शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
5
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
6
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
7
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
8
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
9
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
10
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
11
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
12
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
13
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
14
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
15
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
16
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
17
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
18
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
19
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
20
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!

केएमटी पूर्वपदावर, राजारामपुरी रुट मात्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 18:16 IST

पापाची तिकटी ते गंगावेश या वर्दळीच्या रस्त्यावर रविवारी रात्री झालेल्या केएमटी बस अपघातानंतर बंद ठेवण्यात आलेली बस सेवा मंगळवारी पूर्ववत सुरु करण्यात आली. मात्र राजारामपुरी व कागल मार्गावरुन धावणाºया १४ बसेस अद्याप बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, दगडफेक, तोडफोडीमुळे दोन बसेस व अग्निशमन दलाच्या तीन वाहनांचे मिळून सुमारे दोन लाख रुपयांचे तर बससेवा बंद ठेवल्यामुळे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे केएमटी सुत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देराजारामपुरी, कागल मार्गावरुन धावणाºया १४ बसेस अद्याप बंददगडफेक, तोडफोडीमुळे दोन बसेस. अग्निशमन दलाच्या तीन वाहनांचे दोन लाखाचे नुकसान बंद ठेवल्यामुळे केएमटी प्रशासनाला बारा लाखाचे नुकसान

कोल्हापूर , दि. ३ :   पापाची तिकटी ते गंगावेश या वर्दळीच्या रस्त्यावर रविवारी रात्री झालेल्या केएमटी बस अपघातानंतर बंद ठेवण्यात आलेली बस सेवा मंगळवारी पूर्ववत सुरु करण्यात आली. मात्र राजारामपुरी व कागल मार्गावरुन धावणाºया १४ बसेस अद्याप बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, दगडफेक, तोडफोडीमुळे दोन बसेस व अग्निशमन दलाच्या तीन वाहनांचे मिळून सुमारे दोन लाख रुपयांचे तर बससेवा बंद ठेवल्यामुळे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे केएमटी सुत्रांनी सांगितले.

रविवारी रात्री साडेसात वाजता अपघात घडल्यानंतर जमावाकडून झालेली तोडफोड व दगडफेक पाहून केएमटी प्रशासनाला तात्काळ सर्व मार्गावरील बस सेवा बंद ठेवावी लागली. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रशासनाने बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या पाच बसेस बाहेर काढण्यात आल्यानंतर त्या पुन्हा काही तरुणांनी रस्त्यावर अडविल्या. त्यामुळे सोमवारी दिवसभरही बस सेवा बंद ठेवावी लागली.

मंगळवारी मात्र प्रशासनाने पहाटे पाच वाजल्यापासून बस सेवा पूर्ववत सुरु ठेवली. सुमारे ९७ बसेस मार्गावर सोडण्यात आल्या. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून राजारामपुरी मार्गावरील ८ तसेच कागल मार्गावरील ६ अशा एकूण १४ बसेस मंगळवारीही बंद ठेवल्या.

मंगळवारी बस सेवा सुरु झाल्यानंतर सकाळी अपघातातील जखमी आनंदा राऊत यांचे निधन झाल्याची बातमी बाहेर आली. त्यामुळे केएमटी प्रशासनाने अंत्ययात्रा जाणाºया मार्गावर एकही बस जाणार नाही याची खबरदारी घेतली. तोडफोड तसेच बससेवा बंद ठेवल्यामुळे केएमटी प्रशासनाला बारा लाखाचे नुकसान सहन करावे लागले.

आयुष्यमान संपले तरी गाड्या तंदुरुस्त---------------------------केएमटीच्या ताफ्यात २००७ साली घेण्यात आलेल्या बसेस पैकी आरटीओच्या नियमाप्रमाणे ३९ बसेसचे आयुष्यमान संपले आहे. तरीही या सर्व बसेस रस्त्यावरुन धावण्याइतक्या परिपूर्ण, तंदुरुस्त असल्याचा दावा केएमटीच्या काही अधिकाºयांकडून केला जातो. ३९ बसेस प्रत्येक वर्षी आरटीओ पासिंग केले जाते. त्यानंतरच या बसेस प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यावर सोडल्या जातात. ज्या बसचा अपघात झाला त्या बसचे पासिंग तर आॅगस्ट २०१७ मध्ये झाले आहे. सर्वच बसेसची देखभाल दुरुस्ती नियमित केली जाते. चालकांकडून कोणत्याही गंभीर स्वरुपाच्या तक्रारी या बस बाबत नव्हत्या,असे लॉगबुकवरील नोंदीवरुन समोर आले आहे. सोमवारी सर्व लॉगबुकवरील नोंदी तपासण्यात आल्या. त्यातून ही माहिती पुढे आली.मिरवणुक मार्ग का बंद केला नाही?------------------------प्रत्येक वर्षी मोहरमची मिरवणुक शिवाजी पुतळ्याजवळील घुडणपीर दर्गा येथून सुरु होते. पुढे ही मिरवणुक महानगरपालिका, पानलाईन, पापाची तिकटी, गंगावेश, पंचगंगा रोड या मार्गावरुन जाते. कायमस्वरुपी हाच मार्ग आहे. ज्या वेळी मिरवणुक सुरु होते, त्यावेळी पोलिस प्रशासनाकडून या मार्गावरील वाहतुक बंद ठेवली जाते. परंतु रविवारी या मार्गावरील वाहतुक का बंद ठेवली नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. जर वाहतुक बंद ठेवली असती तर कदाचित ही घटनाच घडली नसती असे केएमटी चालकांनीच सांगितले.