते. पुढे ही मिरवणुक महानगरपालिका, पानलाईन, पापाची तिकटी, गंगावेश, पंचगंगा रोड या मार्गावरुन जाते. कायमस्वरुपी हाच मार्ग आहे. ज्या वेळी मिरवणुक सुरु होते, त्यावेळी पोलिस प्रशासनाकडून या मार्गावरील वाहतुक बंद ठेवली जाते. परंतु रविवारी या मार्गावरील वाहतुक का बंद ठेवली नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. जर वाहतुक बंद ठेवली असती तर कदाचित ही घटनाच घडली नसती असे केएमटी चालकांनीच सांगितले.